शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

...तर अनुदान आणि वेतनवाढ थांबणार

By admin | Updated: December 23, 2015 02:00 IST

नववीत नापास होण्याची शक्यता असणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करवून घेऊन शाळांनी नववीचा निकाल १०० टक्के लावावा. तसे न केल्यास शासनातर्फे अनुदान आणि वेतनवाढ थांबविण्याची कारवाई करण्यात येईल

पुणे : नववीत नापास होण्याची शक्यता असणाऱ्या विद्यार्थ्यांची तयारी करवून घेऊन शाळांनी नववीचा निकाल १०० टक्के लावावा. तसे न केल्यास शासनातर्फे अनुदान आणि वेतनवाढ थांबविण्याची कारवाई करण्यात येईल, या स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे आता पहिली ते आठवीबरोबरच नववीतही पास होणे सोपे होणार आहे.दहावीचा निकाल १०० टक्के लागावा, यासाठी बहुतांश शाळा नववीतील अनेक मुलांना जाणून बुजून नापास करत असल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात होते. आता, अभ्यासक्रमात मागे राहिलेल्या नववीतील मुलांची तयारी करवून घेऊन त्यांना दहावीत प्रवेश देण्याची जबाबदारी शासनाने मुख्याध्यापक-शिक्षकांवर सोपविली आहे. यासंदर्भात राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या अध्यक्षतेखाली, राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक व प्रमुख शिक्षण अधिकारी यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. त्या वेळी हे धोरण ठरविण्यात आले़सद्यपरिस्थितीमध्ये मुला-मुलींचे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण २० टक्के असून ते प्रमाण ५ टक्क्यांवर आणण्याचे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत उद्दिष्ट आहे. त्या अंतर्गत शासनाने ही योजना आखण्याचे ठरवले आहे. विभागीय शिक्षण संचालक रामचंद्र जाधव म्हणाले, दहावीच्या मूल्यमापन पद्धतीप्रमाणेच नववीच्या विद्यार्थ्यांचेही मूल्यमापन केले जाणार आहे. शिक्षणाधिकारी नववीच्या निकालांचीही पडताळणी करतील, असे बैठकीत ठरले आहे.