शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

पतीला वाईट म्हणणारी पत्नी क्रूर

By admin | Updated: June 27, 2016 04:54 IST

खोटे आरोप करून पतीला वाईट ठरविण्याचा प्रयत्न करणारी पत्नी स्वत:च क्रूर ठरली.

राकेश घानोडे,

नागपूर- खोटे आरोप करून पतीला वाईट ठरविण्याचा प्रयत्न करणारी पत्नी स्वत:च क्रूर ठरली. यामुळे त्यांचे विवाहसंबंध पुनर्स्थापित करण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच रद्दबातल केला.प्रकरणातील राहुल व कविता (काल्पनिक नावे) नागपूर येथील रहिवासी आहेत. २० आॅगस्ट २००२ रोजी त्यांचे लग्न झाले होते. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. राहुल घटस्फोटीत होता, तर कविताच्या पहिल्या पतीचे निधन झाले आहे. राहुलला पहिल्या पत्नीपासून दोन मुले, तर कविताला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. लग्नाच्या काही महिन्यांनंतरच दोघांमध्ये खटके उडायला लागले. कविताला सोडून राहुल वेगळा राहायला लागला. अशी तीन वर्षे उलटल्यानंतर कविताने विवाहसंबंध पुनर्स्थापित करण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. कुटुंब न्यायालयाने तिच्या बाजूने निर्णय दिला.राहुलने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील केले. कविताने याचिकेत राहुलवर गंभीर आरोप केले होते. राहुल फारच वाईट स्वभावाचा व विकृत मनोवृत्तीचा माणूस असल्याचे चित्र त्यात रंगवले होते. असे असतानाही कविता त्याच्यासोबत राहण्यास इच्छुक आहे, ही बाब उच्च न्यायालयाला पटली नाही. कविताचे सर्व आरोप कोर्टाने बिनबुडाचे ठरविले. राहुल एवढा वाईट असता, तर सोबत राहण्याची कविताची इच्छाच नसती, असे मत न्यायालयाने नोंदवले आणि कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द केला. (प्रतिनिधी)>असे होते पतीवरील आरोपपतीने केवळ मालमत्तेसाठी माझ्यासोबत लग्न केले. प्रत्येक चार वर्षांनी नवीन लग्न करण्याचा आपला व्यवसाय आहे, असे पती सांगत होता. पती माझ्या मुलींचा मानसिक छळ करीत होता. तो मुलींची हत्या करण्याची धमकी देत होता. मला व मुलींना उपाशी ठेवत होता. पतीने सिलिंडरचे रेग्युलेटर काढून ठेवले होते इत्यादी गंभीर आरोप पत्नीने केले होते.