शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

‘तो’ मंत्री कोण रे भाऊ?

By admin | Updated: January 21, 2015 23:56 IST

बोथे जिलेटिन स्फोट : जयकुमार गोरे यांचा रोख नेमका कोणावर...

सातारा : माण तालुक्यातील बोथे जिलेटिन स्फोट प्रकरण आता वेगळ्याच चर्चेने रंगले आहे. येथील स्फोटाची सामाजिक तीव्रता कायम असतानाच आमदार जयकुमार गोरे यांनी त्यात आणखी एक ठिणगी टाकली आहे आणि याप्रकरणातील आरोपींना जामीन मिळावा म्हणून एक मंत्री दबाव आणत असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. बोथे जिलेटिन स्फोट प्रकरणात तेरा जणांवर गुन्हा नोंद झाला असून, यापैकी फक्त अंकुश गोरे याला अटक झाली आहे. अन्य दोन आरोपींना अटक झाली असली तरी ते तेरा आरोपींमध्ये नाहीत. आरोपींना अटक होत नाही म्हणून आ. गोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला लक्ष्य करत आर्थिक तडजोडीचा आरोप केला. याचवेळी आरोपींना जामीन मिळावा म्हणून एक मंत्री दबाव आणत असल्याचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आ. गोरे यांनी योग्य वेळी संबंधित मंत्र्यांचे नाव जाहीर करणार असल्याचे सांगितले. मात्र, तो मंत्री कोण याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे.बोथे जिलेटिन स्फोटात अंकुश गोरे यांना अटक झाल्यानंतर आ. जयकुमार गोरे यांनी पोलिसांवर आगपाखड केली. त्यांचा इशारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्याकडेच होता. आ. गोरे यांच्या मते ज्या कंपनीचा येथील स्फोटाशी संबंध नाही, त्या अंकुश गोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्यापैकी अंकुश वगळता अन्य बारांपैकी एकालाही अटक झालेली नाही. त्यामुळे आ. गोरे यांचा संताप होणे स्वभाविक आहे. गोरे यांचा पत्रकार परिषदेतील रोख हा अप्रत्यक्षरीत्या शेखर गोरेवरच होता. त्याच्यावरही कारवाई झालीच पाहिजे, असे त्यांनी फक्त एकदाच नमूद केले. मात्र, हे करत असताना बोथे स्फोटाशी अंकुश आणि ‘कमल एंटरप्रायजेस’चा काडीमात्र संबंध नाही, असे सांगायलाही विसरले नाहीत. (प्र्रतिनिधी)पत्रकार परिषदेत असा झाला संवादआ. जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत राज्य शासनामधील एका मंत्र्यांवर त्याचे नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या आरोप केला. पत्रकारांनी हे मंत्री कोण, असे विचारताच त्यांनी त्याचे नाव नंतर जाहीर करणार असल्याचे सांगितले. याचवेळी याच खात्याचे मंत्री स्वत: मुख्यमंत्री असल्यामुळे मी त्यांना भेटणार आहे, असे स्पष्ट केले. यानंतर त्यांना पुन्हा एकदा पत्रकारांनी आपला या खात्याचे मंत्री म्हणून आपला रोख मुख्यमंत्र्यांकडे आहे का, असे छेडले असता त्यांनी फारसे बोलण्यास नकार दिला. माझ्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहत जात नसल्याची खंतही आ. गोरे यांच्या बोलण्यातून प्रत्येकवेळी दिसून आली.लहान भाऊ शेखर गोरे यांच्यावर कारवाई होत नसल्याबद्दल पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आ. गोरे यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आगपाखड केली. त्यांनी दोन ते तीनवेळा ‘लोणंदहून स्थानिक गुन्हे शाखेत कोण येते..?’ याचा उल्लेख केला. यावरही त्यांना पत्रकारांनी ‘लोणंद’चा संदर्भ विचारला असता त्यांनी तुम्हीच त्याचा शोध घ्या, असे म्हणत विषयाला बगल दिली. बोथे येथे जिलेटिन स्फोट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येथे पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी आ. जयकुमार गोरे यांनी या अनुषंगाने तक्रार करताच जिल्हाधिकारी त्यांना म्हणाले ‘लेखी द्या...’ यामुळे झालेला संतापही पत्रकार परिषदेत जयकुमार गोरेंच्या चेहऱ्यावरून लपला नाही.