शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉरशिपचा अधिकार कुणी दिला?

By admin | Updated: January 22, 2016 00:49 IST

‘‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षांचे भाषण न छापून राज्यघटनेशी गद्दारी केली आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या अध्यक्षांच्या भाषणावर

पुणे : ‘‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षांचे भाषण न छापून राज्यघटनेशी गद्दारी केली आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या अध्यक्षांच्या भाषणावर सेन्सॉरशिप लादण्याचा हा अधिकार महामंडळाला कोणी दिला? साहित्य महामंडळच असहिष्णु आहे,’’ अशा शब्दांत ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी गुरुवारी महामंडळावर शरसंधान साधले. पिंपरी येथील संमेलनात सबनीस यांचे लिखित भाषण महामंडळाने छापले नाही. त्यामुळे स्वत: पुढाकार घेत हे भाषण छापून वितरित करण्याची वेळ संमेलनाध्यक्षांवर आली. महामंडळाने दिलेल्या सापत्न वागणुकीवर डॉ. सबनीस यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली. ते म्हणाले, ‘‘१५ जानेवारीला सकाळी भाषण दिल्यानंतर ते १६ जानेवारीला छापून येणे अपेक्षित होते. मात्र, रात्रीपर्यंत महामंडळाकडून काहीच हालचाल न दिसल्याने मी स्वत:च ते भाषण छापले. या दरम्यान भाषण वाचायला मिळाले नाही, भाषणात आक्षेपार्ह मुद्दे आहेत, अशी विरोधाभासी वक्तव्ये महामंडळाने केली. सर्व प्रवाहांना, सर्व वादांना एकत्र घेऊन जाणारी भूमिका महामंडळाच्या बुद्धिमान्यांना पटली नसावी. मात्र, सेन्सॉरशिपचे अधिकार महामंडळाला कुणी दिले? महामंडळ सेन्सॉर बोर्ड कधी झाले, हा प्रश्न पडला आहे. महामंडळाला अध्यक्षीय भाषण सेन्सॉर करण्याचे हक्क नसतानाही भारतीय राज्यघटना व लोकशाहीशी गद्दारी करून लोकनियुक्त अध्यक्षांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पदाधिकाऱ्यांनी पायदळी तुडविले. भाषण न छापण्याची ही बाब अत्यंत घातक, अशोभनीय आहे. ही स्वातंत्र्यविरोधी व असहिष्णू भूमिका आहे. महामंडळाने सांस्कृतिकता जगविण्याचे काम करावे. वाक्ये कोणती खटकतात, ते सांगावे. त्यांनी संवाद साधावा. माझ्या भाषणाच्या प्रती सर्व स्तरातून मागविण्यात येत आहेत. हे लोण महाराष्ट्रभर पसरेल. त्यामुळे राज्यघटनेला स्मरून महामंडळाने भाषण छापावे. आपली कायदेशीर जबाबदारी पार पाडावी.’’अध्यक्ष निवडीपासून ते संमेलनाध्यक्षापर्यंतचा सर्व कटू-गोड आठवणींचा सामना करावा लागला. त्यामध्ये वाईट अनुभवच अधिक होते. अध्यक्ष झाल्यावर ज्या गोष्टी सहन कराव्या लागल्या, भोगाव्या लागल्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी गळचेपी झाली, त्या सर्व व्यथा पुस्तकरूपात मांडण्याचा आपला विचार आहे. (प्रतिनिधी)पुढील वर्षभरात शेतकऱ्यांसाठी राज्यघटना कलम ३२३ (ब) अनुसार अँग्री ट्रिब्युनल, सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध, सेक्युलॅरिझमची पेरणी आणि आदिवासी, दलित, ग्रामीण, स्त्रीवादी भटके आदी साहित्यप्रवाहांची एकात्म मांडणीसंबंधी महाराष्ट्रभर प्रबोधन करणार आहे. तसेच, महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास वस्तुनिष्ठपणे लिहिण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील लेखक-अभ्यासकांना संघटित करून क्षेत्रीय-प्रादेशिक कलावंत लेखकांचे कर्तृत्व लिहिणे, सांस्कृतिक मेळावे घेणे, शेतकरी व साहित्यिक यांच्या संयुक्त सभा, ग्रामीण-दलित साहित्य संमेलनाचे आयोजन करणे यांवर भर देणार आहे.- डॉ. श्रीपाल सबनीस, संमेलनाध्यक्ष