शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

भयमुक्तीचा नारा का नाही?

By admin | Updated: January 4, 2016 03:18 IST

कॉँग्रेसमुक्त भारत, स्वच्छ भारत घोषणा दिल्या जातात, पण भयमुक्त भारत का नाही, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी रविवारी उपस्थित केला.

पुणे : कॉँग्रेसमुक्त भारत, स्वच्छ भारत घोषणा दिल्या जातात, पण भयमुक्त भारत का नाही, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी रविवारी उपस्थित केला. कला, संस्कृतीच्या संवर्धनासाठी संस्थात्मक काम व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.कलाछाया संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, कवी संजय विसपुते, नचिकेत पटवर्धन, मीना चंदावरकर उपस्थित होते. असिहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करून वाजपेयी यांनी साहित्य अकामदीचा पुरस्कार सर्वप्रथम परत केला. त्यानंतर ते पहिल्यांदाच पुण्यात आले होते.वाजपेयी म्हणाले, राजकीय, आर्थिक मुद्द्यांचा कलांवर परिणाम होतो. कलांना, अभिव्यक्तीला विरोध हा ५० वर्षांपासून चालत आलेलाच आहे. पण याकडे साहित्य क्षेत्राचे लक्षच गेलेले नाही. पुरस्कार परत केला तेव्हा या गोष्टीकडे संपूर्ण देशाचे लक्ष गेले. प्रांताप्रांताप्रमाणे कलाव्यवहार वेगवेगळे आहेत. त्याला नावे ठेवणारे वेगवेगळे आहेत. अनुचित प्रकारांवर लेखक, साहित्यिकांनी भाष्य करावे,अशी समाजाची अपेक्षा असते, पण त्याबाबत समाजाचीही काही जबाबदारी आहे.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सांस्कृतिक बाबींच्या संवर्धनासाठी काही संस्था पुढे आल्या, काही लोप पावल्या. काही संस्थांचे कार्य अद्यापही सुरू असल्याचे सांगून वाजपेयी म्हणाले, सर्वसामान्य समाज आणि अभिजात समाज अशी एक वर्गवारी केली जाते. ज्यांचा संस्कृती, कलांशी काही संबंध नाही अशा व्यक्ती मंत्रालयात अधिकारीपदावर आहेत. कलांविषयी त्यांना काही प्रश्न विचारला ते चुकीचे उत्तर बेधडकपणे देतात. रसिकांना जसे स्वातंत्र्य आहे तसेच कलाकारांनाही आहे. रसिकांसमोर ज्या गोष्टी येतात त्याचाच ते विचार करतात, अशी टिप्पणी त्यांनी केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन तणाव नसावा, असेही ते म्हणाले. कला, राजकीय क्षेत्रात पवित्र कुणीच उरले नाही, राजकारणात सर्वच वाईट आहेत असेही नाही, असे डॉ. आगाशे म्हणाले. (प्रतिनिधी)दिल्लीत ३० जानेवारीला सत्याग्रहदेशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. याविरोधात ३० जानेवारी रोजी दिल्लीत सत्याग्रह करण्यात येणार असल्याचे अशोक वाजपेयी यांनी या वेळी सांगितले.