शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘मी कोण बाई, मलाच ठाऊक नाही?’

By admin | Updated: January 19, 2016 01:30 IST

नव्वदच्या दशकापासून आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरणाच्या वेढ्यात समाज ढवळून निघाला आणि स्त्रीच्या जीवनालाही नवे आयाम प्राप्त झाले

ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी) : नव्वदच्या दशकापासून आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरणाच्या वेढ्यात समाज ढवळून निघाला आणि स्त्रीच्या जीवनालाही नवे आयाम प्राप्त झाले. ‘स्व’चे अस्तित्व, ‘स्व’शी संघर्ष यातूनच स्त्रीवादाचा आणि स्त्रीवादी साहित्याचा जन्म झाला. कवितेतून अनुभव व्यक्त करण्याचे धाडस स्त्रीने दाखवले. या प्रवासाचा अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे; त्यासाठी चिकित्सा, विश्लेषण सुरूच राहणार आहे, असे मत मान्यवर कवींनी व्यक्त केले.८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये ‘१९८० नंतरची मराठी कविता स्त्रीकेंद्रित आहे’ या विषयावर परिसंवाद आयोजिण्यात आला होता. लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे अध्यक्षस्थानी होत्या. परिसंवादात डॉ. मनोहर जाधव, सीमा रोठे, डॉ. समिता चव्हाण, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, प्रा. रुपाली शिंदे, सुषमा करोगल यांनी सहभाग नोंदविला.डॉ. कार्व्हालो म्हणाल्या, ‘‘स्त्री ही माणूसच आहे, हा विचार आजच्या कवितेतून दिसतो. आजच्या कविता आश्वासक, धाडसी वाटतात. पूर्वी स्त्रिया व्यक्त होऊ शकत नव्हत्या. त्या वेळी त्यांच्या वतीने दुसरे कोणीतरी लिहायचे. आजच्या मानवकेंद्रित कवितेने स्त्रीला अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिले.’’प्रा. शिंदे यांनी सांगितले, ‘‘स्त्रीला शिक्षण मिळायला सुरुवात झाल्यावर तिने सामाजिक, सांस्कृतिक वारसा जपला. कवितेच्या माध्यमातून स्त्रीला ‘अच्छे दिन’ आले. तिचे हे स्वतंत्र अस्तित्व मोठ्या मनाने समाजाने स्वीकारण्याची गरज आहे.’’डॉ. चव्हाण म्हणाल्या, ‘‘बंड, असमानता हे स्त्रीच्या अनुभवविश्वाचे पदर आहेत. स्त्रियांची संवेदनशीलता, अनुभवविश्व, जाणिवा यामुळे कविता विस्तारते. मात्र, आदिवासी, मुरळी, श्रमिक, शरीरविक्रय करणाऱ्या महिला अशा विविध स्तरांमधील चित्र अद्याप कवितांमधून मोठ्या प्रमाणात मांडले गेलेले नाही. जुन्या, पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देऊन नवी परंपरा निर्माण करणाऱ्या कविता आता निर्माण होण्याची गरज आहे.’’रोठे यांनी १९७५ नंतरच्या आंतरराष्ट्रीय महिला वर्षानंतर स्त्रीच्या लाजरेपणाला शब्दांचे धुमारे फुटले, असे सांगत अंतर्मनातला कोलाहल व्यक्त करण्याचे कविता हे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. आजची कविता बहुआयामी, चौमुखी आहे, असेही त्या म्हणाल्या.सुषमा करोगल म्हणाल्या, ‘‘लेखकाचे अनुभवविश्व भावनिक, वैचारिक साद-प्रतिसादातून समृद्ध होते. एकसिक विचारप्रणाली कोणत्याही कलाविष्कारात दिसत नाही. पुरुषी मानसिकतेतून स्त्रीकेंद्रित होण्याचे काही प्रयत्न या काळात झाले आहेत.’’ (प्रतिनिधी)