शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

‘मी कोण बाई, मलाच ठाऊक नाही?’

By admin | Updated: January 19, 2016 01:30 IST

नव्वदच्या दशकापासून आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरणाच्या वेढ्यात समाज ढवळून निघाला आणि स्त्रीच्या जीवनालाही नवे आयाम प्राप्त झाले

ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी) : नव्वदच्या दशकापासून आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरणाच्या वेढ्यात समाज ढवळून निघाला आणि स्त्रीच्या जीवनालाही नवे आयाम प्राप्त झाले. ‘स्व’चे अस्तित्व, ‘स्व’शी संघर्ष यातूनच स्त्रीवादाचा आणि स्त्रीवादी साहित्याचा जन्म झाला. कवितेतून अनुभव व्यक्त करण्याचे धाडस स्त्रीने दाखवले. या प्रवासाचा अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे; त्यासाठी चिकित्सा, विश्लेषण सुरूच राहणार आहे, असे मत मान्यवर कवींनी व्यक्त केले.८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये ‘१९८० नंतरची मराठी कविता स्त्रीकेंद्रित आहे’ या विषयावर परिसंवाद आयोजिण्यात आला होता. लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे अध्यक्षस्थानी होत्या. परिसंवादात डॉ. मनोहर जाधव, सीमा रोठे, डॉ. समिता चव्हाण, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, प्रा. रुपाली शिंदे, सुषमा करोगल यांनी सहभाग नोंदविला.डॉ. कार्व्हालो म्हणाल्या, ‘‘स्त्री ही माणूसच आहे, हा विचार आजच्या कवितेतून दिसतो. आजच्या कविता आश्वासक, धाडसी वाटतात. पूर्वी स्त्रिया व्यक्त होऊ शकत नव्हत्या. त्या वेळी त्यांच्या वतीने दुसरे कोणीतरी लिहायचे. आजच्या मानवकेंद्रित कवितेने स्त्रीला अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिले.’’प्रा. शिंदे यांनी सांगितले, ‘‘स्त्रीला शिक्षण मिळायला सुरुवात झाल्यावर तिने सामाजिक, सांस्कृतिक वारसा जपला. कवितेच्या माध्यमातून स्त्रीला ‘अच्छे दिन’ आले. तिचे हे स्वतंत्र अस्तित्व मोठ्या मनाने समाजाने स्वीकारण्याची गरज आहे.’’डॉ. चव्हाण म्हणाल्या, ‘‘बंड, असमानता हे स्त्रीच्या अनुभवविश्वाचे पदर आहेत. स्त्रियांची संवेदनशीलता, अनुभवविश्व, जाणिवा यामुळे कविता विस्तारते. मात्र, आदिवासी, मुरळी, श्रमिक, शरीरविक्रय करणाऱ्या महिला अशा विविध स्तरांमधील चित्र अद्याप कवितांमधून मोठ्या प्रमाणात मांडले गेलेले नाही. जुन्या, पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देऊन नवी परंपरा निर्माण करणाऱ्या कविता आता निर्माण होण्याची गरज आहे.’’रोठे यांनी १९७५ नंतरच्या आंतरराष्ट्रीय महिला वर्षानंतर स्त्रीच्या लाजरेपणाला शब्दांचे धुमारे फुटले, असे सांगत अंतर्मनातला कोलाहल व्यक्त करण्याचे कविता हे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. आजची कविता बहुआयामी, चौमुखी आहे, असेही त्या म्हणाल्या.सुषमा करोगल म्हणाल्या, ‘‘लेखकाचे अनुभवविश्व भावनिक, वैचारिक साद-प्रतिसादातून समृद्ध होते. एकसिक विचारप्रणाली कोणत्याही कलाविष्कारात दिसत नाही. पुरुषी मानसिकतेतून स्त्रीकेंद्रित होण्याचे काही प्रयत्न या काळात झाले आहेत.’’ (प्रतिनिधी)