शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

नोटाबंदीच्या यातना भाजपला का नाही?

By admin | Updated: January 18, 2017 01:29 IST

नोटाबंदीचा निर्णय भाजप सरकारने घेतला. ऐन निवडणुकांच्या काळात हा निर्णय झाल्यामुळे सर्वच पक्षांना आर्थिक चणचण भासली.

बारामती : नोटाबंदीचा निर्णय भाजप सरकारने घेतला. ऐन निवडणुकांच्या काळात हा निर्णय झाल्यामुळे सर्वच पक्षांना आर्थिक चणचण भासली. फक्त ‘भाजपाला या निर्णयाच्या यातना झाल्या नाहीत’ याचे उत्तर तुम्हीच शोधा, असा खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पवार यांनी मंगळवारी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टिका केली. त्याचबरोबर सक्षम विरोधी पक्ष नाही. लोकसभेत भाजपाला पूर्ण बहुमत आहे. त्या जोरावर मनात येईल ते निर्णय घेतले जातात, असे सांगून पवार म्हणाले, ५० दिवसानंतर देखील बँकांची परिस्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे सुरुवातीला नोटाबंदीचे समर्थन करणारे नागरिक नाराजीच्या सुरात आहेत. नोटाबंदीचा निर्णयात आता कुठ तरी चूक झाली, गफलत झाली आहे, याचे भान केंद्र सरकारला आल्याचे दिसत आहे. मात्र, ते दाखवत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे स्मारकासारखे भावनिक मुद्दे पुढे केले जात आहे. मात्र, केंद्र व राज्यातील सरकारला ‘पुरोगामी’ विचारांची आवश्यकता नाही, अशी खोचक टिकाही त्यांनी केली. नोटाबंदीचा निर्णय चुकलेलाच आहे. आता त्यातून सावरण्यासाठी भावनिकतेला हात घातला जात आहे. मात्र, हा निर्णय म्हणजे शस्त्रक्रियेनंतर ‘पेशंट डेड’ अशी आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार अनेक पक्षांच्या पाठिंब्यावर झाले होते. आता मात्र ती परिस्थिती नाही. भाजपला लोकसभेत बहुमत आहे. त्यामुळे संख्याबळाच्या ताकदीवर नरेंद्र मोदी निर्णय घेतात. राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे मात्र, त्यांची अडचण होते. ही वस्तूस्थिती आहे. परंतु, प्रभावी विरोधी पक्ष नाही. विरोधकांची शक्ती कमी झाली आहे. काँग्रेसची स्थिती पहिल्या सारखी राहिलेली नाही. प्रादेशिक पक्ष काही राज्यांपुरते मर्यादित आहेत. त्यामुळे त्यांची ताकत तोकडी ठरते. परंतु, आगामी काळात विरोधक एकत्रित येतील, असेही भाकित त्यांनी केले.>व्यक्तीगत जीवनात द्वेष नाहीत...नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रीय कृषिमंत्री म्हणून त्यांना सहकार्य केले. व्यक्तीगत जीवनात आपण कोणाचा द्वेष करत नाही. मोदी सातत्याने पवार यांनी बोटाला धरून राजकारणात आणले, असे सांगतात. परंतु, प्रत्यक्ष निवडणुकांच्या काळात ते आमचे विरोधक म्हणून प्रचारात उतरतात, राजकारण आणि व्यक्तीगत संबंध वेगळे आहेत. असे सांगून पवार म्हणाले,