शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नाईकांवर गुन्हा का नाही?

By admin | Updated: May 4, 2016 02:48 IST

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम याच्या कारवायांबाबत माहिती होती, असे आपल्या पुस्तकामध्ये कबूल केले आहे. एखाद्या गुन्हेगारी कारवाईविषयी

मुंबई : उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम याच्या कारवायांबाबत माहिती होती, असे आपल्या पुस्तकामध्ये कबूल केले आहे. एखाद्या गुन्हेगारी कारवाईविषयी माहिती असतानादेखील राम नाईक यांनी ती दडवली असेल, तर त्यांच्या विरोधात भादंविच्या २०१ व २०२ अन्वये गुन्हे दाखल का केले जाऊ नयेत, असा सवाल महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.२००४ च्या लोकसभा निवडणुकीत कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व वसई-विरारचे तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यामुळेच काँग्रेसचे उमेदवार सिनेअभिनेते गोविंदा निवडून आले, असा गौप्यस्फोट राम नाईक यांनी त्यांच्या ‘चरैवेति चरैवेति’ या पुस्तकात केला आहे. हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता, असेही त्यांनी म्हटले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन २५ एप्रिल रोजी झाले होते.१९९९ ते २००४ दरम्यान केंद्रात मंत्रिपद भूषविलेल्या नाईक यांचा ‘विरार का छोरा’ अशी ओळख असलेल्या गोविंदाने ११ हजार मताने पराभव केला होता. या पराभवाच्या कटू आठवणी जागवताना नाईक यांनी म्हटले आहे की, तीन वेळा खासदारकी मिळाल्याने मुंबईच्या विकासात मोठे योगदान देऊनही पराभव झाल्याने मी व्यथित झालो होतो. तो पराभव पचविणे कठीण गेले. गोविंदाने दहशतीच्या जोरावर निवडणूक जिंकली, असा आरोपही त्यांनी केला आहे.यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत म्हणाले, ‘दाऊद इब्राहिमने गोविंदाला मदत केल्याची माहिती राम नाईक यांच्याकडे होती, तर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधायला हवा होता. भारतासाठी ‘मोस्ट वाँटेड’ असलेला आंतरराष्ट्रीय अतिरेकी दाऊद इब्राहिमच्या कारवायांची माहिती नाईक यांनी नेमकी पुस्तक प्रकाशनाच्या वेळीच का उघड केली? असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. अनेकदा पुस्तकाला प्रसिद्धी मिळावी, म्हणून लेखक सनसनाटी मजकूर लिहितात. नाईक यांनीदेखील हाच प्रकार केला असावा, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. केंद्रातील मंत्री पदापासून राज्यपाल पदापर्यंत अनेक संवैधानिक पदांची जबाबदारी सांभाळणाऱ्या राम नाईक यांच्याकडून हा प्रकार अपेक्षित नव्हता, असेही सावंत म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)हा तर मतदारांचा अवमान - गोविंदाराम नाईक यांनी केलेला आरोप गोविंदाने फेटाळून लावला. दाऊदच्या मदतीने मी निवडून आलो असे म्हणणे, हा तर मतदारांचा अवमान आहे. नाईक यांनी विनाकारण मला आणि मतदारांना बदनाम करू नये, असे गोविंदा म्हणाला.