शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

५८ शहरांत वायफाय स्पॉट

By admin | Updated: January 11, 2016 03:28 IST

डिजिटल इंडिया या सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशनला गती देण्यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली असून, याकरिता देशातील २५६ ठिकाणी २५०० वायफाय स्पॉट बसविण्यात येणार आहेत.

मुंबई : डिजिटल इंडिया या सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशनला गती देण्यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली असून, याकरिता देशातील २५६ ठिकाणी २५०० वायफाय स्पॉट बसविण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, यापैकी १७४ वायफाय स्पॉट हे महाराष्ट्रातील ५८ शहरांतून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी केली. आगामी आर्थिक वर्षात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात होईल. एनजीएन अर्थात नेक्स्ट जनरेशन नेटवर्कच्या माध्यमातून ४ लाख नवीन इंटरनेट कनेक्शनची जोडणी करण्यात येणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मोबाइलवरून इंटरनेटचा वापर सुलभ करणारे मोबाइल नेटवर्क इंटेलिजन्स केंद्र पुण्यात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिली. मुंबई शेअर बाजाराच्या वतीने टाटा डोकोमोच्या माध्यमातून शेअर बाजाराच्या परिसरात वायफायच्या माध्यमातून मोफत इंटरनेट सेवेचे अनावरण मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारचे डिजिटल इंडिया मिशन आणि त्या अनुषंगाने आगामी काळातील अपेक्षित घडामोडींची माहिती दिली. (प्रतिनिधी)इंटरनेटवर ५० कोटी नवे ग्राहक जोडणार मुंबई : केंद्राने घोषणा केलेल्या डिजिटल इंडिया मिशनला गती देण्यासाठी सरकारने आता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले असून आगामी सहा महिन्यांत नवे ५० कोटी इंटरनेट ग्राहक जोडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती रवी शंकर प्रसाद यांनी दिली. - सविस्तर वृत्त/९ट्रायच्या अहवालानंतरच नेट न्यूट्रॅलिटीवर निर्णयगेल्या वर्षात नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्द्यावर यू टर्न घेतल्यानंतर, यावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारने ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणाला सर्वंकष अहवाल तयार करण्यास सांगितले होते. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच यासंदर्भात सरकार आपला ठोस निर्णय जाहीर करेल, असे रवी शंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. ग्राहकांना वेगवान इंटरनेट सेवा देण्यासाठी एमटीएनएलच्या माध्यमातून सध्या मुंबईत आॅप्टिकल फायबर नेटवर्कच्या जोडणीचे काम सुरू आहे. या माध्यमातून आगामी काही महिन्यांत सुमारे एक लाख ग्राहकांना वेगवान इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. भारतीय टपाल खात्याने अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याचे मत रवी शंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. स्पीड पोस्ट कुरियर सेवेच्या माध्यमातून पोस्टाला मोठी भूमिका बजावता येणे शक्य आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात तोटा नोंदविणाऱ्या या सेवेला ई-कॉमर्समुळे मोठा लाभ झाला आहे.