शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

आपल्या दोघांत ज्ञानी कोण साहेब?

By admin | Updated: January 18, 2015 01:12 IST

शरद पवार यांनी एफआरपीवरून, राज्य सरकारला आणि सहकारमंत्र्यांना धारेवर धरले. त्यांना ज्ञानी पुरुष म्हटले

शरद पवार यांनी एफआरपीवरून, राज्य सरकारला आणि सहकारमंत्र्यांना धारेवर धरले. त्यांना ज्ञानी पुरुष म्हटले. दादासाहेब एवढी वर्षे मोठ्या साहेबांनाच ज्ञानी समजत होते. आता त्यांनीच सहकारमंत्र्यांना ज्ञानी म्हटल्यामुळे दादासाहेबांना प्रश्न पडला की दोघांमध्ये नेमके ज्ञानी कोण? त्याचा खुलासा विचारणारे पत्र त्यांनी मोठ्या साहेबांना पाठवले. ते असे...आमचे बाबूराव सांगत होते, कारखान्याची रिकव्हरी १० असेल तर कारखाना तोट्यात जाऊच शकत नाही. पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखान्यांची रिकव्हरी किती आहे साहेब..? कारखान्याच्या आडून आपल्या पक्षाचं राजकारण धोक्यात आणण्याचा रडीचा डाव तर नवीन सरकार खेळत नाही ना...आदरणीय मोठे साहेब,डोकं पार भणाणून गेलंय... आजवर आम्ही आपल्याला जाणता राजा, ज्ञानी नेता समजत होतो मात्र आपण तर थेट सहकारमंत्री आपल्यापेक्षा जास्त ज्ञानी पुरुष आहेत, असं म्हणालात. आमचं तर डोकच काम करेनासं झालंय बघा... आपण पश्चिम महाराष्ट्रातले. सहकारमंत्री पण तिकडचेच. सगळे ज्ञानी, जाणते लोक तिकडेच कसे काय, असं मला मराठवाड्यातून अशोकराव चव्हाण विचारत होते. ते जाऊ द्या... आपण एफआरपीपेक्षा जास्ती पैसे देत होता तेव्हा आपल्याला इन्कमटॅक्सवाल्यांनी नोटिसा पाठवल्या, असं आपण म्हणालात. मग आता तशा नोटिसा येऊ नयेत म्हणून तरी आपण एफआरपी एवढा दर का देत नाही... आणि नोटिसा येतात म्हणून कारखाने तोट्यात चालवले की काय आजपर्यंत आपल्या नेत्यांनी...? आपलं तर डोस्कच भंजाळून गेलंय साहेब... सहकारमंत्री म्हणतात, एफआरपीनुसार पैसे द्या, आपण देत नाही, आपल्याला कोणी अडवलंय का एफआरपीनुसार पैसे द्यायला...? नावं सांगा त्यांची; त्यांच्यावर गुन्हेच दाखल करायला लावू गृहराज्यमंत्र्यांना... एफआरपी दिलाच पाहिजे असा काही कायदा असतो का साहेब...? मी काही तेवढा ज्ञानी नाही, म्हणून विचारलं... कारखाना मोडला तरी चालेल पण बळीराजा मोडता कामा नये, असं आपण का म्हणत नाही साहेब...? आणि एफआरपी नाही दिला तर कारखाने जप्त करू असं सहकारमंत्री म्हणतात... आपल्या दोघांच्या या वादावादीत नेमकं कोण जास्त ज्ञानी हे काही कळेना बघा साहेब... वर्षानुवर्षे कारखान्यांच्या माध्यमातून चालणारं गावागावातलं राजकारण, अर्थकारण धोक्यात आणण्याचा तर हेतू नाही ना त्या सहकारमंत्र्यांचा...? आमचे बाबूराव सांगत होते, संचालक मंडळाच्या वारेमाप खर्चामुळं कारखाने अडचणीत आले की सरकारी तिजोरीतून कारखान्यांना वेळोवेळी निधी मिळवून देत होता... मागे तर काही संचालकांनी अंगवस्त्रंसुद्धा या खर्चातून घेतली होती म्हणे... या अशाच उधळपट्टीमुळं तर राज्य सहकारी बँक डुबली नसेल ना साहेब...? राज्य बँकेच्या संचालकांनी ज्या ज्या कारखान्यांना कर्ज दिले त्या त्या कारखान्यांच्या संचालकांनी त्या पैशांचं काय केलं तेपण शोधायचं का साहेब...? शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या संचालकांच्या मालमत्ता जप्त करायला सांगायच्या का? नाहीतर ते सहकारमंत्री तसं बोलून जातील... सहज आठवलं साहेब, गोविंदराव आदिक यांनी केसांना बरेच दिवस कलर केला नाही आणि त्यांचे केस पांढरे दिसू लागले तेव्हा आपण त्यांना म्हणालात म्हणे की तुम्ही एकदम विचारवंत दिसताय पांढऱ्या केसात... तेव्हापासून त्यांनी केस काळे करणं सोडून दिलं आणि आपण मात्र आजही मस्त केस काळे करता ना साहेब... आमच्या दृष्टीनं तर आपणच ज्ञानी; पण कालच्या बोलण्यानं सगळा विस्कोट झालाय डोक्यात... राग मानू नका... पण शेवटचा एकच प्रश्न विचारतो, सहकारी कारखाने तोट्यातच आणि खाजगी कारखाने फायद्यातच चालतात; असं का होतं साहेब आपल्या राज्यात...? आपलाच दादासाहेबअतुल कुलकर्णी