शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आयपीएल कशाला? हायकोर्टाचा BCCIला सवाल

By admin | Updated: April 6, 2016 15:02 IST

राज्यभरात भीषण दुष्काळ असताना आयपीएलचे सामने राज्यात खेळवणे किती योग्य आहे ्सा सवाल हायकोर्टाने बीसीसीआयला विचारला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - राज्यभरात भीषण दुष्काळ असताना, काही जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचे आदेशही देण्यात आलेले असताना आयपीएलचे सामने राज्यात खेळवणे किती योग्य आहे? असा सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्याचा सल्ला दिला. दुष्काळी स्थिती असताना पाण्याचा (असा) अपव्यय योग्य नाही. तुम्ही पाणी असे वाया कसे घालवू शकता? (बीसीसीआयच्या) आयपीएलच्या सामन्यांपेक्षा राज्यातील लोक जास्त महत्त्वाचे आहेत, असेही न्यायालयाने सुनावले. 
याप्रकरणी 'लोकसत्ता मुव्हमेंट’ या एनजीओने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ' बीसीसीआयला होणारा पाणीपुरवठा कापल्यासच तुम्हाला (परिस्थिती) समजेल' अशी पुस्ती जोडत न्यायालयाने बीसीसीआयला खडसावले. 
आयपीएलचे सामने खेळविण्यात येणाऱ्या मुंबई, नागपूर आणि पुणे येथील मैदानांवरील खेळपट्यांच्या देखभालीसाठी ६० लाख लीटर पाणी वापरण्यात येईल. एकीकडे पाण्याअभावी मराठवाडा, विदर्भ भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. त्यामुळे प्रक्रिया केलेले पाणी वापरावे, अशी मागणी 'लोकसत्ता मुव्हमेंट’ या एनजीओने केली होती. 
येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे.