शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

अशा सरकारचा चहा तरी कशाला प्यायचा?

By admin | Updated: July 12, 2015 02:49 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, एफआरपी नुसार ऊसाला भाव नाही, कारागृहातून कैदी पळून जात आहेत, विषारी दारु पिऊन १०० लोक मेले तरी सरकार संवेदनशिल नाही त्यामुळे अशा

- अतुल कुलकर्णी,  मुंबईशेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, एफआरपी नुसार ऊसाला भाव नाही, कारागृहातून कैदी पळून जात आहेत, विषारी दारु पिऊन १०० लोक मेले तरी सरकार संवेदनशिल नाही त्यामुळे अशा सरकारचा अधिवेशनाच्या आधी चहा तरी कशाला प्यायचा अशी भूमिका घेत सोमवारपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होत असलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात विरोधक आहेत.गेल्या आठ महिन्याच्या काळात भाजपा शिवसेना सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर आहे. स्वच्छ कारभाराची आणि तात्काळ निर्णयाची हमी देणारे हे सरकार आठ महिन्यातच सपशेल अपयशी ठरल्याची अनेक उदाहरणे आमच्याकडे आहेत जी आम्ही सभागृहात मांडू, असे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.रविवारी दुपारी विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची बैठक होईल. त्यात अधिवेशनाच्या काळात कोणते विषय कोणत्या दिवशी सभागृहात मांडायचे यावर चर्चा होईल. त्यानंतर दुपारी विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे.लोकमतशी बोलताना विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी म्हणून राज्यभर आंदोलन केले. तरीही सरकारला जाग येत नाही. शेतकरी उपाशी असताना सरकारची सरकारची चहा बिस्कीटे कशाला घ्यायची असे आपले मत आहे. मात्र उद्या होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होईल आणि आम्ही तसे सरकारला कळवून टाकू. मुख्यमंत्र्यांच्याच गावातजेलमधून कैदी पळून जातात, मुंबईत विषारी दारुने १०० बळी घेतले तरीही मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि मनपा आयुक्त तेथे भेट द्यायलाही गेले नाहीत इतके हे सरकार असंवेदनशिल बनले आहे असेही विखे म्हणाले.विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे लोकमतशी बोलताना म्हणाले, शेतकरी संकटात आहे त्यांच्या कर्जमाफीची पहिली मागणी पक्षाचे नेते शरद पवार यांनी केली होती. त्यावर सरकारला धारेवर धरु, घोटाळ्यातल्या मंत्र्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी त्या पदावर राहू नये अशी मागणी आपण करणार आहोत आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनल्याची अनेक उदाहरणे आम्ही अधिवेशनात मांडू असेही ते यावेळी म्हणाले.