शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

कोणाची डेडलाइन खरी? मुख्यमंत्री म्हणतात ५ आॅगस्ट; कुलगुरू म्हणतात १५ आॅगस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 05:02 IST

मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल ५ आॅगस्टपर्यंत लावले जातील, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आज निकालाची डेडलाइन विधानसभेत जाहीर केली.

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल ५ आॅगस्टपर्यंत लावले जातील, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आज निकालाची डेडलाइन विधानसभेत जाहीर केली. मात्र, तिकडे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी निकाल १५ आॅगस्टपर्यंत लागतील, असे जाहीर केल्याने निकालाची कोणती डेडलाइन खरी, मुख्यमंत्र्यांची की कुलगुरूंची असा प्रश्न निर्माण झाला आहे.मुंबई विद्यापिठांच्या निकालांना उशीर झाला असला तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. परदेशात शिक्षणासाठी जाणाºया विद्यार्थ्यांना १५ आॅगस्टपर्यंत गुणपत्रिका देण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. उशिरा निकाल लागल्याने भविष्यातील संलग्न परीक्षांवर परिणाम होऊ, नये यासाठी तावडे यांनी संबंधित फोरमशी चर्चा केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.मुंबई विद्यापीठाच्या निकालांना होत असलेल्या विलंबाचे पडसाद आज सभागृहात उमटले. योग्य वेळेत निकाल लावण्यात मुंबई विद्यापीठ नापास झाले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे देखील अपयशी ठरले आहेत. आॅनलाइन मूल्यांकनाचा प्रयोग फसला असून याचा पुढील परीक्षांवरही विपरित परिणाम होईल, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.त्यावर मुंबई विद्यापीठात आॅनलाइन मूल्यांकनाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने झाली असती तर गोंधळ उडाला नसता, अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली.विद्यापीठाची आता तिसरी डेडलाइनमुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी सर्व निकाल ५ आॅगस्टपर्यंत जाहीर होतील, असे सांगितले होते. रखडलेल्या निकालांबाबत युवा सेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची भेट घेतली. त्यावेळी लाखो उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी असल्याने विधि आणि वाणिज्य शाखेचे निकाल लागण्यास १५ आॅगस्ट उजाडेल, असे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी त्यांना सांगितले.विधि शाखेच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी औरंगाबाद विद्यापीठातून २५ प्राध्यापकांना बोलवले आहे. तसेच ‘एसएनडीटी’मधूनही प्राध्यापकांना बोलवणार आहेत.५ आॅगस्टपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले नाहीत तर विद्यापीठाला टाळे ठोकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी दिला.