शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

नाईकांवर गुन्हा का नाही?

By admin | Updated: May 4, 2016 02:48 IST

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम याच्या कारवायांबाबत माहिती होती, असे आपल्या पुस्तकामध्ये कबूल केले आहे. एखाद्या गुन्हेगारी कारवाईविषयी

मुंबई : उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम याच्या कारवायांबाबत माहिती होती, असे आपल्या पुस्तकामध्ये कबूल केले आहे. एखाद्या गुन्हेगारी कारवाईविषयी माहिती असतानादेखील राम नाईक यांनी ती दडवली असेल, तर त्यांच्या विरोधात भादंविच्या २०१ व २०२ अन्वये गुन्हे दाखल का केले जाऊ नयेत, असा सवाल महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.२००४ च्या लोकसभा निवडणुकीत कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व वसई-विरारचे तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यामुळेच काँग्रेसचे उमेदवार सिनेअभिनेते गोविंदा निवडून आले, असा गौप्यस्फोट राम नाईक यांनी त्यांच्या ‘चरैवेति चरैवेति’ या पुस्तकात केला आहे. हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता, असेही त्यांनी म्हटले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन २५ एप्रिल रोजी झाले होते.१९९९ ते २००४ दरम्यान केंद्रात मंत्रिपद भूषविलेल्या नाईक यांचा ‘विरार का छोरा’ अशी ओळख असलेल्या गोविंदाने ११ हजार मताने पराभव केला होता. या पराभवाच्या कटू आठवणी जागवताना नाईक यांनी म्हटले आहे की, तीन वेळा खासदारकी मिळाल्याने मुंबईच्या विकासात मोठे योगदान देऊनही पराभव झाल्याने मी व्यथित झालो होतो. तो पराभव पचविणे कठीण गेले. गोविंदाने दहशतीच्या जोरावर निवडणूक जिंकली, असा आरोपही त्यांनी केला आहे.यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत म्हणाले, ‘दाऊद इब्राहिमने गोविंदाला मदत केल्याची माहिती राम नाईक यांच्याकडे होती, तर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधायला हवा होता. भारतासाठी ‘मोस्ट वाँटेड’ असलेला आंतरराष्ट्रीय अतिरेकी दाऊद इब्राहिमच्या कारवायांची माहिती नाईक यांनी नेमकी पुस्तक प्रकाशनाच्या वेळीच का उघड केली? असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. अनेकदा पुस्तकाला प्रसिद्धी मिळावी, म्हणून लेखक सनसनाटी मजकूर लिहितात. नाईक यांनीदेखील हाच प्रकार केला असावा, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. केंद्रातील मंत्री पदापासून राज्यपाल पदापर्यंत अनेक संवैधानिक पदांची जबाबदारी सांभाळणाऱ्या राम नाईक यांच्याकडून हा प्रकार अपेक्षित नव्हता, असेही सावंत म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)हा तर मतदारांचा अवमान - गोविंदाराम नाईक यांनी केलेला आरोप गोविंदाने फेटाळून लावला. दाऊदच्या मदतीने मी निवडून आलो असे म्हणणे, हा तर मतदारांचा अवमान आहे. नाईक यांनी विनाकारण मला आणि मतदारांना बदनाम करू नये, असे गोविंदा म्हणाला.