शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगपतींची कर्ज माफ करता, शेतक-यांची का नाही ?: पृथ्वीराज चव्हाण

By admin | Updated: April 3, 2017 22:04 IST

सरकार देशातील उद्योगपतींची दीड लाख कोटींची कर्ज माफ करू शकते, मग अडचणीत असलेल्या शेतक-यांची ३० हजार कोटींची कर्ज माफ का करत नाही ?

ऑनलाइन लोकमत
सोलापूर/ पुणे, दि. 3- सरकार देशातील उद्योगपतींची दीड लाख कोटींची कर्ज माफ करू शकते, मग अडचणीत असलेल्या शेतक-यांची ३० हजार कोटींची कर्ज माफ का करत नाही ? असा खडा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 
विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेत सहभागी नेत्यांनी आज सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील मंगळवेढा, पंढरपूर,  इंदापूर या ठिकाणी शेतक-यांशी संवाद साधला त्यानंतर जाहीर सभेत बोलताना चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भाजप सरकारने शेतक-यांची फसवणूक केली असून निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले असा प्रश्न चव्हाण यांनी सरकारला केला. या सरकारला सळो की पळो करून सोडल्याशिवाय सरकार शेतक-यांसाठी काही करणार नाही. त्यामुळे संघर्ष यात्रेतून सुरु झालेला हा कर्जमुक्तीचा लढा सर्वांनी मिळून आणखी तीव्र करावा असे आवाहन त्यांनी शेतक-यांना केले. 
यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की,  शेतक-यांचा कुठला पक्ष नाही, शेती हाच त्याचा पक्ष आहे म्हणून त्याची कर्जमाफी झाली पाहीजे. शिवसेनेचे मंत्री सांगतात राजीनामे खिशात घेऊन फिरतो. आज शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त मी उध्दव ठाकरे यांना आवाहन करतो की, त्यांना शेतक-यांबद्दल आस्था असेल तर आजच सत्तेतून बाहेर पडावे आणि संघर्ष यात्रेत सहभागी व्हावे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्य सरकारचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, हे सरकार  निवडणूका आल्या की आश्वासनाचे गाजर दाखविण्याशिवाय काही करत नाही. ही शेतकरी समाजाच्या अस्तित्वाची लढाई असून शेतकरी पेटून उठला तर सरकार जळून खाक होईल.
पीपल्स रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे आणि समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी, शेकाप नेते प्रविण गायकवाड यांनी शेतक-यांना कर्जमाफी मिळेपर्यंत हा लढा सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे. 
दरम्यान आज संघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील शेतक-यांनी संघर्ष यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावोगावी शेतक-यांनी संघर्ष यात्रेचे स्वागत केले. त्यानंतर सर्व नेत्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यासाठी सरकारला सुबुध्दी द्यावी असे साकडे घातले. पश्चिम  महाराष्ट्राचा प्रवास पूर्ण करून संघर्ष यात्रा उद्या कोकणात दाखल होणार आहे. काँग्रेस,  राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लीकन पार्टी,  एमआयएम, या सर्व विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या यात्रेत सहभागी झाले आहेत.