शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

सरसकट दारूबंदी अशक्य!

By admin | Updated: July 24, 2015 02:36 IST

दारूबंदीचा उलटा परिणाम दिसून येत आहे. शिवाय, पोलीस यंत्रणेवरही ताण वाढत असल्यामुळे राज्यात सरसकट

मुंबई : दारूबंदीचा उलटा परिणाम दिसून येत आहे. शिवाय, पोलीस यंत्रणेवरही ताण वाढत असल्यामुळे राज्यात सरसकट दारूबंदी लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. यवतमाळ जिल्ह्यातील यावली येथे दारूबंदीसाठी आग्रह धरणाऱ्या पोलीस पाटलाची निर्घृण हत्या झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना राष्ट्रवादीचे संदीप बाजोरिया यांनी मांडली होती. या वेळी झालेल्या चर्चेत सहभागी होताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याची भूमिका ही दारूविरोधीच आहे. दारूवर नियंत्रण राहावे यासाठीच परवाना पद्धत आहे. पण चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचा उलटा परिणाम दिसून येत आहे. आंध्र प्रदेशने संपूर्ण राज्यात दारूबंदी लागू केली. मात्र, तिथेही ती परिणामकारक ठरली नाही. पोलीस यंत्रणेवर आधीच कामाचा मोठा ताण आहे. दारूबंदी लागू केल्यानंतर पोलिसांवरचा ताणही मोठ्या प्रमाणावर वाढतो. सर्व यंत्रणा दारूबंदीसाठी राबविणेही शक्य नाही. त्यामुळे राज्यात सरसकट दारूबंदी करता येणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.(प्रतिनिधी)