शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

भयमुक्तीचा नारा का नाही?

By admin | Updated: January 4, 2016 03:18 IST

कॉँग्रेसमुक्त भारत, स्वच्छ भारत घोषणा दिल्या जातात, पण भयमुक्त भारत का नाही, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी रविवारी उपस्थित केला.

पुणे : कॉँग्रेसमुक्त भारत, स्वच्छ भारत घोषणा दिल्या जातात, पण भयमुक्त भारत का नाही, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी रविवारी उपस्थित केला. कला, संस्कृतीच्या संवर्धनासाठी संस्थात्मक काम व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.कलाछाया संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, कवी संजय विसपुते, नचिकेत पटवर्धन, मीना चंदावरकर उपस्थित होते. असिहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करून वाजपेयी यांनी साहित्य अकामदीचा पुरस्कार सर्वप्रथम परत केला. त्यानंतर ते पहिल्यांदाच पुण्यात आले होते.वाजपेयी म्हणाले, राजकीय, आर्थिक मुद्द्यांचा कलांवर परिणाम होतो. कलांना, अभिव्यक्तीला विरोध हा ५० वर्षांपासून चालत आलेलाच आहे. पण याकडे साहित्य क्षेत्राचे लक्षच गेलेले नाही. पुरस्कार परत केला तेव्हा या गोष्टीकडे संपूर्ण देशाचे लक्ष गेले. प्रांताप्रांताप्रमाणे कलाव्यवहार वेगवेगळे आहेत. त्याला नावे ठेवणारे वेगवेगळे आहेत. अनुचित प्रकारांवर लेखक, साहित्यिकांनी भाष्य करावे,अशी समाजाची अपेक्षा असते, पण त्याबाबत समाजाचीही काही जबाबदारी आहे.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सांस्कृतिक बाबींच्या संवर्धनासाठी काही संस्था पुढे आल्या, काही लोप पावल्या. काही संस्थांचे कार्य अद्यापही सुरू असल्याचे सांगून वाजपेयी म्हणाले, सर्वसामान्य समाज आणि अभिजात समाज अशी एक वर्गवारी केली जाते. ज्यांचा संस्कृती, कलांशी काही संबंध नाही अशा व्यक्ती मंत्रालयात अधिकारीपदावर आहेत. कलांविषयी त्यांना काही प्रश्न विचारला ते चुकीचे उत्तर बेधडकपणे देतात. रसिकांना जसे स्वातंत्र्य आहे तसेच कलाकारांनाही आहे. रसिकांसमोर ज्या गोष्टी येतात त्याचाच ते विचार करतात, अशी टिप्पणी त्यांनी केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन तणाव नसावा, असेही ते म्हणाले. कला, राजकीय क्षेत्रात पवित्र कुणीच उरले नाही, राजकारणात सर्वच वाईट आहेत असेही नाही, असे डॉ. आगाशे म्हणाले. (प्रतिनिधी)दिल्लीत ३० जानेवारीला सत्याग्रहदेशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. याविरोधात ३० जानेवारी रोजी दिल्लीत सत्याग्रह करण्यात येणार असल्याचे अशोक वाजपेयी यांनी या वेळी सांगितले.