शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा नियम नक्की कोणासाठी?

By admin | Updated: July 12, 2017 02:09 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण आॅनलाइन करण्यात आल्यापासून शिक्षण विभाग टीकेचा धनी झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण आॅनलाइन करण्यात आल्यापासून शिक्षण विभाग टीकेचा धनी झाला. त्यातच आता शासनाने घेतलेल्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा निर्णय हा फक्त ठरावीक संस्थाचालकांसाठीच का, असा प्रश्न शिक्षण सुधारणा मोहीमतर्फे (सिसकॉम) उपस्थित केला आहे. आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यापासून गुणवत्ता डावलून प्रवेश दिले जात आहेत. २८ मार्च २०१६च्या शासन निर्णयात १०वीपर्यंतचे वर्ग जोडून नसलेल्या आणि एकाच कॅम्पसमध्ये नसलेल्या वरिष्ठ महाविद्यालयांना जोडून असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना इन-हाउस कोटा लागू झाला. त्यामुळे २५ टक्के जागा या संस्थाचालकांना व्यवस्थापन स्तरावर भरण्यास परवानगी मिळाली. यामुळे नियमित प्रवेशासाठीच्या जागा २५ टक्क्यांनी कमी झाल्याने त्याचा खुल्या वर्गातील जागा कमी होण्यात झाला; तसेच कटआॅफदेखील वाढला असल्याचे सिसकॉमच्या संचालक वैशाली बाफना यांनी स्पष्ट केले आहे. १९९७मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, सर्व स्तरावरील सर्व प्रवेश हे केवळ गुणवत्तेच्या आधारे झाले पाहिजेत. सर्व आरक्षण अथवा कोट्यातील प्रवेशासाठीचे नियम, आवश्यक कागदपत्रे, प्रवेश पद्धती व त्यातील उर्वरित जागा भरण्याचे निर्देश दिले. यात २३ जून १९९९ व २७ एप्रिल २००१ अपंग, २७ मे २००३ व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोटा, २५ मार्च २०१० बदली कर्मचारी, २६ जून २००८ व २५ मार्च २०१० कला व क्रीडाच्या राखीव जागांवर प्रवेश देताना खेळातील उच्च अर्हता प्राप्त असणाऱ्या खेळाडंूना प्राधान्य दिले आहे. तर, ७ जानेवारी २०१७च्या शासन निर्णयात याचे गुणात रूपांतर करून कला/क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता डावलली आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह असल्याचे बाफना यांनी स्पष्ट केले. २८ मार्च २०१६च्या शासन निर्णयात १०वीपर्यंतचे वर्ग जोडून नसलेल्या आणि एकाच कॅम्पसमध्ये नसलेल्या वरिष्ठ महाविद्यालयांना जोडून असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना इन-हाउस कोटा लागू झाला. २५ टक्के जागा या संस्थाचालकांना भरण्यास परवानगी मिळाली.