शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

५८ शहरांत वायफाय स्पॉट

By admin | Updated: January 11, 2016 03:28 IST

डिजिटल इंडिया या सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशनला गती देण्यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली असून, याकरिता देशातील २५६ ठिकाणी २५०० वायफाय स्पॉट बसविण्यात येणार आहेत.

मुंबई : डिजिटल इंडिया या सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशनला गती देण्यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली असून, याकरिता देशातील २५६ ठिकाणी २५०० वायफाय स्पॉट बसविण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, यापैकी १७४ वायफाय स्पॉट हे महाराष्ट्रातील ५८ शहरांतून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी केली. आगामी आर्थिक वर्षात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात होईल. एनजीएन अर्थात नेक्स्ट जनरेशन नेटवर्कच्या माध्यमातून ४ लाख नवीन इंटरनेट कनेक्शनची जोडणी करण्यात येणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मोबाइलवरून इंटरनेटचा वापर सुलभ करणारे मोबाइल नेटवर्क इंटेलिजन्स केंद्र पुण्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिली. मुंबई शेअर बाजाराच्या वतीने टाटा डोकोमोच्या माध्यमातून शेअर बाजाराच्या परिसरात वायफायच्या माध्यमातून मोफत इंटरनेट सेवेचे अनावरण मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारचे डिजिटल इंडिया मिशन आणि त्या अनुषंगाने आगामी काळातील अपेक्षित घडामोडींची माहिती दिली. (प्रतिनिधी)इंटरनेटवर ५० कोटी नवे ग्राहक जोडणार मुंबई : केंद्राने घोषणा केलेल्या डिजिटल इंडिया मिशनला गती देण्यासाठी सरकारने आता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले असून आगामी सहा महिन्यांत नवे ५० कोटी इंटरनेट ग्राहक जोडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती रवी शंकर प्रसाद यांनी दिली. - सविस्तर वृत्त/९ट्रायच्या अहवालानंतरच नेट न्यूट्रॅलिटीवर निर्णयगेल्या वर्षात नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्द्यावर यू टर्न घेतल्यानंतर, यावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारने ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणाला सर्वंकष अहवाल तयार करण्यास सांगितले होते. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच यासंदर्भात सरकार आपला ठोस निर्णय जाहीर करेल, असे रवी शंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. ग्राहकांना वेगवान इंटरनेट सेवा देण्यासाठी एमटीएनएलच्या माध्यमातून सध्या मुंबईत आॅप्टिकल फायबर नेटवर्कच्या जोडणीचे काम सुरू आहे. या माध्यमातून आगामी काही महिन्यांत सुमारे एक लाख ग्राहकांना वेगवान इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. भारतीय टपाल खात्याने अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याचे मत रवी शंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. स्पीड पोस्ट कुरियर सेवेच्या माध्यमातून पोस्टाला मोठी भूमिका बजावता येणे शक्य आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात तोटा नोंदविणाऱ्या या सेवेला ई-कॉमर्समुळे मोठा लाभ झाला आहे.