शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ग्रामीण जनतेवर भार कशाला?

By admin | Updated: March 19, 2015 01:06 IST

केंद्रात व राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन केंद्र सरकारने गुड्स अँड सर्व्हीसेस टॅक्स (जीएसटी) लागू करण्याची भूमिका जाहीर केली होती.

केंद्रात व राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन केंद्र सरकारने गुड्स अँड सर्व्हीसेस टॅक्स (जीएसटी) लागू करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्याला भाजपा व भाजपाशासीत राज्यांनी विरोध केला होता. आता केंद्र सरकारमध्ये बसल्यावर जीएसटी लागू करण्याची तयारी भाजपाने दाखवली. तसेच व्यापारी वर्गाचा प्रखर विरोध असलेला स्थानिक संस्था कर (एलबीटी) १ आॅगस्ट २०१५ पासून रद्द करून त्याबदल्यात मूल्यवर्धीत कर (व्हॅट) लागू करण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मात्र त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेवर शहरातील लोकांच्या कराचा भार पडणार असून त्याला राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र विरोध करील.एलबीटी रद्द करण्याची व्यापाऱ्यांची मागणी मान्य केली पाहिजे. त्याला आपला विरोध नाही. मात्र मूठभर व्यापारी वर्गाचे उखळ पांढरे करताना ग्रामीण जनतेवरील व्हॅटचा बोजा वाढवणे सहन केले जाणार नाही. शहरी भागातून जमा होणारा कर ग्रामीण भागातील जनतेच्या गरजा भागवण्याकरिता वापरण्याची पद्धत आहे. मात्र एलबीटीला व्हॅटचा पर्याय देणे हे गंगा उलटी वाहण्याचा प्रकार आहे.अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात कर विषयक प्रस्तावांच्या भाग दोनमध्ये चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) व विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर)च्या प्रिमीयमचे दर वाढवून अतिरिक्त उत्पन्न मिळणार मिळणार असल्याचा दावा केला आहे. ही घोषणा हा करविषयक प्रस्तावाचा भाग कसा होऊ शकतो हा प्रश्नच आहे. एफएसआय व टीडीआर यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा शहरांत बांधकामे होणार हे स्पष्ट आहे. मुंबईसह वेगवेगळ््या शहरातील महापालिकांच्या क्षेत्रात सध्या नागरी सुविधांची स्थिती शोचनीय आहे. त्यामुळे सरकारी तिजोरी प्रिमीयमने भरणार असली तरी मुंबईसह वेगवेगळ््या शहरांची स्थिती भीषण होईल. राज्यातील शेतकऱ्यांवर गेल्या वर्षभरात दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट अशी संकटे आली. खरीपाची पिके नष्ट झाली रब्बीवरही संकट कोसळले. शेतकरी अत्यंत हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा धोरणात्मक निर्णय अर्थसंकल्पात अपेक्षित होता. तसे काहीच झालेले नाही हे राज्याचे दुर्दैव आहे. सत्ताधारी भाजपा सरकारने खर्चाला ४० टक्क्यांची कपात लागू केली. मागील अर्थसंकल्पातील अखर्चित राहिलेली रक्कम आगामी वर्षीच्या अर्थसंकल्पात वेगवेगळ््या प्रकल्पांकरिता तरतूद म्हणून दाखवण्याची चलाखी सरकारने केली आहे. अशी वितरीत न झालेली रक्कम वेगवेगळ््या कामाकरिता दाखवून घोषणांचा पाऊस पाडल्याचा बहाणा करणे ही जनतेची फसवणूक आहे.