शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही? - हायकोर्ट

By admin | Updated: February 3, 2015 01:31 IST

मावळ गोळीबार प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची अद्याप खातेनिहाय कारवाई का झाली नाही, असा सवाल करीत उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़

मुंबई : मावळ गोळीबार प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची अद्याप खातेनिहाय कारवाई का झाली नाही, असा सवाल करीत उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़ही घटना होऊन चार वर्षे उलटली आहेत़ यासाठी चार पोलीस अधिकारी दोषी असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे असताना या अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई न होणे ही गंभीर बाब आहे़ त्यामुळे यासाठी शासनाला दंड ठोठवायचा की नाही, हे पुढील सुनावणीला आम्ही जाहीर करू, असे न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले़या प्रकरणी ईश्वर खंडेलवाल यांनी जनहित याचिका केली आहे़ २०११ मध्ये पवना धरणाच्या पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला़ यात काही शेतकऱ्यांचा बळी गेला़ या निर्घृण घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार करण्यात आली़ त्याची दखल घेत न्यायालयाने याच्या चौकशीचे आदेशही दिले़ तरीही कारवाई होत नसल्याने उच्च न्यायालयानेच या कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली़ याची दखल घेत न्यायालयाने याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश शासनाला दिले़ त्यानंतर या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीश एम़ जी़ गायकवाड यांच्यामार्फत झाली़ पण यासाठी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई झाली नसल्याचे खंडेलवाल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने शासनाला चांगलेच फटकारले़ (प्रतिनिधी)