शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

‘स्नेहज्योती’च्या अंध मुलांना देईल का कुणी दृष्टीचे दान?

By admin | Updated: February 26, 2015 00:14 IST

श्वास चित्रपटातील दृश्ये पाहून सगळेचजण हेलावतात. परंतु प्रत्यक्षात स्नेहज्योतीच्या मुलांच्या जीवनात प्रकाशाची पहाट झाली तर...?

शिवाजी गोरे - दापोली -- माणसाच्या जीवनात रोजच सूर्य उगवतो व मावळतो, दिवसाचा प्रकाश व रात्रीचा काळोख असतो. परंतु ज्यांनी प्रकाशच पाहिला नाही, अशांना प्रकाश व रात्रीच्या काळोखाची किंमत सारखीच असल्याची भावना त्यांच्या मनात असते. दिवस असो की रात्र अंधांच्या आयुष्यात कायमचाच अंधार असतो. असे असले तरीही जगण्याची उमेद मात्र कायम असते. दृष्टीहीन मुलेही बुद्धीने तल्लख असतात, हे अंधत्त्वावर मात करुन स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय, घराडी येथील मुलांनी दाखवून दिले आहे. या अंध मुलांच्या जीवनात प्रकाशाची पहाट येण्यासाठी समाजाने नेत्रदानासाठी पुढे येण्याची गरज आहे.मंडणगड तालुक्यातील घराडी या छोट्याशा खेडेगावात आशाताई कामत व प्रतिभा सेनगुप्ता या दोन बहिणींनी मिळून १२ वर्षांपूर्वी कोकणातील पहिली अंध शाळा सुरु केली. सुरुवातीच्या काळात अंध शाळेत मुले पाठविण्यासाठी पालक तयार होत नव्हते. २००२ साली चार अंध मुलांना एकत्र करुन छोट्याशा घरात ही अंध निवासी शाळा सुरु झाली. आज या शाळेत ३० मुले आहेत. अनेक मुले या शाळेत शिक्षण घेऊन बाहेर पडली. स्नेहज्योती अंध निवासी विद्यालयात आता आठवीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. या अंध निवासी शाळेला शासनाची ८वीपर्यंतची मान्यता आहे. समाजातील दानशूर व्यक्तीनी दिलेल्या देणगीतून स्नेहज्योती अंध निवासी विद्यालयाची घोडदौड सुरु आहे. दानशूर व्यक्तीनी दिलेल्या देणगीतून शाळेला मदत मिळाली. शाळेच्या समस्या सुटल्या. परंतु मुलांना खऱ्या अर्थाने गरज आहे ती म्हणजे नेत्रदानाची.पूर्वीच्या काळी डोळ्यांच्या आजाराची साथ येत असे. त्यातून दृष्टी जाणे, काही वेळेला गरोदर महिलेला जीवनसत्व मिळाले नाही तर बाळाला दृष्टी नसणे किंवा जन्मजात आंधळे मूल जन्माला येणे असे प्रकार घडत असत. परंतु आता विज्ञान प्रगत झाले आहे. त्यामुळे अंध बाळ जन्माला येणे किंवा डोळ्यांच्या साथीचे आजारसुद्धा कमी झाले आहेत. समाजात अंधत्वाची टक्केवारी झपाट्याने कमी झाली आहे. लोकसंख्येच्या १ टक्कासुद्धा अंध व्यक्तीची संख्या आढळणार नाही. स्नेहज्योती अंध विद्यालयातील ३० मुलांना नेत्रदानाची गरज आहे. अंध मुलांच्या जीवनातील अंधार कायमचा दूर करायचा असेल, तर त्यांना गरज आहे समाजाच्या नेत्रदानाची. घरातील लाईट क्षणभर गेला व अचानक अंधार झाला तर आपण कासावीस होतो. परंतु ज्यांच्या आयुष्यात कायमचाच अंधार आहे, त्यांच्या जीवनात प्रकाशाची पहाट झाली तर कल्पनासुद्धा करु शकत नाही. श्वास चित्रपटातील दृश्ये पाहून सगळेचजण हेलावतात. परंतु प्रत्यक्षात स्नेहज्योतीच्या मुलांच्या जीवनात प्रकाशाची पहाट झाली तर...?नेत्रदान करण्याची प्रक्रिया फार सोपी आहे. कोणत्याही व्यक्तीला नेत्रदान करता येते. मृत्यूनंतर नेत्रदान करायचे असल्याचा फॉर्म भरुन द्यायचा असतो. कोणत्याही सरकारी दवाखान्यात आपण नेत्रदान करु शकता. परंतु त्यासाठी सरकारी दवाखान्यात यंत्रणा अपुरी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात केवळ रत्नागिरी व कामथे येथेच मृत्यूनंतर नेत्र काढण्यात येणारे डॉक्टर व लॅब आहे. एखाद्या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे काढून केमिकलमध्ये ठेवण्याची प्रक्रिया ४० मिनिटांची आहे. मृत्यू झाल्यानंतर ४० मिनिटात प्रक्रिया झाली नाही तर नेत्रदान होऊ शकत नाही. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे वेळेत काढण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रात लॅब व टेक्निशियनची गरज आहे.- डॉ. प्रदीप भागवत,-उपजिल्हा आरोग्य अधिकारी, दापोलीपुढाकाराची गरजदृष्टीहीन व्यक्तीला नेत्रदानाची गरज आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे दान होऊ शकतात. नेत्रदान करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु समाजात नेत्रदानाबद्दल अजूनही जनजागृती होणे गरजेचे आहे. नेत्रदान केलेल्या व्यक्तीचे मृत्यूनंतर डोळे काढून लॅबला पाठविले जातात व त्याची योग्य तपासणी करुन ते डोळे गरजवंताला बसवले जातात.सुंदर जग पाहण्यासाठी त्यांना डोळ्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आयुष्यातील काळरात्र घालवून त्यांचे जीवन प्रकाशमय करायचे असेल तर समाजाच्या मदतीची गरज आहे. समाजात नेत्रदानाची अजूनही फारशी जागृती झालेली नाही. आपल्या मृत्यूनंतरही आपले डोळे सुंदर जग पाहणार असतील तर आपले डोळे दान देऊन अंधांना डोळस करण्याची गरज आहे. ‘नेत्रदान श्रेष्ठ दान आहे’, आपल्या मृत्यूनंतर दान केलेल्या डोळ्यांमुळे अंधांच्या आयुष्यात प्रकाश येऊ शकतो, ही संकल्पना समाजात रुजण्याची गरज आहे.