शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

राणेंना कोण नको म्हणणार?

By admin | Updated: March 27, 2017 03:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे नारायण राणे, प्रकाश आवाडे यांच्यासारखे काँग्रेस नेते जर भाजपमध्ये येत

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे नारायण राणे, प्रकाश आवाडे यांच्यासारखे काँग्रेस नेते जर भाजपमध्ये येत असतील तर त्यांना नको कोण म्हणेल, असा सूचक प्रतिप्रश महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांना केला.कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यालय उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या राणे आणि आवाडे यांच्या प्रवेशाबद्दल मला माहीत नाही; परंतु त्या-त्या भागांतील नेते, कार्यकर्त्यांशी बोलून असे निर्णय घेतले जातात. ते काम प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे करतील. राणे हे शिवसेनेत जातील की भाजपमध्ये अथवा काँग्रेसमधून बाहेर पडणारच नाहीत, हे कोणीही सांगू शकत नाही. पण हवी-हवीशी वाटणारी अशी माणसे फार कमी असतात, असेही पाटील यांनी सांगितले.राज्यात मध्यावधी निवडणुकांची चर्चा असली तर ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली. २८८ पैकी जवळपास २०० आमदार आमचे आणि शिवसेनेचे असल्यानंतर ही चर्चा निरर्थक आहे. वादाचे अनेक विषय असतात. त्यावरून मतभेद होतात. मंत्रिपदे, त्यांचा दर्जा, त्यांची जबाबदारी असे अनेक विषय असतात. घरात पती-पत्नीचेही नेहमी भांडण होत असते तसेच हे विषय आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या चर्चेमध्ये काही अर्थ नाही, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) ‘मातोश्री’वर जाणार नाहीचंद्रकांतदादा पाटील म्हणाले, मी आणि सुधीर मुनगंटीवार ‘मातोश्री’वर जाणार असल्याची चर्चा आहे; पण आता तसे काही कारण नाही. मात्र, उत्तर प्रदेशच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना अभिनंदनाचा फोन केला होता तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना सपत्निक भोजनाचे निमंत्रण दिले आहे, असे त्यांनी सांगितले.