शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

शिवसेनेच्या आमदारांना व्हिप जारी

By admin | Updated: November 12, 2014 02:11 IST

शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षपदाचे पक्षाचे उमेदवार विजय औटी यांना मतदान करावे, असा व्हिप पक्षाने जारी केला आहे.

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षपदाचे पक्षाचे उमेदवार विजय औटी यांना मतदान करावे, असा व्हिप पक्षाने जारी केला आहे. मात्र त्याचवेळी औटी यांची उमेदवारी मागे घेण्याकरिता शिवसेना-भाजपाच्या राज्यातील नेत्यांमधील वाटाघाटी सुरू झाल्या असल्या, तरी निर्णयाची सर्व सूत्रे भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या हाती असल्याने शिवसेनेच्या 1क् मंत्रिपदांच्या मागणीचे काय होणार, ते स्पष्ट नाही.
शिवसेनेच्या अनेक आमदारांमध्ये सत्ताधारी बाजूला बसण्याची तीव्र इच्छा आहे. मात्र हीच बाब हेरून
उद्धव यांनी जोर्पयत सन्मानजनक तोडगा निघत नाही तोर्पयत कुठलीही तडजोड स्वीकारणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेला विरोधी पक्षात बसायचे आहे आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मतदान करायचे आहे, असे बजावले.
विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर करवून घेताना मात्र 
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय मंत्री अरुण जेटली हे त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर
केलेली टीका आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्य़ापासून अनिल देसाई यांना दूर ठेवण्याचा निर्णय यामुळे शहा नाराज आहेत. शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिला तर घ्या, मात्र त्यांच्या अटी मान्य करून पाठिंबा नको, असे शहा यांचे मत आहे. 
 
राष्ट्रवादीला सोबत घेण्यासही आक्षेप
च्खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारामध्ये ज्या पक्षाचा ‘नॅचरली भ्रष्ट पार्टी’, असा उल्लेख केला होता त्या पक्षाचे सहकार्य घेणार का, असे टीकेचे सूर भाजपाच्या विरोधात उमटत आहेत. शिवसेनेने भाजपाला पाठिंबा दिला तर या टीकेतून भाजपाला स्वत:चा बचाव करता येणार आहे. भाजपा-शिवसेना एकत्र येताना दिसत नाहीत. या पाश्र्वभूमीवर राज्यात अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी सरकारला पाठिंबा देणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. मात्र आता शिवसेना भाजपा सोबत गेली तर राष्ट्रवादी उद्या काय करते, याबाबत उत्सुकता आहे. 
च्विधानसभा निवडणुकीत तुटलेली युती, प्रचारात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुखपत्र सामनाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेले प्रहार, निवडणूक निकालानंतरही कायम राहिलेली कटुता, राज्य मंत्रिमंडळात शिवसेनेने सहभागी होण्यावरून निर्माण झालेला तणाव, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या निमित्ताने झालेली तणातणी या सगळ्या पाश्र्वभूमीवर युती पूर्णत: तुटणार, असे बोलले जात असताना पुन्हा एकदा दोघे जवळ येताना दिसत आहेत.