शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओ’त दलाल हवे कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2023 12:43 IST

महाराष्ट्राचा परिवहन आयुक्त म्हणून सात-आठ महिने कार्यभार सांभाळताना मला त्या विभागाचे दिसलेले अंतरंग या बाबतीत महत्त्वाचे आहे.

महेश झगडे, माजी प्रधान सचिव

रस्ते अपघातांचे ढोबळ विश्लेषण केलेतर 75 टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू हे अतिवेगाने वाहन चालविण्यामुळे किंवा वाहन चालकांच्या चुकीमुळे होतात. चालकांना वाहन परवाना देण्याचे अधिकार परिवहन म्हणजेच आरटीओ विभागाकडून दिले जातात. महाराष्ट्राचा परिवहन आयुक्त म्हणून सात-आठ महिने कार्यभार सांभाळताना मला त्या विभागाचे दिसलेले अंतरंग या बाबतीत महत्त्वाचे आहे.

देशात दरवर्षी साधारणपणे दीड लाख लोक रस्ते अपघातात मृत्यू पावतात. दररोज १,१३० अपघात होतात व त्यात ४२२ मृत्यू म्हणजेच दर तासाला ४७ अपघातांत १८ लोकांचा मृत्यू होतो. जपान, इंग्लंडच्या तुलनेत दर लाख लोकसंख्येमागे भारताचे मृत्यूचे प्रमाण जवळजवळ चौपट आहे. परिवहन आयुक्त पदावर रुजू होण्यापूर्वी आठ-दहा दिवस अर्धी पँट, मळका टी-शर्ट व कॅप घालून सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुणे, ठाणे, अंधेरी, ताडदेव आणि वडाळा येथील आरटीओ कार्यालयात जाऊन मी सामान्य नागरिक म्हणून निरीक्षण केले. कटिंग चहा प्यायला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एजंटमार्फत कशा सर्व गोष्टी ‘विनासायास’ पार पडतात. 

एजंटचे दप्तर कसे असते, ते अर्जदारांना कसे ‘पटवून’ देतात, काम करून देण्याची रोख रक्कम किती, अर्जंट कामाचा अतिरिक्त खर्च किती? आदी सर्व जवळून पाहिले. मी परिवहन आयुक्त या पदावर रुजू झाल्यानंतर मी माझ्या आरटीओ कार्यालयातील अनौपचारिक प्रत्यक्ष भेटीच्या अनुभवावरून यंत्रणेला प्रश्न विचारायला सुरूवात केली. त्यावर महाराष्ट्राचा परिवहन विभाग देशात कसा अग्रणी आहे आणि सर्व काही व्यवस्थित चालले असल्याचे मला कनिष्ठांकडून पुरेपूर पटवून देण्याचा प्रयत्न झाला. मी मनातल्या मनात हसत होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर हा विभाग अवैधरीत्या पैसे कमविण्याचे कुरण आहे आणि ते जनतेला माहिती नाही, असे नाही.

अर्जदार, एजंट आणि यंत्रणा यांच्यामध्ये पैशांचे ‘सामंजस्य’ झाले तर वाहन चालविण्याची क्षमता विचारातच घेतली जात नाही व त्यामुळे बहुतांश वाहनचालक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात, अशी माहिती मिळाली. त्यामुळे मानवविरहित स्वयंचलित यंत्रणेमार्फत सेन्सर बसविलेल्या ट्रॅकवर परीक्षा घेण्याचा प्रयोग केंद्र शासनाच्या सीआयआरटी या पुणे येथील संस्थेत केला. त्यामध्ये जवळजवळ ६५ टक्के अर्जदार वाहन चालविण्यामध्ये अनुत्तीर्ण झाले. 

इतकेच काय एका परीक्षेतून दिसले की, दहा-पंधरा वर्ष एसटी महामंडळात काम केलेल्या चालकांपैकी ५५ टक्के चालक त्यांच्याच स्वयंचलित मानवी ट्रॅकवर अनुत्तीर्ण झाले होते. ही स्वयंचलित व मानवविरहित वाहनचालक परीक्षा सर्व जिल्ह्यांमध्ये उभारून ती कार्यरत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परिवहन सचिव, परिवहन आयुक्तांपासून सर्व यंत्रणेला हे माहिती असूनही त्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. त्याचे दुष्परिणाम आपण अनुभवत आहोत. प्रत्येकाचे शासकीय फी व्यतिरिक्त मेनू कार्डप्रमाणे एजंटांचे दर ठरलेले असतात.

‘लोकमत’मुळे ‘ते’ महाराष्ट्राला समजले

एका प्रकरणात मी गुजरात सीमेवरील आच्छाड नाक्यावर गुप्तपणे अचानक वाहनातून कार्यालयाला न कळवता जाऊन पाहणी केली. तेथे अवैधपणे बॅगमध्ये पैसे जमा करण्यात यंत्रणा गुंग असल्याचा प्रकारही पाहिला होता आणि तो ‘लोकमत’ वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला नंतर समजला. भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर प्रशासकीय सुधारणा करून महसूल, पोलिस किंवा अन्य विभागांप्रमाणे सर्व कामकाजाची भौगोलिक जबाबदारी ठरावीक अधिकाऱ्यांना सोपवून केवळ अवैध पैसे जमवण्याची ‘भरारी पथक’ ही प्रशासकीय प्रथा मोडीत काढण्याचा व विभागीय स्तरावर परीरक्षण करण्याचा प्रस्ताव मी शासनास दिला होता. मात्र तो अद्याप प्रलंबित आहे.

एजंटांशिवाय कामकाज होऊ शकते 

मी एके दिवशी अचानक वरळी येथील आरटीओ कार्यालयात गेलो. तेथे कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही एजंटांचा घोळका काम करताना, हिशोब जुळवताना दिसला. कोण आले आहे हे समजल्यावर पळापळ सुरू झाली. अनेक एजंटांची दप्तरे ताब्यात घेतली. त्यातून किती अवैध पैसे या विभागात दरवर्षी संकलित होतात, त्याचा अंदाज घेतला. हा आकडा प्रचंड मोठा आहे. त्याची केवळ चर्चा न करता तो आकडा राज्य शासनास पत्राने कळवून या बेकायदा गोष्टीस, खरे म्हणजे भ्रष्टाचारास आळा घालण्यास सुरूवात केली. संपूर्ण राज्यात गहजब माजला. त्यानंतर सर्व कार्यालये एजंटमुक्त होण्यास केवळ दोन-तीन महिने पुरेसे झाले.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस