शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

खारेपाटात २०० हेक्टरवर पांढरा कांदा

By admin | Updated: January 18, 2017 03:33 IST

अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील २०० हेक्टर शेतजमिनीवर ४५० शेतकऱ्यांनी पांढऱ्या कांद्याची लागवड केली

जयंत धुळप,

अलिबाग- आपल्या औषधी गुणधर्मामुळे गेल्या १०० वर्षांपासून देशात प्रसिध्द असलेल्या अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील ‘पांढऱ्या’ कांद्याचे सर्वांनाच आकर्षण असते. विशिष्ट पद्धतीने विणलेल्या या पांढऱ्या कांद्याच्या माळांना बाजारपेठेत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यंदा अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील २०० हेक्टर शेतजमिनीवर ४५० शेतकऱ्यांनी पांढऱ्या कांद्याची लागवड केली असल्याची माहिती अलिबाग तालुका कृषी अधिकारी बी. एस. जानुगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.जमिनीला मुळत:च असणाऱ्या खारवटपणामुळे या पांढऱ्या कांद्याची चव तिखट नसून गोड आहे आणि म्हणूनच हा पांढरा कांदा खारेपाटातील शेतजमिनीतच होत असतो. परिणामी त्याच्या उत्पादनावर मर्यादा असते. हेक्टरी सुमारे २२ क्विंटल उत्पादकता असणाऱ्या या पांढऱ्या कांद्याचे यंदाच्या हंगामात एकूण ४ हजार ४०० क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. लागवडीखालील क्षेत्रापैकी ६५ टक्के क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची लागवड पूर्ण झाली आहे. अलिबाग तालुक्यातील कार्ले गावातील सतीश व रंजना म्हात्रे या म्हात्रे कुटुंबीयांनी पांढऱ्या कांद्याच्या लागवडीत मोठी किमया केली असून त्यांनी एक हेक्टरमध्ये कांदा लागवड करून ३० टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यातून सुमारे चार लाख रूपये मिळणे त्यांना अपेक्षित आहे. लागवड औषधे, खते, मजुरी आदींचा खर्च भागवून नफा होईल असा त्यांना विश्वास आहे. म्हात्रे कु टुंबाची पाचवी पिढी पांढऱ्या कांद्याची लागवड करीत असून गेल्या शंभर वर्षांची परंपरा त्यांनी आजही टिकवून ठेवली आहे. पांढऱ्या कांद्याचे अधिक उत्पादन यावे याकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे, तालुका कृषी अधिकारी जानुगडे, सचिन भोईर आदींनी मार्गदर्शन केल्याचेम्हात्रे म्हणाले. >450शेतकऱ्यांनी अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील गावांमध्ये २०० हेक्टर शेतजमिनीवर पांढऱ्या कांद्याची लागवड केली आहे. या कांद्याला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आयुर्वेदामध्येही या कांद्याला विशेष महत्त्व आहे.65टक्के क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची लागवड पूर्ण झाली आहे तर काही क्षेत्रातील पांढरा कांदा तयार होवून बाजारात देखील आला आहे. आता हा पांढरा कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात येणार असल्याने त्याला भाव देखील चांगला मिळेल आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. शेतकरी चांगल्या उत्पन्नासाठी प्रयत्न करत आहेत.400रु पयांना गतवर्षी आठ किलो (एक मण) पांढरा कांदा प्रारंभीच्या काळात तर अखेरच्या काळात ३०० रुपयांनी विक्री के ल्याचेपवेळ- खंडाळा येथील महिला शेतकरी नीता नंदू सोडवे यांनी सांगितले.>चांगली विक्रीपांढऱ्या कांद्याची लागवड, उत्पादनाकरिता म्हात्रे परिवाराने या परिसरातील महिलावर्गाला सुमारे तीन महिने रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. पांढऱ्या कांद्यामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे म्हात्रे कुटुंबीयांनी उत्पादित केलेला कांदा रायगड जिल्ह्यासह मुंबई, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आदी ठिकाणीही गतवर्षी पोहोचला आहे. गतवर्षी मुंबईमधील मॉलमध्ये कांद्याची चांगली विक्री झाली.