शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

साहित्य महामंडळ हवेच कशाला?

By admin | Updated: February 15, 2016 04:13 IST

साहित्याचा मार्ग फार सुंदर, आनंद देणारा आहे. मात्र या क्षेत्रातील काही मंडळी सूडबुद्धीने वागतात, त्या वेळी वाईट वाटते. साहित्यासाठी तुमच्या-आमच्यासारख्यांची गरज आहे

जळगाव : साहित्याचा मार्ग फार सुंदर, आनंद देणारा आहे. मात्र या क्षेत्रातील काही मंडळी सूडबुद्धीने वागतात, त्या वेळी वाईट वाटते. साहित्यासाठी तुमच्या-आमच्यासारख्यांची गरज आहे, त्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची गरज नाही. त्यामुळे ते बरखास्त करा, असे टीकास्र ज्येष्ठ साहित्यिक तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधू मंगेश कर्णिक यांनी सोडले.उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेच्या तिसऱ्या संमेलनाचे रविवारी कर्णिक यांनी उद्घाटन केले. ते म्हणाले, आयोजकांच्या चुकीमुळे साहित्य संमेलन चेष्टा व हास्याचा विषय होत आहे. त्यामुळे साहित्याची पुण्याई संपते. चिंचवड येथील अखिल भारतीय मराठी संमेलनात तसे झाले.राज्यात विदर्भ, मराठवाडा, कोकण, बृहन्मुंबई असे वेगवेगळ्या भागात साहित्य मंडळ, साहित्य परिषद आहे. मात्र पुण्याचे तसे नाही. तेथील अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ हेच राज्यातील सर्व विभागीय मंडळ, परिषदांचे नेतृत्व करते, हे काही मनाला पटत नाही. विविध मंडळ व परिषदांना, साहित्याला तुमची-आमची गरज आहे. महामंडळाची नाही, त्यामुळे ते बरखास्त करा. त्याला कोणताही निधी मिळू नये, असेही कर्णिक यांनी ठामपणे सांगितले. (प्रतिनिधी)