शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींना अटक का नाही़?

By admin | Updated: May 6, 2016 02:26 IST

राज्यभरात गाजलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारासंबंधातील तपासावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीव्र

औरंगाबाद : राज्यभरात गाजलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारासंबंधातील तपासावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोपींना अद्याप का अटक झाली नाही? असा सवाल करतानाच औरंगाबादचे विशेष पोलिस महानिरीक्षक हे १२ आॅगस्ट २०१५च्या आदेशानुसार तपासकामावर देखरेख करण्यास अपयशी ठरल्याचे ताशेरेही खंडपीठाने ओढले आहेत.या गैरव्यवहाराच्या तपासाची प्रगती तपासअधिकाऱ्यांनी पोलीस महासंचालकांच्या निदर्शनास आणून द्यावी. ते जातीने लक्ष घालतील आणि तपास कामाबाबत योग्य ते निर्देश देतील. पुढील सुनावणीच्या वेळी यासंदर्भात काय पावले उचलली आहेत याचा सविस्तर अहवाल सादर करावा, असेही न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. के.एल. वडणे यांच्या खंडपीठाने मंगळवारी सांगितले. याचिकेची पुढील सुनावणी १३ जून रोजी होणार आहे. या प्रकरणात ‘वसुली प्रमाणपत्रे’ आणि सहकार कायद्याच्या कलम ८८नुसार आदेश देऊनही राज्य शासनाने गैरव्यवहाराची रक्कम वसूल करण्यासाठी पावले उचलली नाहीत. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये यासंदर्भात एकूण १३१ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी १२४ गुन्ह्यांचा तपास झाला व १०५ गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले. असे असताना आरोपींच्या अटकेसंदर्भात माहिती दिली नाही.सर्वांना सारखी वागणूक द्यासर्व आरोपींना सारखी वागणूक द्या, अशी अपेक्षा व्यक्त करून तपास यंत्रणेने उत्तर दाखल करावे, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. क्रिमीनल लॉ अमेंडमेन्ट आॅर्डिनन्स १९४४ च्या कलम ३, ४ आणि ६नुसार कसुरदारांची मालमत्ता शासनाने जप्त करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. अनेक बडे नेते आरोपी : या बँकेतील साडेसातशे कोटींचा घोटाळा २०१२मध्ये पुढे आला. बँकेचे अध्यक्ष राजाभाऊ मुंडे हे अनेक महिने फरार होते, त्यांना नंतर अटक झाली. पुढे त्यांची जामिनावर सुटका झाली. धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, रमेश आडसकर, भीमराव धोंडे अशा मातब्बर नेत्यांवर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. बोगस संस्था आणि बोगस सेवा सहकारी संस्थांना कर्ज देण्यात आल्याचा ठपका या तत्कालिन संचालकांवर आहे. यामुळे १२०० कोटी ठेवी असणारी बँक उद्ध्वस्त झाली. परिणामी प्रशासक नेमण्याचीही नामुष्की ओढावली होती.