शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

खारेपाटात २०० हेक्टरवर पांढरा कांदा

By admin | Updated: January 18, 2017 03:33 IST

अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील २०० हेक्टर शेतजमिनीवर ४५० शेतकऱ्यांनी पांढऱ्या कांद्याची लागवड केली

जयंत धुळप,

अलिबाग- आपल्या औषधी गुणधर्मामुळे गेल्या १०० वर्षांपासून देशात प्रसिध्द असलेल्या अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील ‘पांढऱ्या’ कांद्याचे सर्वांनाच आकर्षण असते. विशिष्ट पद्धतीने विणलेल्या या पांढऱ्या कांद्याच्या माळांना बाजारपेठेत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यंदा अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील २०० हेक्टर शेतजमिनीवर ४५० शेतकऱ्यांनी पांढऱ्या कांद्याची लागवड केली असल्याची माहिती अलिबाग तालुका कृषी अधिकारी बी. एस. जानुगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.जमिनीला मुळत:च असणाऱ्या खारवटपणामुळे या पांढऱ्या कांद्याची चव तिखट नसून गोड आहे आणि म्हणूनच हा पांढरा कांदा खारेपाटातील शेतजमिनीतच होत असतो. परिणामी त्याच्या उत्पादनावर मर्यादा असते. हेक्टरी सुमारे २२ क्विंटल उत्पादकता असणाऱ्या या पांढऱ्या कांद्याचे यंदाच्या हंगामात एकूण ४ हजार ४०० क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. लागवडीखालील क्षेत्रापैकी ६५ टक्के क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची लागवड पूर्ण झाली आहे. अलिबाग तालुक्यातील कार्ले गावातील सतीश व रंजना म्हात्रे या म्हात्रे कुटुंबीयांनी पांढऱ्या कांद्याच्या लागवडीत मोठी किमया केली असून त्यांनी एक हेक्टरमध्ये कांदा लागवड करून ३० टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले असून त्यातून सुमारे चार लाख रूपये मिळणे त्यांना अपेक्षित आहे. लागवड औषधे, खते, मजुरी आदींचा खर्च भागवून नफा होईल असा त्यांना विश्वास आहे. म्हात्रे कु टुंबाची पाचवी पिढी पांढऱ्या कांद्याची लागवड करीत असून गेल्या शंभर वर्षांची परंपरा त्यांनी आजही टिकवून ठेवली आहे. पांढऱ्या कांद्याचे अधिक उत्पादन यावे याकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे, तालुका कृषी अधिकारी जानुगडे, सचिन भोईर आदींनी मार्गदर्शन केल्याचेम्हात्रे म्हणाले. >450शेतकऱ्यांनी अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील गावांमध्ये २०० हेक्टर शेतजमिनीवर पांढऱ्या कांद्याची लागवड केली आहे. या कांद्याला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आयुर्वेदामध्येही या कांद्याला विशेष महत्त्व आहे.65टक्के क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची लागवड पूर्ण झाली आहे तर काही क्षेत्रातील पांढरा कांदा तयार होवून बाजारात देखील आला आहे. आता हा पांढरा कांदा टप्प्याटप्प्याने बाजारात येणार असल्याने त्याला भाव देखील चांगला मिळेल आणि शेतकऱ्यांचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. शेतकरी चांगल्या उत्पन्नासाठी प्रयत्न करत आहेत.400रु पयांना गतवर्षी आठ किलो (एक मण) पांढरा कांदा प्रारंभीच्या काळात तर अखेरच्या काळात ३०० रुपयांनी विक्री के ल्याचेपवेळ- खंडाळा येथील महिला शेतकरी नीता नंदू सोडवे यांनी सांगितले.>चांगली विक्रीपांढऱ्या कांद्याची लागवड, उत्पादनाकरिता म्हात्रे परिवाराने या परिसरातील महिलावर्गाला सुमारे तीन महिने रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. पांढऱ्या कांद्यामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे म्हात्रे कुटुंबीयांनी उत्पादित केलेला कांदा रायगड जिल्ह्यासह मुंबई, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आदी ठिकाणीही गतवर्षी पोहोचला आहे. गतवर्षी मुंबईमधील मॉलमध्ये कांद्याची चांगली विक्री झाली.