शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

खडसेंवर कारवाई का नाही?

By admin | Updated: January 18, 2017 06:11 IST

एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध तक्रार करूनही, अद्याप कायदेशीर कारवाई न करण्यात आल्याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले.

मुंबई : भोसरी येथे एमआयडीसीने संपादित केलेली सुमारे तीन एकर जमीनखरेदीच्या प्रकरणामुळे मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध तक्रार करूनही, अद्याप कायदेशीर कारवाई न करण्यात आल्याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले. न्यायालयीन समितीच्या अहवालावर अवलंबून न राहता, आधी राज्य सरकारने तक्रारीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असे म्हणत राज्य सरकारला याबाबत एका आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.कोट्यवधी रुपयांचा फायदा मिळण्यासाठी एकनाथ खडसेंनी महसूलमंत्रिपदाचा दुरुपयोग करून, भोसरी एमआयडीसीने संपादित केलेली सुमारे तीन एकर जमीन अवघी तीन कोटी ७५ लाख रुपयांत विकत घेतली. ही जमीन त्यांनी त्यांची पत्नी व जावयाच्या नावावर केली आहे. या व्यवहारामुळे खडसे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरुद्ध पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करूनही एफआयआर नोंदवण्यात आला नसल्याची बाब याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणली. त्यावर उच्च न्यायालयाने अद्याप कायदेशीर कारवाई का करण्यात आली नाही? अशी विचारणा सरकारी वकिलांकडे केली. मात्र, सरकारी वकिलांनी या जमीनखरेदी व्यवहाराची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन समितीची नियुक्ती केली असून, समितीचा अहवाल प्रलंबित असल्याचे खंडपीठाला सांगितले. ‘उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए. आर. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. या समितीने अहवाल सादर केल्यानंतरच कायदेशीर कारवाईबाबत राज्य सरकार निर्णय घेईल,’ अशी माहिती सरकारी वकिलांनी खंडपीठाला दिली. त्यावर सरकारने याबाबत एकाच आठवड्यात भूमिका स्पष्ट करू, असे खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात ठेवली. याचिकेनुसार, एकनाथ खडसे यांनी भोसरीतील (सर्व्हे क्रमांक ५२/२ अ/ २) विकत घेतलेल्या जमिनीवर एमआयडीसीने ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर अनेक कंपन्यांना दिली आहे. असे असतानाही २८ एप्रिल २०१६ रोजी ही जमीन मंदाकिनी खडसे व खडसे यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांच्या नावावर करण्यात आली. एमआयडीसीची जमीन असतानाही, खरेदी-विक्रीचा व्यवहार मुद्रांक शुल्क विभागाने नोंदवून कसा घेतला नाही? असा सवाल याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. ‘राज्य सरकारने या जमिनीच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. मात्र, सरकारचा हा निर्णय केवळ सामान्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारा आहे. या समितीला कोणतेही घटनात्मक अधिकार देण्यात आलेले नाहीत,’ असे याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी) >तुम्ही तुमचे काम करा- उच्च न्यायालयएफआयआर नोंदवला नसल्याचे वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले. ‘समितीच्या अहवालावर अवलंबून न राहाता, सरकारने त्यांचे काम करावे. तक्रारीनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. समिती त्यांचे काम करेल, तुम्ही तुमचे काम करा,’ अशा शब्दांत खंडपीठाने सरकारचे कान टोचले.