शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रपूजा हवी कशाला?

By admin | Updated: October 25, 2015 01:40 IST

देश स्वतंत्र झाला आहे. देशात आपलेच सरकार आहे. परकीय देशाने आक्रमण केले तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी सैन्य आहे. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहेत.

नागपूर : देश स्वतंत्र झाला आहे. देशात आपलेच सरकार आहे. परकीय देशाने आक्रमण केले तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी सैन्य आहे. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहेत. एकूणच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व यंत्रणा सज्ज आहे. या स्थितीत जेव्हा शस्त्राची पूजा केली जाते तेव्हा लोकांनी शस्त्र वापरावे, असा संदेश जातो. त्यातून हिंसक प्रवृत्ती वाढते. क्रूरता वाढते. तेव्हा शस्त्रपूजेची आवश्यकता काय? यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) देशात अराजकतेला आमंत्रण द्यायचे आहे का? असा थेट सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी केला.शनिवारी रविभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, फरिदाबाद येथे एका दलित कुटुंबाच्या घराला आग लावून दोन चिमुकली मुले जाळण्यात आली. ते या शस्त्रपूजेचेच प्रतीक आहेत. जोपर्यंत शस्त्रपूजा सुरू राहील, तोपर्यंत देशात हिंसकवृत्ती जोपासली जाईल. ही हिंसकवृत्ती काही प्रमाणात मुस्लिमांंच्या विरोधात गोहत्येच्या रूपात वापरली जाते तर दलितांच्या विरोधात क्रूरतेने वापरली जाते. शस्त्रपूजेचे परिणाम आता उघडपणे दिसू लागले आहेत. लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. स्वत:च्या रक्षणासाठी त्यांनाही शस्त्राची गरज वाटू लागली आहे. शस्त्र वापरण्याचा परवाना मिळावा म्हणून माझ्याकडे मागील महिनाभरात तब्बल ४० अर्ज आले आहेत. आरएसएस आतापर्यंत काय करत होता, हे महत्त्वाचे नाही. परंतु सध्या केंद्रात आणि राज्यात आरएसएसप्रणीत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे व वागणे हे शांततेचेच असायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले. चार्वाकापासून ते तुकारामापर्यंत यांनीसुद्धा धर्म सांगितला आहे. परंतु त्यात शस्त्राची पूजा कुठेही सांगितलेली नाही. काही राजघराण्यात शस्त्रपूजा केली जाते. परंतु ती शस्त्रपूजा ही व्यक्तिगत बाब असते. मनुवादी जातीव्यवस्थेचा विचार केला तर अवजारांची पूजा केली जाते. परंतु ती त्यांच्या रोजच्या वापराची असतात. ती शस्त्रे नाहीत. तसेच जातीव्यवस्थेमध्ये ब्राह्मणांना तर कुठलेही शस्त्र वापरण्याची परवानगीच नाही. इतिहासात अशोक विजयादशमीचा दिवस आहे. त्या दिवशी सम्राट अशोकाने शस्त्रे खाली टाकली होती. म्हणजेच तो दिवस हिंसा त्यागण्याचा दिवस आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिकरीत्या शस्त्रपूजा का केली जात आहे, याचा खुलासा मोहन भागवत यांनी करावा, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.(प्रतिनिधी)आठवले-पासवान हे बुजगावणेवाजपेयी यांच्या काळात भाजपची पर्यायी घटना मी स्वत: सभागृहात उघड केली होती. याची जाणीव खा. रामदास आठवले, रामविलास पासवान आणि उदित राज यांना आहे. भाजपला घटना बदलवायची आहे, हे उघड असताना ते त्यांच्यासोबत आहेत. एखाद दुसऱ्या मुद्यावर ते विरोध करतात. तेव्हा सत्तेत राहायचे व विरोधात बोलायचे हे काही बरोबर नाही. धोरण पटत नसेल तर बाहेर पडा, बुजगावण्यासारखे राहू नका, असे अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.