शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओ’त दलाल हवे कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2023 12:43 IST

महाराष्ट्राचा परिवहन आयुक्त म्हणून सात-आठ महिने कार्यभार सांभाळताना मला त्या विभागाचे दिसलेले अंतरंग या बाबतीत महत्त्वाचे आहे.

महेश झगडे, माजी प्रधान सचिव

रस्ते अपघातांचे ढोबळ विश्लेषण केलेतर 75 टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू हे अतिवेगाने वाहन चालविण्यामुळे किंवा वाहन चालकांच्या चुकीमुळे होतात. चालकांना वाहन परवाना देण्याचे अधिकार परिवहन म्हणजेच आरटीओ विभागाकडून दिले जातात. महाराष्ट्राचा परिवहन आयुक्त म्हणून सात-आठ महिने कार्यभार सांभाळताना मला त्या विभागाचे दिसलेले अंतरंग या बाबतीत महत्त्वाचे आहे.

देशात दरवर्षी साधारणपणे दीड लाख लोक रस्ते अपघातात मृत्यू पावतात. दररोज १,१३० अपघात होतात व त्यात ४२२ मृत्यू म्हणजेच दर तासाला ४७ अपघातांत १८ लोकांचा मृत्यू होतो. जपान, इंग्लंडच्या तुलनेत दर लाख लोकसंख्येमागे भारताचे मृत्यूचे प्रमाण जवळजवळ चौपट आहे. परिवहन आयुक्त पदावर रुजू होण्यापूर्वी आठ-दहा दिवस अर्धी पँट, मळका टी-शर्ट व कॅप घालून सकाळपासून संध्याकाळपर्यंत पुणे, ठाणे, अंधेरी, ताडदेव आणि वडाळा येथील आरटीओ कार्यालयात जाऊन मी सामान्य नागरिक म्हणून निरीक्षण केले. कटिंग चहा प्यायला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एजंटमार्फत कशा सर्व गोष्टी ‘विनासायास’ पार पडतात. 

एजंटचे दप्तर कसे असते, ते अर्जदारांना कसे ‘पटवून’ देतात, काम करून देण्याची रोख रक्कम किती, अर्जंट कामाचा अतिरिक्त खर्च किती? आदी सर्व जवळून पाहिले. मी परिवहन आयुक्त या पदावर रुजू झाल्यानंतर मी माझ्या आरटीओ कार्यालयातील अनौपचारिक प्रत्यक्ष भेटीच्या अनुभवावरून यंत्रणेला प्रश्न विचारायला सुरूवात केली. त्यावर महाराष्ट्राचा परिवहन विभाग देशात कसा अग्रणी आहे आणि सर्व काही व्यवस्थित चालले असल्याचे मला कनिष्ठांकडून पुरेपूर पटवून देण्याचा प्रयत्न झाला. मी मनातल्या मनात हसत होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर हा विभाग अवैधरीत्या पैसे कमविण्याचे कुरण आहे आणि ते जनतेला माहिती नाही, असे नाही.

अर्जदार, एजंट आणि यंत्रणा यांच्यामध्ये पैशांचे ‘सामंजस्य’ झाले तर वाहन चालविण्याची क्षमता विचारातच घेतली जात नाही व त्यामुळे बहुतांश वाहनचालक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात, अशी माहिती मिळाली. त्यामुळे मानवविरहित स्वयंचलित यंत्रणेमार्फत सेन्सर बसविलेल्या ट्रॅकवर परीक्षा घेण्याचा प्रयोग केंद्र शासनाच्या सीआयआरटी या पुणे येथील संस्थेत केला. त्यामध्ये जवळजवळ ६५ टक्के अर्जदार वाहन चालविण्यामध्ये अनुत्तीर्ण झाले. 

इतकेच काय एका परीक्षेतून दिसले की, दहा-पंधरा वर्ष एसटी महामंडळात काम केलेल्या चालकांपैकी ५५ टक्के चालक त्यांच्याच स्वयंचलित मानवी ट्रॅकवर अनुत्तीर्ण झाले होते. ही स्वयंचलित व मानवविरहित वाहनचालक परीक्षा सर्व जिल्ह्यांमध्ये उभारून ती कार्यरत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परिवहन सचिव, परिवहन आयुक्तांपासून सर्व यंत्रणेला हे माहिती असूनही त्याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. त्याचे दुष्परिणाम आपण अनुभवत आहोत. प्रत्येकाचे शासकीय फी व्यतिरिक्त मेनू कार्डप्रमाणे एजंटांचे दर ठरलेले असतात.

‘लोकमत’मुळे ‘ते’ महाराष्ट्राला समजले

एका प्रकरणात मी गुजरात सीमेवरील आच्छाड नाक्यावर गुप्तपणे अचानक वाहनातून कार्यालयाला न कळवता जाऊन पाहणी केली. तेथे अवैधपणे बॅगमध्ये पैसे जमा करण्यात यंत्रणा गुंग असल्याचा प्रकारही पाहिला होता आणि तो ‘लोकमत’ वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला नंतर समजला. भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर प्रशासकीय सुधारणा करून महसूल, पोलिस किंवा अन्य विभागांप्रमाणे सर्व कामकाजाची भौगोलिक जबाबदारी ठरावीक अधिकाऱ्यांना सोपवून केवळ अवैध पैसे जमवण्याची ‘भरारी पथक’ ही प्रशासकीय प्रथा मोडीत काढण्याचा व विभागीय स्तरावर परीरक्षण करण्याचा प्रस्ताव मी शासनास दिला होता. मात्र तो अद्याप प्रलंबित आहे.

एजंटांशिवाय कामकाज होऊ शकते 

मी एके दिवशी अचानक वरळी येथील आरटीओ कार्यालयात गेलो. तेथे कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही एजंटांचा घोळका काम करताना, हिशोब जुळवताना दिसला. कोण आले आहे हे समजल्यावर पळापळ सुरू झाली. अनेक एजंटांची दप्तरे ताब्यात घेतली. त्यातून किती अवैध पैसे या विभागात दरवर्षी संकलित होतात, त्याचा अंदाज घेतला. हा आकडा प्रचंड मोठा आहे. त्याची केवळ चर्चा न करता तो आकडा राज्य शासनास पत्राने कळवून या बेकायदा गोष्टीस, खरे म्हणजे भ्रष्टाचारास आळा घालण्यास सुरूवात केली. संपूर्ण राज्यात गहजब माजला. त्यानंतर सर्व कार्यालये एजंटमुक्त होण्यास केवळ दोन-तीन महिने पुरेसे झाले.

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस