शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

मोदी...चार वर्षात अयोध्येत का गेले नाही? उद्धव यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 06:36 IST

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी इंधन दरवाढ, महागाई, काश्मीर, राज्यावर आलेले दुष्काळाचे सावट आणि राम मंदिराच्या मुद्यावरून केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले.

मुंबई : जगभर फिरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी चार वर्षात एकदाही अयोध्येला का गेले नाही, असा सवाल करत, आता राममंदिराची उभारणी शिवसैनिकच करतील आणि आपण स्वत:ही २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहोत, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी इंधन दरवाढ, महागाई, काश्मीर, राज्यावर आलेले दुष्काळाचे सावट आणि राम मंदिराच्या मुद्यावरून केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले. प्रत्येक भारतीयांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार हा जसा तुमचा निवडणूक जुमला होता तसाच राममंदिरही जुमलाच होते हे तुम्ही जाहीर करून टाका. दरवर्षी आपण रावण जाळतो पण तो पुन्हा उभा राहतो. राममंदिर मात्र बनत नाही. राममंदिराची आठवण करून देण्यासाठी मी आयोध्येला येतोय, असे ते मोदींना उद्देशून म्हणाले.

रा.स्व.संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमी उत्सवात राममंदिर उभारण्याचा निर्धार केल्याबद्दल ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. बाबरी मशीद पडली तेव्हा भलेभले शेपूट घालून पळाले होते पण तेव्हा उसळलेला आगडोंब शिवसैनिकांनीच रोखला होता, असे ते म्हणाले.ठाकरेंच्या भाषणात मुख्य लक्ष्य होते ते पंतप्रधान मोदीच. गोरगरीब जनता तुमच्याकडे शेवटची आशा म्हणून पाहत आहे. त्यावर तुम्ही पाणी फेरले तर जनतेच्या ज्वालामुखीत जळून नष्ट व्हाल. देशाच्या पत्रिकेत सध्या शनि, मंगळ वक्री झालेले आहेत अन् त्यांना सरळ करण्याची ताकद शिवसैनिकांमध्येच आहे, असे त्यांनी मोदी, शहा यांचे नाव न घेता सुनावले. उद्या तुम्ही शिर्डीत येत आहात, तिकडच्या दुष्काळी भागातही जा. थापा मारू नका त्यांना काहीतरी देऊन जा, असे आवाहन त्यांनी मोदींना केले.

व्यासपीठावर युवा नेते आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री अनंत गीते, दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे हे राज्यातील मंत्री, खा.चंद्रकांत खैरे, सुधीर जोशी, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनाही सुनावलेकर्नाटकमध्ये सरकार दुष्काळ जाहीर करून मोकळे झाले. इथे आपले मुख्यमंत्री अहवालच मागवत बसले आहेत. मग ते अभ्यास करतील, काथ्याकूट करत बसतील. दुष्काळ व्यवस्थापनाचा अजून मागमूस नाही. दुष्काळ तातडीने जाहीर केला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले.सत्तेत मात्र कायमच!केंद्र आणि राज्यात शिवसेना भाजपाबरोबर सत्तेत कायम राहणार असल्याचे ठाकरे यांच्या भाषणावरून स्पष्ट झाले. जनतेसाठी सरकारविरुद्ध बोलतच राहणार हे सांगताना त्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याविषयी काहीही विधान केले नाही. सत्तेला चिकटून असतात म्हणून आमच्यावर टीका करता मग आज रा.स्व.संघही सरकारविरोधात बोलू लागला आहे. त्यांच्यामुळे मोदी सत्तेत आले मग मोदींना सत्तेतून घालवा, असे संघाला सांगणार का असा सवाल त्यांनी टीकाकारांना केला. संघ कानपिचक्या देतो आम्ही थेट कानाखाली आवाजच काढतो, असेही ते म्हणाले.नेत्यांच्या भाषणाला उद्धव यांचा खोखा.संजय राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भाषणामध्ये भाजपा आणि नरेंद्र मोदींना शिवसेना गाडणार आणि भगवा फडकवणारच असे वारंवार त्वेषाने सांगितले. उद्धव ठाकरे यांनी मात्र, अशी भाजपा वा मोदींना गाडण्याची कुठलीही भाषा केली नाही. उलट, तुमचा पराभव झाला पाहिजे अशी विकृती आमच्या मनात नाही पण गोरगरीब जनतेच्या आशेवर पाणी फिरले तर ती ज्वालामुखी बनून तुम्हाला नष्ट करेल असे ते म्हणाले. पाच राज्यांतील निवडणुकीनंतर महागाई, पेट्रोलचे दर कमी करणार अशी हमी देणार असाल तर तुम्ही न बोलविता तुमच्या प्रचाराला मी येईन, असे ठाकरे म्हणाले.मी टू.. कानाखाली आवाज काढामहिलांवरील अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करताना ‘मी टू’बाबत ते म्हणाले की, हा गंभीर विषय आहे. ज्यांच्याविषयी तक्रारी आहेत त्यांची चौकशी झालीच पाहिजे आणि दोषींना फासावर लटकवलेच पाहिजे पण जिथे निर्भया, कोपर्डीच्या दोषींना फाशी झाली नाही तिथे पाच-दहा वर्षांनी मी टू ची तक्रार करून काय होणार? त्यापेक्षा मी टूमधील लोकांच्या तिथेच कानाखाली आवाज काढून मोकळे व्हा, असे आवाहनदेखील त्यांनी केले.नितीनजी, हे शोभत नाही !निवडणुकीत जिंकू असे वाटले नव्हते; त्यामुळे आम्ही आश्वासने देत सुटलो या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचा उद्धव यांनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले, असा कोडगेपणा, निर्लज्जपणा मराठी माणूस आणि मराठी संस्कृतीला शोभणारा नाही.