शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

बाजारातील तेजीचा फायदा कुणाला?

By admin | Updated: July 9, 2014 01:06 IST

भारतातील शेअर बाजाराने घेतलेली उसळी कशाच्या जोरावर असा प्रश्न सर्व सामान्य गुंतवणूकदारांना पडलेला आहे.

प्रसाद जोशी - नाशिक
वाढती महागाई, अर्थसंकल्पीय तुटीचा वाढता डोंगर, आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दराबाबतची अनिश्चितता अशा सर्व नकारात्मक बाबी एकत्र असतानाही भारतातील शेअर बाजाराने घेतलेली उसळी कशाच्या जोरावर असा प्रश्न सर्व सामान्य गुंतवणूकदारांना पडलेला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार अधिकारावर आल्यापासून सातत्याने वाढणारा शेअर बाजार रेल्वे अर्थसंकल्पानंतर जोरात आपटला त्यामुळे बाजारातील ही तेजी नक्की कोणासाठी फायदेशीर असा प्रश्न निर्माण झाला आहे. 
गेल्या तीन सप्ताहांत मुंबई शेअर बाजारात सातत्याने तेजीचे वातावरण राहिले. परकीय वित्त संस्था तसेच देशांतर्गत परस्पर निधी यांनी मोठय़ा प्रमाणावर खरेदी केल्यामुळे बाजार वाढत असल्याचे निदर्शनास आले. केंद्रातील सत्ता ग्रहण केल्यानंतर मोदी सरकारने पेट्रोल, डिङोल, रेल्वेची भाडेवाढ तसेच मालवाहतूक दरात वाढ केली. 
यासर्व घटकांमुळे आधीच वाढलेली महागाई आणखी भडकली. याचा परिणाम आगामी आर्थिक आढाव्यात अर्थसंकल्पीय तूट वाढलेल्या स्वरूपात दिसणार आहे, हे सत्य नजरेआड करत बाजारात होत असलेली वाढ अनाकलनीय आहे.
इराकमध्ये सुरू झालेल्या यादवीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या दरात अस्थिरतेचे वातावरण आहे. सध्या काही प्रमाणात दर कमी झाले असले तरी या दरांमध्ये केंव्हाही वाढ होऊ शकते. या वाढीचा भारताला मोठा फटका बसणार 
असून त्यामुळे परकीय चलनाचा साठा काही प्रमाणात कमी होणार 
आहे. 
डॉलरच्या तुलनेत रुपयाची प्रकृती अद्यापही म्हणावी तशी सुधारलेली नाही. अशा सर्व नकारात्मक घटकांनी गर्दी केली असताना बाजार वाढणो तत्त्वत: असंभव असले तरी शेअरबाजाराने मात्र नवनवीन उच्चांक करण्याचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे बाजारातील ही वाढ कृत्रिम तर नाही ना, अशी शंका घेण्याला निश्चितच वाव आहे. 
जुलै महिन्यात पहिले चार दिवस झालेल्या व्यवहारांचा आढावा घेतला असता परकीय वित्त संस्थांनी तीन दिवस मोठी खरेदी केली, तर एक दिवस विक्री केली. असे असले तरी या वित्तसंस्थांची खरेदी अधिक आहे. भारतीय परस्पर निधींनीही या चार दिवसांमध्ये 14 हजार 356 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. ही सर्व खरेदी अचानक का सुरू झाली, हा संशोधनाचा विषय आहे. 
 
11 वर्षात कधीच झाली नाही अर्थसंकल्पपूर्व वाढ
4गेल्या दोन दशकांत अर्थसंकल्प पूर्व आठवडय़ामध्ये निर्देशांक सातत्याने घसरत असलेला दिसून आला आहे. मागील सप्ताहात शेअर बाजाराच्या निर्देशांकात झालेली तीन टक्के वाढ ही दोन दशकांतील सर्वाधिक वाढ होय.
 
41996-97 च्या अर्थसंकल्पापूर्वीच्या सप्ताहामध्ये बाजारात तेजी दिसून आली होती. त्यावेळी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील सरकार अधिकारावर आले होते. 
 
4गेल्या 11 वर्षामध्ये बाजारात अर्थसंकल्पपूर्व सप्ताहामध्ये सावधगिरीचे वातावरण दिसून आले आहे. याआधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अस्तित्वात असतानाही बाजाराने अशा प्रकारची वाढ दाखविली नव्हती, हे विशेष.