शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

मोर्चात अर्वाच्च घोषणा कोणी दिल्या? - तावडे

By admin | Updated: October 6, 2016 05:50 IST

औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांच्या मोर्च्यात अत्यंत अर्वाच्य भाषेत घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे या घोषणा खरेच शिक्षकांनी दिल्या की, शिक्षण संस्थाचालकांनी पाठविलेल्या

मुंबई : औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांच्या मोर्च्यात अत्यंत अर्वाच्य भाषेत घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे या घोषणा खरेच शिक्षकांनी दिल्या की, शिक्षण संस्थाचालकांनी पाठविलेल्या भाडोत्री गुंडांनी दिल्या? असा सवाल करत काही शिक्षक संघटनांनी उद्या गुरुवारी संपाची हाक दिली असून, या संपामध्ये शिक्षकांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

औरंगाबादेतील घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शिक्षकांच्या मोर्च्यात विनाकरण पोलिसांनी लाठीमार केला असेल, तर ते नक्कीच निषेधार्ह आहे. सरकारने घोषित केलेल्या अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरु आहे. तसेच, ज्या शासन निर्णयावर शिक्षक संघटनांचा आक्षेप आहे, त्या संघटनांशी चर्चा सुरु केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांचे नुकसान होईल अशी कृती कोणाही करु नये, असे आवाहनही तावडे यांनी केले.

औरंगाबादच्या मोर्चात मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार सर्व मोर्चेकऱ्यांचे म्हणणे पंकजा मुंडे आणि अर्जुन खोतकर या मंत्री द्वयांनी ऐकून घेतले. शिक्षकांनी आपल्याला भेटण्याचा कुठलाही निरोप पाठविला नव्हता. पोलिसांना शिक्षकांच्या मोर्च्यावर लाठीमार का करावा लागला याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

इयत्ता ९ आणि १० वी मधील निकालाची टक्केवारी सुधारण्यासाठी १०० टक्के अट ठेवण्यात आली आहे. शाळांची आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी यासाठी हे प्रयत्न करण्यात आले आहेत. सामान्य जनतेचा पैसा खोट्या शिक्षण संस्थाचालकांनी लाटू नये यासाठी काही निकष कडक करण्यात आले आहेत. परंतु केवळ या निकालाच्या निकषांवर अनुदान अडविण्यात येणार नाही, असेही तावडे म्हणाले.