शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मुंढेंच्या भूमिकेला विरोध कुणासाठी?

By admin | Updated: July 1, 2017 07:58 IST

बससेवेत शिस्त आणण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी काही कठोर निर्णय घेतले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बससेवेत शिस्त आणण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी काही कठोर निर्णय घेतले आहेत. त्याचा फटका खासगी ठेकेदारांनाही बसला. त्यामुळे त्यांनी प्रवाशांना वेठीस धरून बंदचे हत्यास उपसले. मात्र, प्रवाशांचे हित पाहून बससेवा सुधारण्यासाठी मुंढे यांनी उचललेले पाऊल योग्य असल्याबाबत प्रवाशांसह काही राजकीय नेत्यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. मग काही जणांकडून मुंढे यांच्या भूमिकेला कुणासाठी विरोध केला जात आहे, अशी चर्चा रंगली आहे.मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून बेशिस्त कर्मचारी-अधिकारी यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. बेशिस्त बससेवेला शिस्त लावण्यासाठी त्यांनी ठेकेदारांनाही ताकीद दिली. तसेच, ब्रेकडाऊन रोखण्यासाठी ५ हजार रुपये तर बसथांब्यावर बस न थांबविणे, वेळेपूर्वी बस हलविणे अशा विविध कारणांसाठी १०० रुपये दंड आकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे मागील ३ महिन्यांत पाचही ठेकेदारांना तब्बल १७ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला. मुंढे यांनी उचललेले हे पाऊल प्रवासी हितासाठीच आहे. मार्गावर वारंवार बस बंद पडल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. बस थांब्यावर न थांबविल्यामुळे प्रवाशांना तासन् तास थांब्यावर उभे राहावे लागते. तर, वेळेआधीच थांब्यावरून बस हलविल्याने काही वेळा अपघातही झाले आहेत. या गंभीर बाबींचा विचार करून मुंढे यांनी ठेकेदारांच्या बससेवेत शिस्त आणण्यासाठी कोट्यवधींचा दंड ठोठावला आहे.मात्र, त्यांनी प्रवासी हितासाठी घेतलेली ही भूमिका काहींना पटलेली दिसत नाही. विविध मुद्द्यांवर त्यांना कोंडीत पकडून विरोध करण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रवाशांकडून मुंढे यांच्या कारवाईला पाठिंबा मिळत असताना काही नेत्यांकडून त्यांना कुणासाठी आणि कुणाच्या सांगण्यावरून टार्गेट केले जात आहे, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.