शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

मूल होत नसल्याने केली पत्नीची हत्या

By admin | Updated: June 30, 2016 02:03 IST

लग्नाला सहा वर्षे उलटूनही मूल होत नव्हते म्हणून पत्नीची हत्या करत पतीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना पवईत घडली.

मुंबई : लग्नाला सहा वर्षे उलटूनही मूल होत नव्हते म्हणून पत्नीची हत्या करत पतीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना पवईत घडली. सुरेश बीजे (४०) आणि प्रीती सुरेश बीजे (३५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. या प्रकरणी सुरेशविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.पवई येथील साई बागुरडा गावात बीजे दाम्पत्य राहायचे. त्यांचा प्रेमविवाह आहे. लग्नाला सहा वर्षे उलटूनही मूल होत नसल्याने दोघांमध्ये खटके उडायचे. प्रीतीवर उपचारही सुरू होते. गेल्या वर्षभरापासून सुरेशलाही डोकेदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्याने नोकरी सोडली. त्यानंतर तो घरीच राहायला लागला. तो मारझोड करत असल्याचे प्रीतीने बहीण मीनाला अनेकदा सांगितले होते. मंगळवारी दुपारी प्रीती घरी आली. रात्री आठच्या सुमारास भाजी नेण्यासाठी आलेल्या चुलत बहिणीने दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद न आल्याने तिने नातेवाइकांना याबाबत माहिती दिली. नातेवाइकांनी तेथे धाव घेत दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. खिडकीतून पाहिले असता सुरेशने गळफास घेतल्याचे आढळले. छप्पर तोडून सुरेशच्या भावाने घरात प्रवेश केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली प्रीती आणि गळफास घेतलेला सुरेश आढळला. (प्रतिनिधी)पत्नीवर हातोड्याचे वारपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूल न होण्यावरून मंगळवारी दोघांमध्ये भांडण झाल्याचा संशय आहे. याच रागात सुरेशने हातोड्याने पत्नीच्या डोक्यावर घाव घातले. त्यानंतर तिच्या हाताची नस कापली. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. प्रीतीच्या डोक्यावर हातोड्याने पाच घाव घालण्यात आले. या प्रकरणी सुरेशविरोधात हत्या करून आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सुसाइड नोट पोलिसांना सापडली नाही. मात्र तेथील एका वीज बिलावर झगडा असे लिहिले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुरेशने हे लिहिले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हे हस्ताक्षर नेमके कुणाचे याचा तपास सुरू असल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली.