शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लोकांच्या असंख्य प्रश्नांना उत्तरे कोण देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2016 03:07 IST

बँक नक्की बंद आहे का? एटीएममध्ये पैसे असूनही ते बंद का आहे? उद्या तरी सर्व सुरू राहणार आहे का? इमर्जन्सी असेल तर आम्ही पैसे कुठून काढायचे?

ठाणे : बँक नक्की बंद आहे का? एटीएममध्ये पैसे असूनही ते बंद का आहे? उद्या तरी सर्व सुरू राहणार आहे का? इमर्जन्सी असेल तर आम्ही पैसे कुठून काढायचे? आमच्याकडच्या हजार-पाचशेच्या नोटा नक्की घेतल्या जाणार ना? अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार बुधवारी ठाण्यातील अनेक एटीएम, बँकांच्या बाहेर सुरू होता आणि त्याला तोंड देत होते, कंत्राटी पद्धतीने १२ तासांकरिता नियुक्त केलेले सुरक्षारक्षक. सुट्या पैशांअभावी लोकांना सहन कराव्या लागणाऱ्या हालअपेष्टांची अभिव्यक्ती एखादी शिवी हासडून केली जात होती किंवा एखादा एटीएम मशीनवर बुक्की घालून नापसंती व्यक्त करीत होता.पंतप्रधान मोदी यांनी नोटा रद्द केल्याची घोषणा करताच मंगळवार रात्रीपासून एटीएमबाहेर लांबचलांब रांगा लागल्या होत्या. प्रारंभी सुटे पैसे मिळवण्यात काहींना यश आले. मात्र, काही वेळातच मशीनमधील पैसे संपले. ज्यांना मंगळवारी रात्री पैसे मिळाले नाहीत ते किंवा ज्यांच्याकडील सुटे पैसे संपल्याने चणचण भेडसावू लागली, ते बुधवारी सकाळपासून एटीएमबाहेर घिरट्या घालून ‘लक असेल आणि मिळाले पैसे तर बघू’ या विचाराने येत होते. सकाळी ९ ते १० दरम्यान एटीएमच्या बाहेर गर्दी होती. एटीएम बंद असल्याचे सुरक्षारक्षकाने सांगूनही काही जणकार्ड टाकून खातरजमाआणि आपली नाराजी प्रकट करत होते. दररोज बँकेत पायधूळ झाडणारे छोटे व्यापारी, दुकानदार हेही आले होते. घोळक्याघोळक्यांत उभे राहून चर्चा करीत होते. ‘काळापैसा बाहेर काढण्याकरिता निर्णय चांगला आहे, हे खरे पण सामान्य माणसाला या निर्णयामुळे किती त्रास होत आहे, ते मोदींना कळत नाही’, असा सूर काहींनी लावला होता. ‘घरी हजार-पाचशेच्या चार नोटा असल्या तरी त्या बदलण्यासाठी कामधंदे सोडून आता उद्या बँकेत धावत यावे लागणार. आज बँका बंद न करता आजपासूनच सुटे पैसे देण्याचे नियोजन अगोदर केले असते, तर लोकांचे हाल झाले नसते’, असाही मतप्रवाह होता.काही महिला, गोरगरीब कामगार हजार-पाचशेच्या नोटा घेऊन बँकेपाशी आले व त्यांनी तेथील सुरक्षारक्षकांना या नोटा बदलून मिळणार की नाही, असा भयकंपित स्वरात सवाल केला. त्यांची समजूत काढताना व त्यांना उत्तरे देताना सुरक्षारक्षकांची पुरेवाट होत होती. कुणाला क्लासची फी भरायला पैसे हवे होते, तर कुणाला डॉक्टरकडे जाण्याकरिता पैशांची गरज होती. मात्र बँक, एटीएम बंद असल्याने हताश होऊन ते परत जात होते. किरकोळ भाजी-फळविक्रेते सुटे द्यायला तयार नाही. पाचशेची नोट ठेवून घेताहेत आणि काय करायचं, बायकांच्या घोळक्यात चर्चा सुरू होती. उद्या तरी मिळतील ना रे पैसे, असा सवाल त्या रक्षकांना करीत होत्या. एरव्ही, एटीएम बंद असले तरी कधी आम्हाला इतका त्रास होत नाही. काल रात्री उशिरापर्यंत लोकांच्या रांगा लागल्या होत्या. लोकांची भांडणे सोडवताना आमची पुरेवाट झाली. आज मशीन बंद असल्याने लोकांची बोलणी खातोय. खूपच त्रास झालाय. लोक आमच्यावरच राग काढत आहेत, अशी खंत एटीएमबाहेरील सुरक्षारक्षकांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)