शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

मे २०१७ पर्यंत मुंबईत वायफाय

By admin | Updated: August 6, 2016 03:25 IST

मुंबईला वायफाय शहर बनविण्यात येणार असून १ मे २०१७ पर्यंत संपूर्ण मुंबईत १२०० वायफाय हॉटस्पॉट उभारण्यात येतील.

मुंबई : मुंबईला वायफाय शहर बनविण्यात येणार असून १ मे २०१७ पर्यंत संपूर्ण मुंबईत १२०० वायफाय हॉटस्पॉट उभारण्यात येतील. त्यातील ५०० हॉटस्पॉट हे १ नोव्हेंबर २०१६ पर्यंत कार्यरत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. १५, २० आणि २५ लाखांत सर्वसामान्यांना परवडणारी घरे मुंबईत दिली जातील, असेही ते म्हणाले. विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई शहरात २० एमबीपीएस इतक्या स्पीडने यामाध्यमातून इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल. गेट वे आॅफ इंडिया,चौपाटी आदी प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी प्रथम ते सुरू करण्यात येतील. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याचे काम येत्या आॅक्टोबरमध्ये हे काम पूर्ण होणार आहे. मुंबईत जागांच्या किंमती प्रचंड असल्याने घरांच्या किंमतीही जास्त आहेत.त्यामुळे सरकार तसेच महापालिकेच्या अखत्यारितील जागांवर परवडणारी घरे बांधता येतील.ना विकास क्षेत्रातील २ हजार १०० हेक्टर क्षेत्राचा त्यासाठी वापर करण्यात येईल.मिठागरांचीही ४०० हेक्टर जागा त्यासाठी वापरण्यात येईल.यामुळे १५,२० आणि २५ लाख रूपयांत सर्वसामान्यांना घरे उपलब्ध होतील.मुंबईतील नाविकास क्षेत्रातील ज्या जमिनींचा विकास होऊ शकतो त्यावर परवडणारी घरे उभारण्यात येतील. मुंबई उपनगरातही न्यायालयाच्या परवानगीनंतर क्लस्टर डेव्हलपमेंट लागू करण्यात येईल. विविध आरक्षणे तसेच संरिक्षत भागाचा समावेश असलेला मुंबईच्या ६३ टक्के भूभागावर विकासच करता येत नाही.उरलेल्या ३७ टक्के भागातच मुंबई शहराला वसवायचे आहे.परवडणा-या घरांसाठी जागा उपलब्धीसाठी प्रयत्न करण्यात येत असलयाचेही ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)>२०० रस्त्यांची दुसऱ्या टप्प्यात चौकशीमुंबईतील रस्ते बांधकामाच्या चौकशीत कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. चौकशीच्या पहिल्या टप्प्यातील चौकशीत ६ कंत्राटदार व दोन त्रयस्थ लेखापरीक्षकांना काळया यादीत टाकण्यात आले आहे.काही अधिका-यांना अटकही झाली आहे.चौकशीचा दुसरा टप्पा सुरू झाला असून यात २०० रस्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. निविदा काढताना जर विशिष्ट कंत्राटदाराला फायदा होईल असे निकष ठरविण्यात आले असतील तर त्याचीही चौकशी होईल व खुली निविदा निघेल याची काळजी घेण्यात येईल. असे मुख्यमंत्री म्हणाले. >विखे पाटील यांची फटकेबाजीविरोधी पक्षांच्या चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. मेरे पास मंत्रियों के भ्रष्टाचार के सबूत है, सच्चाई है, आप के पास क्या है, असा ‘दीवार’ स्टाईल प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. अखंड महाराष्ट्राच्या प्रस्तावावर शिवसेनेने ‘तो मी नव्हेच’ नाटकातील लखोबा लोखंडे प्रमाणे झटक्यात यू-टर्न घेतला. त्यामुळे उत्तम अभिनयाचा ‘आॅस्कर’ शिवसेनेलाच दिला पाहिजे, असे ते म्हणाले. शिवसेनेचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यावर त्यांनी नव्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले.