शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या दोघांत ज्ञानी कोण साहेब?

By admin | Updated: January 18, 2015 01:12 IST

शरद पवार यांनी एफआरपीवरून, राज्य सरकारला आणि सहकारमंत्र्यांना धारेवर धरले. त्यांना ज्ञानी पुरुष म्हटले

शरद पवार यांनी एफआरपीवरून, राज्य सरकारला आणि सहकारमंत्र्यांना धारेवर धरले. त्यांना ज्ञानी पुरुष म्हटले. दादासाहेब एवढी वर्षे मोठ्या साहेबांनाच ज्ञानी समजत होते. आता त्यांनीच सहकारमंत्र्यांना ज्ञानी म्हटल्यामुळे दादासाहेबांना प्रश्न पडला की दोघांमध्ये नेमके ज्ञानी कोण? त्याचा खुलासा विचारणारे पत्र त्यांनी मोठ्या साहेबांना पाठवले. ते असे...आमचे बाबूराव सांगत होते, कारखान्याची रिकव्हरी १० असेल तर कारखाना तोट्यात जाऊच शकत नाही. पश्चिम महाराष्ट्रातल्या कारखान्यांची रिकव्हरी किती आहे साहेब..? कारखान्याच्या आडून आपल्या पक्षाचं राजकारण धोक्यात आणण्याचा रडीचा डाव तर नवीन सरकार खेळत नाही ना...आदरणीय मोठे साहेब,डोकं पार भणाणून गेलंय... आजवर आम्ही आपल्याला जाणता राजा, ज्ञानी नेता समजत होतो मात्र आपण तर थेट सहकारमंत्री आपल्यापेक्षा जास्त ज्ञानी पुरुष आहेत, असं म्हणालात. आमचं तर डोकच काम करेनासं झालंय बघा... आपण पश्चिम महाराष्ट्रातले. सहकारमंत्री पण तिकडचेच. सगळे ज्ञानी, जाणते लोक तिकडेच कसे काय, असं मला मराठवाड्यातून अशोकराव चव्हाण विचारत होते. ते जाऊ द्या... आपण एफआरपीपेक्षा जास्ती पैसे देत होता तेव्हा आपल्याला इन्कमटॅक्सवाल्यांनी नोटिसा पाठवल्या, असं आपण म्हणालात. मग आता तशा नोटिसा येऊ नयेत म्हणून तरी आपण एफआरपी एवढा दर का देत नाही... आणि नोटिसा येतात म्हणून कारखाने तोट्यात चालवले की काय आजपर्यंत आपल्या नेत्यांनी...? आपलं तर डोस्कच भंजाळून गेलंय साहेब... सहकारमंत्री म्हणतात, एफआरपीनुसार पैसे द्या, आपण देत नाही, आपल्याला कोणी अडवलंय का एफआरपीनुसार पैसे द्यायला...? नावं सांगा त्यांची; त्यांच्यावर गुन्हेच दाखल करायला लावू गृहराज्यमंत्र्यांना... एफआरपी दिलाच पाहिजे असा काही कायदा असतो का साहेब...? मी काही तेवढा ज्ञानी नाही, म्हणून विचारलं... कारखाना मोडला तरी चालेल पण बळीराजा मोडता कामा नये, असं आपण का म्हणत नाही साहेब...? आणि एफआरपी नाही दिला तर कारखाने जप्त करू असं सहकारमंत्री म्हणतात... आपल्या दोघांच्या या वादावादीत नेमकं कोण जास्त ज्ञानी हे काही कळेना बघा साहेब... वर्षानुवर्षे कारखान्यांच्या माध्यमातून चालणारं गावागावातलं राजकारण, अर्थकारण धोक्यात आणण्याचा तर हेतू नाही ना त्या सहकारमंत्र्यांचा...? आमचे बाबूराव सांगत होते, संचालक मंडळाच्या वारेमाप खर्चामुळं कारखाने अडचणीत आले की सरकारी तिजोरीतून कारखान्यांना वेळोवेळी निधी मिळवून देत होता... मागे तर काही संचालकांनी अंगवस्त्रंसुद्धा या खर्चातून घेतली होती म्हणे... या अशाच उधळपट्टीमुळं तर राज्य सहकारी बँक डुबली नसेल ना साहेब...? राज्य बँकेच्या संचालकांनी ज्या ज्या कारखान्यांना कर्ज दिले त्या त्या कारखान्यांच्या संचालकांनी त्या पैशांचं काय केलं तेपण शोधायचं का साहेब...? शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या संचालकांच्या मालमत्ता जप्त करायला सांगायच्या का? नाहीतर ते सहकारमंत्री तसं बोलून जातील... सहज आठवलं साहेब, गोविंदराव आदिक यांनी केसांना बरेच दिवस कलर केला नाही आणि त्यांचे केस पांढरे दिसू लागले तेव्हा आपण त्यांना म्हणालात म्हणे की तुम्ही एकदम विचारवंत दिसताय पांढऱ्या केसात... तेव्हापासून त्यांनी केस काळे करणं सोडून दिलं आणि आपण मात्र आजही मस्त केस काळे करता ना साहेब... आमच्या दृष्टीनं तर आपणच ज्ञानी; पण कालच्या बोलण्यानं सगळा विस्कोट झालाय डोक्यात... राग मानू नका... पण शेवटचा एकच प्रश्न विचारतो, सहकारी कारखाने तोट्यातच आणि खाजगी कारखाने फायद्यातच चालतात; असं का होतं साहेब आपल्या राज्यात...? आपलाच दादासाहेबअतुल कुलकर्णी