शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

बॉलिवूडवाल्यांच्या नरड्यास आता बूच का लागले ? उद्धव ठाकरे संतापले

By admin | Updated: March 17, 2017 08:37 IST

नाहीद आफरीन प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बॉलिवूडला चांगलंच धारेवर धरलं असून नरडय़ास आता बूच का लागले आहे? असा संतप्त सवाल विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - नाहीद आफरीन प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बॉलिवूडला चांगलंच धारेवर धरलं असून एरवी अभिव्यक्तिस्वातंत्र्य, असहिष्णुता वगैरेंबद्दल घसे फोडणाऱ्या मंडळींनी याप्रकरणी स्वीकारलेल्या सोयिस्कर मौनाचे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरेंसाठी छाती पिटणाऱयांत तुमचे ते बॉलीवूडवालेही एरवी आघाडीवर असतात, मग आफरीनवर होत असलेल्या अन्यायाबाबत त्या बॉलीवूडवाल्यांच्या नरडय़ास आता बूच का लागले आहे? असा संतप्त सवाल विचारला आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला आहे. 
 
(ISIS विरोधात गायल्याने 16 वर्षांच्या गायिकेविरोधात 46 मौलानांचा फतवा)
 
बॉलिवूडवाल्यांवर टीका - 
संजय लीला भन्साळीच्या ‘पद्मावती’ चित्रपटातील महिला विटंबनेच्या विरोधात ज्यांनी आवाज उठवला त्यांच्या विरोधात काहींनी थेट संसदेत प्रश्न विचारले, मात्र त्यांनाही नाहीद आफरीनच्या बाजूने उभे राहावे असे वाटले नाही. पाकिस्तानातील कलाकारांना हिंदुस्थानात रोखणे हे दहशतवादी कृत्य आहे असे ज्यांना वाटते त्यांनी आफरीनच्या गाण्याविरोधात फतवे जारी करणाऱ्यांचा साधा निषेधही केलेला नाही. महेश भट, जया बच्चन अशांनी तर नाहीदच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून फतव्यांचा धिक्कार केला पाहिजे. हिंदुस्थानात गुदमरण्यापेक्षा देश सोडलेला बरा असे मध्यंतरी आमीर खान व त्याच्या पत्नीला वाटत होते. आफरीनच्या गुदमरण्यावर मात्र सगळय़ाच खानांची बोलती बंद झाली आहे. हे धक्कादायक आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
(दहशतवादी कारवायांपासून दूर राहण्याचा फतवा कधीच जारी होत नाही - उद्धव ठाकरे)
 
जसे पाकड्यांचे हे दहशतवादप्रेम कमी होत नाही तसे आमच्या देशातील मुल्ला-मौलवींचे ‘फतवाप्रेम’ही कमी झालेले नाही. आपला देश भले एकविसाव्या शतकात वगैरे पोहोचला असेल, पण धर्मांध मुल्ला आणि मौलवी मात्र आजही मध्यकालीन युगात जगत आहेत. हा एक मानसिक रोग असून आसामची नवोदित गायिका नाहीद आफरीन हिला याच विकृतीची किंमत सध्या मोजावी लागत आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 
 
खुद्द पाकिस्तानातही मौलवींच्या ‘फतवे’शाहींविरुद्ध महिलांनी बंड केलेच आहे. मलाला या शाळकरी मुलीने दहशतवाद्यांच्या गोळय़ा झेलून फतवेशाहीविरोधातील स्वातंत्र्याच्या लढाईचा अग्नी पेटता ठेवला आहे. पाकिस्तानसारख्या इस्लामी राष्ट्रात महिला सिनेमा आणि रंगमंचावर काम करीत आहेत. मग पाकिस्तान आणि इतर इस्लामी देशांमध्ये जर धर्मांधांचे फतवे कुचकामी ठरत आहेत तर आसाममधील हे ४६ मौलवी फतव्याची फडफड का करीत आहेत? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
मुळात फतवा आणि बुरखा यामुळे मुस्लिम महिलांचे जीवन अंधकारमय झाले आहे. ‘तिहेरी तलाक’ने मुस्लिम स्त्रीला गुलाम, बेसहारा बनवले आहे. आता या सर्व अत्याचाराविरोधात मुस्लिम महिलांच्या मनात असंतोषाची आणि लढ्याची ठिणगी पेटली आहे. त्याचे भान फतवेबाज मुल्ला-मौलवींनी ठेवले नाही तर त्यांच्या दाढीला हात घालण्याचे बळ या महिलांच्या मनगटात नक्कीच येईल. नाहीद आफरीनची लढाई एकाकी नाही हे समाजाने दाखवून देण्याची गरज आहे. मुस्लिमांसह समाजातील सर्वच धर्मीय लोकांनी आफरीनची लढाई ही स्वतःची लढाई मानायला हवी असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.