शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नाईकांवर गुन्हा का नाही?

By admin | Updated: May 4, 2016 02:48 IST

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम याच्या कारवायांबाबत माहिती होती, असे आपल्या पुस्तकामध्ये कबूल केले आहे. एखाद्या गुन्हेगारी कारवाईविषयी

मुंबई : उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम याच्या कारवायांबाबत माहिती होती, असे आपल्या पुस्तकामध्ये कबूल केले आहे. एखाद्या गुन्हेगारी कारवाईविषयी माहिती असतानादेखील राम नाईक यांनी ती दडवली असेल, तर त्यांच्या विरोधात भादंविच्या २०१ व २०२ अन्वये गुन्हे दाखल का केले जाऊ नयेत, असा सवाल महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.२००४ च्या लोकसभा निवडणुकीत कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व वसई-विरारचे तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यामुळेच काँग्रेसचे उमेदवार सिनेअभिनेते गोविंदा निवडून आले, असा गौप्यस्फोट राम नाईक यांनी त्यांच्या ‘चरैवेति चरैवेति’ या पुस्तकात केला आहे. हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता, असेही त्यांनी म्हटले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन २५ एप्रिल रोजी झाले होते.१९९९ ते २००४ दरम्यान केंद्रात मंत्रिपद भूषविलेल्या नाईक यांचा ‘विरार का छोरा’ अशी ओळख असलेल्या गोविंदाने ११ हजार मताने पराभव केला होता. या पराभवाच्या कटू आठवणी जागवताना नाईक यांनी म्हटले आहे की, तीन वेळा खासदारकी मिळाल्याने मुंबईच्या विकासात मोठे योगदान देऊनही पराभव झाल्याने मी व्यथित झालो होतो. तो पराभव पचविणे कठीण गेले. गोविंदाने दहशतीच्या जोरावर निवडणूक जिंकली, असा आरोपही त्यांनी केला आहे.यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत म्हणाले, ‘दाऊद इब्राहिमने गोविंदाला मदत केल्याची माहिती राम नाईक यांच्याकडे होती, तर त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधायला हवा होता. भारतासाठी ‘मोस्ट वाँटेड’ असलेला आंतरराष्ट्रीय अतिरेकी दाऊद इब्राहिमच्या कारवायांची माहिती नाईक यांनी नेमकी पुस्तक प्रकाशनाच्या वेळीच का उघड केली? असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. अनेकदा पुस्तकाला प्रसिद्धी मिळावी, म्हणून लेखक सनसनाटी मजकूर लिहितात. नाईक यांनीदेखील हाच प्रकार केला असावा, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. केंद्रातील मंत्री पदापासून राज्यपाल पदापर्यंत अनेक संवैधानिक पदांची जबाबदारी सांभाळणाऱ्या राम नाईक यांच्याकडून हा प्रकार अपेक्षित नव्हता, असेही सावंत म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)हा तर मतदारांचा अवमान - गोविंदाराम नाईक यांनी केलेला आरोप गोविंदाने फेटाळून लावला. दाऊदच्या मदतीने मी निवडून आलो असे म्हणणे, हा तर मतदारांचा अवमान आहे. नाईक यांनी विनाकारण मला आणि मतदारांना बदनाम करू नये, असे गोविंदा म्हणाला.