शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

जयस्वाल यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही

By admin | Updated: June 7, 2017 04:04 IST

२० दिवस उलटल्यावर आता आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने या आंदोलनाचे नेतृत्व करणारे दीपेश म्हात्रे संतप्त झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : डोंबिवलीमधील फेरीवाल्यांवर महापालिका प्रशासन कारवाई करीत नाही म्हणून युवासेनेने फेरीवाल्यांविरुद्ध केलेल्या आंदोलनास २० दिवस उलटल्यावर आता आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने या आंदोलनाचे नेतृत्व करणारे दीपेश म्हात्रे संतप्त झाले. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कायदा हातात घेऊन फेरीवाले, रिक्षावाले यांच्यावर हात उचलला तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. मग त्यांना एक न्याय व आम्हा लोकप्रतिनिधींना एक न्याय हा दुटप्पीपणा कशाला, असा सवाल त्यांनी पोलिसांना केला आहे.स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांचा माल उधळून लावत युवासेनेने आंदोलन केले होते. २० दिवस उलटून गेल्यावर शिवसेनेच्या दहा जणांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पोलीस कारवाईचा निषेध करण्याकरिता युवा सेनेचे कार्यकर्ते जामीन घेणार नसल्याचे म्हात्रे यांनी जाहीर केले. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. केंद्रापासून महापालिकेपर्यंत हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असून सध्या या दोन्ही पक्षांचे परस्परांशी पटत नाही. महापालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाही अधिकारी फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करीत नसल्याने शिवसेना रस्त्यावर उतरली. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी कार्यकर्त्यासह डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांचा माल फेकून देत आंदोलन केले. या ठिकाणी फेरीचा धंदा करायचा नाही असा दम त्यांनी भरला. हे आंदोलन सुरु असताना पोलिसांची गाडी मागून आली व पोलिसांनी युवा सेनेच्या चार कार्यकर्त्याना ताब्यात घेतले होते. या आंदोलन प्रकरणी फेरीवाला नागेंद्र सोनकर याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, तो कामत मेडिकलच्या गल्लीत २२ वर्षापासून फेरीचा व्यवसाय करीत आहे. युवा सेनेच्या म्हात्रे याने त्याची कॉलर पकडून याठिकाणी धंदा करायचा नाही, असा दम भरला. कार्यकर्त्यांनी सोनकर यांच्या ३५ हजार रुपये किंमतीच्या मालाची नासधूस केली. सोनकर याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दीपेश म्हात्रे, गणेश मिसाळ, नितीन पवार, तेजस तुंगारे, भाई पाणीवडीकर, विजय राजपूत, सुभाष घाग,अंकित जाधव, नीरज साहिल यांच्या विरोधात सोनकर यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. म्हात्रे म्हणाले की, आंदोलन झाले त्याच दिवशी आमच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याऐवजी उशिराने दाखल करण्यात आलेले आहेत. पोलिसांना उशिराने जाग का आली ? भाजपाच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी कारवाई केली. फेरीवाले, रिक्षावाले यांची कॉलर धरुन ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कारवाई केली. त्यांचे चित्रीकरण वाहिन्यांवर दिसले व वृत्तपत्रांमध्ये फोटो प्रसिद्ध झाले. यामुळे त्यांच्यावर मीडियाकडून कौतुकाचा वर्षाव केला गेला. मात्र त्यांनी फेरीवाल्यांवर हात उचलून कायदा हातात घेतल्याबद्दल जयस्वाल यांच्या विरोधात कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल केला, असा सवाल म्हात्रे यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना केला. पोलिसांची कारवाई ही भेदभाव दर्शविणारी आहे. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्याना अटक केली तरी चालेल, मात्र पोलिसांच्या दुटप्पी वर्तनाच्या निषेधार्थ कार्यकर्ते जामीन घेणार नाही, असे त्यांनी जाहीर केले.