शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

भाषण करताना भास्कर जाधव रडले

By admin | Updated: October 12, 2014 22:50 IST

सापाला दूध पाजले तर त्याच्या तोंडातून अमृत थोडेच बाहेर पडणार आहे?

रत्नागिरी : सापाला दूध पाजले तर त्याच्या तोंडातून अमृत थोडेच बाहेर पडणार आहे? पक्षातीलच काही मंडळींनी हा साप पोसला होता. पक्षाने सर्व काही देऊनही गद्दारी करीत पक्षाबाहेर पडला व पक्षाच्या विरोधातच गरळ ओकला. त्यामुळे रत्नागिरीतील लढत ही गद्दार विरुध्द निष्ठावंत अशी असून, गद्दाराला एकदाच गाडून टाका, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या उदय सामंत यांच्यावर केला. राष्ट्रवादीचे उमेदवार बशीर मुर्तुझा यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत जाधव बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस केशवराव भोसले, बाप्पा सावंत, माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, उमेदवार बशीर मुर्तुझा, नगरसेवक सुदेश मयेकर, रामभाऊ गराटे, यासीन मामू आदी पदाधिकारी उपस्थित होते. जाधव म्हणाले, पक्षाने याला काय दिले नाही, दोनवेळा आमदारकी, राज्याच्या युवक शाखेचे प्रदेशाध्यक्षपद, मंत्रिपद देऊनही पक्षाशी गद्दारी केली. तिसऱ्यांदा उमेदवारी देऊनही पक्षाने पैसे मागितल्याचे सांगत बदनामी करणाऱ्याला त्याची जागा मतदारांनी दाखवून द्यावी. सांमत राष्ट्रवादीतून सेनेत गेल्यावर जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांना मी विचारले, जो राष्ट्रवादीचा, स्वत:च्या कुटुंबाचा होऊ शकला नाही, तो शिवसेनेचा होईल? त्यावर महाडिक म्हणाले, आम्ही त्यांना स्वीकारले आहेच, परंतु खांद्यावरही बसविले आहे. त्यावर मी म्हणालो, आमच्याकडे हेच झाले. काहींनी त्यांना खांद्यावर बसविले, त्यांचे कपडे घाण झाले. तुम्ही कान सांभाळा, असा सल्ला दिला आहे. मी पण २००४ मध्ये शिवसेना पक्ष सोडला होता. मला दिलेली उमेदवारी अचानक काढून घेतली. त्यामुळे मी पक्षाच्याच कार्यालयात बसून रितसर राजीनामा दिला होता. माझ्या पक्षाचा एबी फॉर्म घेऊन मी दुसऱ्या पक्षात गेलो नाही. येथे तर पक्षाने सर्वकाही दिले. तिसऱ्या वेळचा उमेदवारीचा एबी फॉर्मही दिला तरी गद्दारी झाली हे न पटणारेच आहे, असेही ते म्हणाले. पक्षाने अन्याय केला, उमेदवारीसाठी पैसे मागितले असे जर यांचे म्हणणे असेल तर हे भैरीबुवाचे क्षेत्र आहे. कोण खरा आणि कोण गद्दार याचा न्याय आपण भैरीबुवाकडेच सोपवूया, असे जाधव म्हणाले. (प्रतिनिधी) भाषण करताना भास्कर जाधव रडले पाच वर्षांपूर्वी पावसमध्ये राष्ट्रवादीची सभा झाली होती. त्यावेळी एकाच व्यासपीठावर असताना तटकरे मला उद्देशून बोलले होते की, माझ्या निष्ठेबाबतच त्यांनी संशय घेतला होता. त्यावेळी मी प्रचंड अस्वस्थ झालो. पवारांवर निष्ठा असलेल्या माझ्यावर असा आरोप भर सभेत व्हावा, हे दुर्दैवी होते. त्याचक्षणी मला वाटले पक्ष सोडावा. परंतु कुमार शेट्ये यांनी मला सावरले. मात्र, माझ्या निष्ठेबद्दल शंका घेणाऱ्यांची निष्ठा खरी की, माझी खरी, हे स्वामी स्वरुपानंद व शारदादेवीवरच सोपवले. मी गद्दार असेन तर मला शिक्षा व्हावी, जर दुसरा कोणी असेल तो जगासमोर येऊदे. २६ सप्टेंबर २०१४ रोजी गद्दार कोण हे जगासमोर आलेच. पालकमंत्रीपदाच्या माझ्या साडेतीन वर्षांच्या काळात या माणसाने विरोधकांशी हातमिळवणी करीत मला प्रचंड त्रास दिला, असे म्हणत भास्कर जाधव ओक्साबोक्सी रडले. त्यामुळे भावविवश झालेल्या कार्यकर्त्यांनी लगेचच जोरदार घोषणाबाजी केली.