शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

आयुक्तांना कुणाची भीती वाटते?

By admin | Updated: February 13, 2017 03:11 IST

ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता असतानाही आयुक्त संजीव जयस्वाल यांना काम करण्याची भीती वाटते. ते मध्यरात्री त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतात.

ठाणे : ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता असतानाही आयुक्त संजीव जयस्वाल यांना काम करण्याची भीती वाटते. ते मध्यरात्री त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतात. आयुक्तांना नेमकी कुणाची भीती वाटते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केला. आयुक्तांनाही भीती वाटेल अशी राजवट बदलून टाका, असे आवाहन त्यांनी ठाण्यातील मतदारांना केले. ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. आयुक्तांसारखा अधिकारी निर्भयपणे काम करू शकत नसेल, तर ्सा गुन्हेगारी प्रवृत्तींच्या हाती पुन्हा महापालिकेचा कारभार देणार का, असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. ठाण्यातील ७0 ते ८0 टक्के रहिवासी अनधिकृत इमारती आणि चाळींमध्ये वास्तव्यास आहेत. त्यासाठी अनेक वर्षांपासून क्लस्टरचा प्रश्न पालिका किंवा राज्य शासन सोडवू शकले नाही. हे चित्र बदलायचे असेल तर सत्ता परिवर्तनावाचून गत्यंतर नाही. ठाणे, उल्हासनगर पालिकांची निवडणूक बदल घडवणारी आहे. विधान परिषद निवडणुकीत कोकण आणि नाशिक मतदारसंघात आघाडीचे उमेदवार निवडून आले. ही सत्ताबदलाची नांदी असून मतदार भाजप-सेनेला जागा दाखवतील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील उद्योगधंदे उभारणीत एमआयडीसीचे तत्कालीन अध्यक्ष ठाण्याचे वागळे यांचा सिंहाचा वाटा आहे. एकेकाळी महाराष्ट्रात ठाणे-वागळे इस्टेट भागात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे होते. हे उद्योगधंदे गेले कोठे, बेरोजगारीचा प्रश्नही सुटलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)