शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

देशरक्षण करताना गावच्या विकासाचं स्वप्नं अधुरं

By admin | Updated: November 18, 2015 00:14 IST

शहीद संतोष... तुझे सलाम : पोगरवाडीच्या भल्यासाठी पुढच्या महिन्यात घेतली जाणार होती गावकऱ्यांची बैठक

सातारा : अतिरेक्यांच्या गोळ्या छातीवर झेलत भारतमातेचं रक्षण करणाऱ्या शहीद संतोष महाडिकांचं एक स्वप्नं मात्र अधुरं राहिलं. त्यांना त्यांच्या पोगरवाडीचा विकास करायचा होता. त्यासाठी ते डिसेंबरमध्ये येऊन गावकऱ्यांची बैठकही घेणार होते. काश्मीरमधील कुपवाडा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आलेल्या कर्नल संतोष महाडिक यांना तीन वर्षांपूर्वी शौर्यपदक मिळाले होते. ईशान्य भारतात त्यांच्या टीमने दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला होता. म्यान्यमार येथेही त्यांनी आपल्या धाडसाची चुणूक दाखविली होती. ते मूळचे पोगरवाडी येथील असून, आरे गावात ते दत्तक गेले होते. त्यांच्या वृत्ताने या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. सलग पाच वर्षे पोगरवाडीचे सरपंच असणाऱ्या मधुकर घोरपडे यांचे चिरंजीव संतोष यांना लहानपणापासूनच समाजकार्याची आवड होती. लष्करात दाखल झाल्यानंतर ‘मी देशाबरोबरच माझ्या गावासाठीही आयुष्यभर झटेन’ असे ते सतत बोलून दाखवत. त्यांची पत्नी उधमपूर येथे मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असून, त्याही मुलांसोबत बुधवारी साताऱ्यात येत आहेत. (प्रतिनिधी)पित्याचा वारसा चालवायचा होता...शहीद संतोष महाडिक यांचे वडील मधुकर घोरपडे हे पाच वर्षे सातारा तालुक्यातील पोगरवाडीचे सरपंच होते. खासदार उदयनराजे अन् आमदार शिवेंद्रसिंहराजे या दोन्ही नेत्यांशी वडिलांचे चांगले संबंध होते. मात्र, सुमारे एक वर्षापूर्वी वडिलांचे ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांनतरही घोरपडे घराण्याने नेतृत्त्वाची परंपरा पुढे चालू ठेवली. गेल्या आठवड्यातच संतोषच्या वहिनी शोभाताई जयवंत घोरपडे पोगरवाडीच्या सरपंच झाल्या आहेत. आयुष्यभर गावासाठी झटलेल्या वडिलांचा वारसा आपण पुढे चालविला पाहिजे, असे संतोष नेहमी घरातील मंडळींसमोर बोलून दाखवित असे; मात्र, देशरक्षण करताना गाव विकासाचे स्वप्न अधुरे राहिले.तीन दिवसांपूर्वीच संतोषचा आम्हाला काश्मिरहून घरी फोन आला होता. दिवाळीत येणे शक्य झाले नसले तरी डिसेंबरमध्ये सुट्या मिळणार आहेत, त्यावेळी किमान पंधरा दिवस तरी सातारा जिल्ह्यात मुक्काम करेन. तसेच आपलं गाव म्हणजे पोगरवाडीत सर्व गावकऱ्यांची एकत्र बैठक घेऊन गावच्या विकासासाठी एक चांगला आराखडा तयार करू. एकमेकांशी संघर्ष न करता गावचा विकास करण्यासाठी सर्वांची मानसिकता तयार करू, असे स्वप्नही संतोषने फोनवरून बोलताना आमच्यासमोर व्यक्त केले होते. - जयवंत घोरपडे, बंधू तीन दिवसांपूर्वीच संतोषचा आम्हाला काश्मिरहून घरी फोन आला होता. दिवाळीत येणे शक्य झाले नसले तरी डिसेंबरमध्ये सुट्या मिळणार आहेत, त्यावेळी किमान पंधरा दिवस तरी सातारा जिल्ह्यात मुक्काम करेन. तसेच आपलं गाव म्हणजे पोगरवाडीत सर्व गावकऱ्यांची एकत्र बैठक घेऊन गावच्या विकासासाठी एक चांगला आराखडा तयार करू. एकमेकांशी संघर्ष न करता गावचा विकास करण्यासाठी सर्वांची मानसिकता तयार करू, असे स्वप्नही संतोषने फोनवरून बोलताना आमच्यासमोर व्यक्त केले होते. - जयवंत घोरपडे, बंधू