शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

नोटाबंदीच्या यातना भाजपला का नाही?

By admin | Updated: January 18, 2017 01:29 IST

नोटाबंदीचा निर्णय भाजप सरकारने घेतला. ऐन निवडणुकांच्या काळात हा निर्णय झाल्यामुळे सर्वच पक्षांना आर्थिक चणचण भासली.

बारामती : नोटाबंदीचा निर्णय भाजप सरकारने घेतला. ऐन निवडणुकांच्या काळात हा निर्णय झाल्यामुळे सर्वच पक्षांना आर्थिक चणचण भासली. फक्त ‘भाजपाला या निर्णयाच्या यातना झाल्या नाहीत’ याचे उत्तर तुम्हीच शोधा, असा खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पवार यांनी मंगळवारी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर टिका केली. त्याचबरोबर सक्षम विरोधी पक्ष नाही. लोकसभेत भाजपाला पूर्ण बहुमत आहे. त्या जोरावर मनात येईल ते निर्णय घेतले जातात, असे सांगून पवार म्हणाले, ५० दिवसानंतर देखील बँकांची परिस्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे सुरुवातीला नोटाबंदीचे समर्थन करणारे नागरिक नाराजीच्या सुरात आहेत. नोटाबंदीचा निर्णयात आता कुठ तरी चूक झाली, गफलत झाली आहे, याचे भान केंद्र सरकारला आल्याचे दिसत आहे. मात्र, ते दाखवत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे स्मारकासारखे भावनिक मुद्दे पुढे केले जात आहे. मात्र, केंद्र व राज्यातील सरकारला ‘पुरोगामी’ विचारांची आवश्यकता नाही, अशी खोचक टिकाही त्यांनी केली. नोटाबंदीचा निर्णय चुकलेलाच आहे. आता त्यातून सावरण्यासाठी भावनिकतेला हात घातला जात आहे. मात्र, हा निर्णय म्हणजे शस्त्रक्रियेनंतर ‘पेशंट डेड’ अशी आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार अनेक पक्षांच्या पाठिंब्यावर झाले होते. आता मात्र ती परिस्थिती नाही. भाजपला लोकसभेत बहुमत आहे. त्यामुळे संख्याबळाच्या ताकदीवर नरेंद्र मोदी निर्णय घेतात. राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे मात्र, त्यांची अडचण होते. ही वस्तूस्थिती आहे. परंतु, प्रभावी विरोधी पक्ष नाही. विरोधकांची शक्ती कमी झाली आहे. काँग्रेसची स्थिती पहिल्या सारखी राहिलेली नाही. प्रादेशिक पक्ष काही राज्यांपुरते मर्यादित आहेत. त्यामुळे त्यांची ताकत तोकडी ठरते. परंतु, आगामी काळात विरोधक एकत्रित येतील, असेही भाकित त्यांनी केले.>व्यक्तीगत जीवनात द्वेष नाहीत...नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रीय कृषिमंत्री म्हणून त्यांना सहकार्य केले. व्यक्तीगत जीवनात आपण कोणाचा द्वेष करत नाही. मोदी सातत्याने पवार यांनी बोटाला धरून राजकारणात आणले, असे सांगतात. परंतु, प्रत्यक्ष निवडणुकांच्या काळात ते आमचे विरोधक म्हणून प्रचारात उतरतात, राजकारण आणि व्यक्तीगत संबंध वेगळे आहेत. असे सांगून पवार म्हणाले,