शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

ऐ मेरे वतन के लोगों कोण गाणार होते?

By admin | Updated: July 8, 2014 03:24 IST

भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायिलेल्या ऐ मेरे वतन के लोगों.. या गीताला 5क् वर्षे पूर्ण झालेली असताना त्याकाळी गाण्याचा सराव कोणी केला अन् कोण गाणार होते,

 नांदेड : भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायिलेल्या ऐ मेरे वतन के लोगों.. या गीताला 5क् वर्षे पूर्ण झालेली असताना त्याकाळी गाण्याचा सराव कोणी केला अन् कोण गाणार होते, यावर गायिका सुमनताई कल्याणपूर यांच्या विधानाने पुन्हा एकदा संगीतविश्वात खळबळ उडाली आह़े यापूर्वीही आशा भोसले यांनी सराव केला होता व त्या गाणार होत्या, हा मुद्दा समोर आला होता़ 

नांदेड येथे आयोजित आषाढी महोत्सवात गायिका सुमनताई कल्याणपूर यांनी एका मुलाखतीत म्हटले, ‘ऐ मेरे वतन के लोगों.. या गीताचा माङयाकडून सराव करण्यात आला़ प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या दिवशी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समक्ष हे गीत मीच सादर करावे असे ठरल़े मात्र त्या दिवशी जे घडले तो प्रसंग माङया आयुष्यातील सर्वात वेदनादायी आह़े’ 
दरम्यान, संगीततज्ज्ञ डॉ़ प्रकाश कामत म्हणाले, या गीताचा आशा भोसले यांनी सराव केला होता़ त्या गाणारही होत्या़ परंतु ऐनवेळी पंतप्रधान पंडितजींसमोर होणा:या त्या सोहळ्यात लतादीदींनी गाणो सादर केल़े उपरोक्त संदर्भ आपणाला ज्ञात आह़े त्याबद्दल वाचलेही आह़े परंतु सुमनताई कल्याणपूर यांनी त्या गीताचा सराव केला, हे ऐकिवात नाही़  
संगीत अभ्यासक प्रदीप भिडे संयत भूमिका मांडत म्हणाले, सुमनताईंचे म्हणणो मी चुकीचे ठरवीत नाही़ त्यांनी रियाज केलाही असेल़ परंतु आशा भोसले गाणार होत्या, हा विषय माङया वाचनातला आह़े अंतिमत: लतादीदींच्या आवाजात हे गाणो अजरामर झाले, हे सत्य आहे.
धनंजय कुलकर्णी यांनीही संगीतकार सी़रामचंद्र यांच्या मुलाखतीचा संदर्भ देत आशा भोसले गाणार होत्या, हे सत्य असल्याचे सांगितल़े परंतु सुमनताईंचा संदर्भ पहिल्यांदाच ऐकल्याचे ते म्हणाल़े 
दरम्यान, नांदेडचे संगीततज्ज्ञ विजय पाडाळकर म्हणाले, हे अजरामर गीत लताबाईंच्या आवाजात गायिले जावे, अशा कवी प्रदीप यांच्या आठवणी आहेत़ संगीतकार सी़रामचंद्र यांनी आशाबाईंकडून सराव करून घेतला होता, याचेही संदर्भ आह़े प्रत्यक्षात देशभक्तीपर अन्य गीतांपेक्षा वेगळी मांडणी असलेले हे गीत श्रोत्यांकडून कसे घेतले जाईल, याची उत्सुकता होती़ असे ते यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)
 
पुरावा नाही
चित्रपट संगीताचे अभ्यासक अशोक उजळंबकर म्हणाले, त्याकाळी लतादीदी व सी़रामचंद्र यांचे सांगीतिक संबंध दुरावले होत़े त्याच काळात आशा भोसलेंनी ऐ मेरे वतन के लोगों.. या गाण्याचा सराव केला होता़ परंतु सुमनताईंनी जो दावा केला आहे, त्याचे ऐकीव अथवा लेखी पुरावे नाहीत़ प्रत्यक्षात कवी प्रदीप यांनी हे गाणो लतादीदींकडून गायले जावे, असे म्हटल्याच्या नोंदी आहेत, असेही त्यांनी सांगितल़े