शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘स्नेहज्योती’च्या अंध मुलांना देईल का कुणी दृष्टीचे दान?

By admin | Updated: February 26, 2015 00:14 IST

श्वास चित्रपटातील दृश्ये पाहून सगळेचजण हेलावतात. परंतु प्रत्यक्षात स्नेहज्योतीच्या मुलांच्या जीवनात प्रकाशाची पहाट झाली तर...?

शिवाजी गोरे - दापोली -- माणसाच्या जीवनात रोजच सूर्य उगवतो व मावळतो, दिवसाचा प्रकाश व रात्रीचा काळोख असतो. परंतु ज्यांनी प्रकाशच पाहिला नाही, अशांना प्रकाश व रात्रीच्या काळोखाची किंमत सारखीच असल्याची भावना त्यांच्या मनात असते. दिवस असो की रात्र अंधांच्या आयुष्यात कायमचाच अंधार असतो. असे असले तरीही जगण्याची उमेद मात्र कायम असते. दृष्टीहीन मुलेही बुद्धीने तल्लख असतात, हे अंधत्त्वावर मात करुन स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय, घराडी येथील मुलांनी दाखवून दिले आहे. या अंध मुलांच्या जीवनात प्रकाशाची पहाट येण्यासाठी समाजाने नेत्रदानासाठी पुढे येण्याची गरज आहे.मंडणगड तालुक्यातील घराडी या छोट्याशा खेडेगावात आशाताई कामत व प्रतिभा सेनगुप्ता या दोन बहिणींनी मिळून १२ वर्षांपूर्वी कोकणातील पहिली अंध शाळा सुरु केली. सुरुवातीच्या काळात अंध शाळेत मुले पाठविण्यासाठी पालक तयार होत नव्हते. २००२ साली चार अंध मुलांना एकत्र करुन छोट्याशा घरात ही अंध निवासी शाळा सुरु झाली. आज या शाळेत ३० मुले आहेत. अनेक मुले या शाळेत शिक्षण घेऊन बाहेर पडली. स्नेहज्योती अंध निवासी विद्यालयात आता आठवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. या अंध निवासी शाळेला शासनाची ८वीपर्यंतची मान्यता आहे. समाजातील दानशूर व्यक्तीनी दिलेल्या देणगीतून स्नेहज्योती अंध निवासी विद्यालयाची घोडदौड सुरु आहे. दानशूर व्यक्तीनी दिलेल्या देणगीतून शाळेला मदत मिळाली. शाळेच्या समस्या सुटल्या. परंतु मुलांना खऱ्या अर्थाने गरज आहे ती म्हणजे नेत्रदानाची.पूर्वीच्या काळी डोळ्यांच्या आजाराची साथ येत असे. त्यातून दृष्टी जाणे, काही वेळेला गरोदर महिलेला जीवनसत्व मिळाले नाही तर बाळाला दृष्टी नसणे किंवा जन्मजात आंधळे मूल जन्माला येणे असे प्रकार घडत असत. परंतु आता विज्ञान प्रगत झाले आहे. त्यामुळे अंध बाळ जन्माला येणे किंवा डोळ्यांच्या साथीचे आजारसुद्धा कमी झाले आहेत. समाजात अंधत्वाची टक्केवारी झपाट्याने कमी झाली आहे. लोकसंख्येच्या १ टक्कासुद्धा अंध व्यक्तीची संख्या आढळणार नाही. स्नेहज्योती अंध विद्यालयातील ३० मुलांना नेत्रदानाची गरज आहे. अंध मुलांच्या जीवनातील अंधार कायमचा दूर करायचा असेल, तर त्यांना गरज आहे समाजाच्या नेत्रदानाची. घरातील लाईट क्षणभर गेला व अचानक अंधार झाला तर आपण कासावीस होतो. परंतु ज्यांच्या आयुष्यात कायमचाच अंधार आहे, त्यांच्या जीवनात प्रकाशाची पहाट झाली तर कल्पनासुद्धा करु शकत नाही. श्वास चित्रपटातील दृश्ये पाहून सगळेचजण हेलावतात. परंतु प्रत्यक्षात स्नेहज्योतीच्या मुलांच्या जीवनात प्रकाशाची पहाट झाली तर...?नेत्रदान करण्याची प्रक्रिया फार सोपी आहे. कोणत्याही व्यक्तीला नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर नेत्रदान करायचे असल्याचा फॉर्म भरुन द्यायचा असतो. कोणत्याही सरकारी दवाखान्यात आपण नेत्रदान करु शकता. परंतु त्यासाठी सरकारी दवाखान्यात यंत्रणा अपुरी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात केवळ रत्नागिरी व कामथे येथेच मृत्यूनंतर नेत्र काढण्यात येणारे डॉक्टर व लॅब आहे. एखाद्या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे काढून केमिकलमध्ये ठेवण्याची प्रक्रिया ४० मिनिटांची आहे. मृत्यू झाल्यानंतर ४० मिनिटात प्रक्रिया झाली नाही तर नेत्रदान होऊ शकत नाही. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे वेळेत काढण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रात लॅब व टेक्निशियनची गरज आहे.- डॉ. प्रदीप भागवत,-उपजिल्हा आरोग्य अधिकारी, दापोलीपुढाकाराची गरजदृष्टीहीन व्यक्तीला नेत्रदानाची गरज आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे दान होऊ शकतात. नेत्रदान करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु समाजात नेत्रदानाबद्दल अजूनही जनजागृती होणे गरजेचे आहे. नेत्रदान केलेल्या व्यक्तीचे मृत्यूनंतर डोळे काढून लॅबला पाठविले जातात व त्याची योग्य तपासणी करुन ते डोळे गरजवंताला बसवले जातात.सुंदर जग पाहण्यासाठी त्यांना डोळ्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आयुष्यातील काळरात्र घालवून त्यांचे जीवन प्रकाशमय करायचे असेल तर समाजाच्या मदतीची गरज आहे. समाजात नेत्रदानाची अजूनही फारशी जागृती झालेली नाही. आपल्या मृत्यूनंतरही आपले डोळे सुंदर जग पाहणार असतील तर आपले डोळे दान देऊन अंधांना डोळस करण्याची गरज आहे. ‘नेत्रदान श्रेष्ठ दान आहे’, आपल्या मृत्यूनंतर दान केलेल्या डोळ्यांमुळे अंधांच्या आयुष्यात प्रकाश येऊ शकतो, ही संकल्पना समाजात रुजण्याची गरज आहे.