शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

सेन्सॉरशिपचा अधिकार कुणी दिला?

By admin | Updated: January 22, 2016 00:49 IST

‘‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षांचे भाषण न छापून राज्यघटनेशी गद्दारी केली आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या अध्यक्षांच्या भाषणावर

पुणे : ‘‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षांचे भाषण न छापून राज्यघटनेशी गद्दारी केली आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या अध्यक्षांच्या भाषणावर सेन्सॉरशिप लादण्याचा हा अधिकार महामंडळाला कोणी दिला? साहित्य महामंडळच असहिष्णु आहे,’’ अशा शब्दांत ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी गुरुवारी महामंडळावर शरसंधान साधले. पिंपरी येथील संमेलनात सबनीस यांचे लिखित भाषण महामंडळाने छापले नाही. त्यामुळे स्वत: पुढाकार घेत हे भाषण छापून वितरित करण्याची वेळ संमेलनाध्यक्षांवर आली. महामंडळाने दिलेल्या सापत्न वागणुकीवर डॉ. सबनीस यांनी पत्रकार परिषद घेऊन टीका केली. ते म्हणाले, ‘‘१५ जानेवारीला सकाळी भाषण दिल्यानंतर ते १६ जानेवारीला छापून येणे अपेक्षित होते. मात्र, रात्रीपर्यंत महामंडळाकडून काहीच हालचाल न दिसल्याने मी स्वत:च ते भाषण छापले. या दरम्यान भाषण वाचायला मिळाले नाही, भाषणात आक्षेपार्ह मुद्दे आहेत, अशी विरोधाभासी वक्तव्ये महामंडळाने केली. सर्व प्रवाहांना, सर्व वादांना एकत्र घेऊन जाणारी भूमिका महामंडळाच्या बुद्धिमान्यांना पटली नसावी. मात्र, सेन्सॉरशिपचे अधिकार महामंडळाला कुणी दिले? महामंडळ सेन्सॉर बोर्ड कधी झाले, हा प्रश्न पडला आहे. महामंडळाला अध्यक्षीय भाषण सेन्सॉर करण्याचे हक्क नसतानाही भारतीय राज्यघटना व लोकशाहीशी गद्दारी करून लोकनियुक्त अध्यक्षांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पदाधिकाऱ्यांनी पायदळी तुडविले. भाषण न छापण्याची ही बाब अत्यंत घातक, अशोभनीय आहे. ही स्वातंत्र्यविरोधी व असहिष्णू भूमिका आहे. महामंडळाने सांस्कृतिकता जगविण्याचे काम करावे. वाक्ये कोणती खटकतात, ते सांगावे. त्यांनी संवाद साधावा. माझ्या भाषणाच्या प्रती सर्व स्तरातून मागविण्यात येत आहेत. हे लोण महाराष्ट्रभर पसरेल. त्यामुळे राज्यघटनेला स्मरून महामंडळाने भाषण छापावे. आपली कायदेशीर जबाबदारी पार पाडावी.’’अध्यक्ष निवडीपासून ते संमेलनाध्यक्षापर्यंतचा सर्व कटू-गोड आठवणींचा सामना करावा लागला. त्यामध्ये वाईट अनुभवच अधिक होते. अध्यक्ष झाल्यावर ज्या गोष्टी सहन कराव्या लागल्या, भोगाव्या लागल्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी गळचेपी झाली, त्या सर्व व्यथा पुस्तकरूपात मांडण्याचा आपला विचार आहे. (प्रतिनिधी)पुढील वर्षभरात शेतकऱ्यांसाठी राज्यघटना कलम ३२३ (ब) अनुसार अँग्री ट्रिब्युनल, सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध, सेक्युलॅरिझमची पेरणी आणि आदिवासी, दलित, ग्रामीण, स्त्रीवादी भटके आदी साहित्यप्रवाहांची एकात्म मांडणीसंबंधी महाराष्ट्रभर प्रबोधन करणार आहे. तसेच, महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास वस्तुनिष्ठपणे लिहिण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील लेखक-अभ्यासकांना संघटित करून क्षेत्रीय-प्रादेशिक कलावंत लेखकांचे कर्तृत्व लिहिणे, सांस्कृतिक मेळावे घेणे, शेतकरी व साहित्यिक यांच्या संयुक्त सभा, ग्रामीण-दलित साहित्य संमेलनाचे आयोजन करणे यांवर भर देणार आहे.- डॉ. श्रीपाल सबनीस, संमेलनाध्यक्ष