शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आमदार फोडायचे की मध्यावधी निवडणूक?

By admin | Updated: March 24, 2017 02:00 IST

राज्यात मध्यावधी निवडणूक घ्यावी की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गळाशी लावून त्यांना पोटनिवडणुकीत निवडून आणत सरकार टिकवायचे,

मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणूक घ्यावी की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गळाशी लावून त्यांना पोटनिवडणुकीत निवडून आणत सरकार टिकवायचे, अशा दोन पर्यायांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा सल्ला घेण्याचा निर्णय भाजपाच्या विस्तारित कोअर कमिटीच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य व काही मंत्री हे पाटील यांच्या शासकीय बंगल्यावर झालेल्या या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर काय करायचे यावर जशी बैठकीत चर्चा झाली तशीच शिवसेनेची साथ सोडून इतर पर्यायांवर आपणच निर्णय घेतला पाहिजे, असा बहुतेकांचा सूर होता.

भाजपा मध्यावधी निवडणुकीला सामोरी गेली तर आपल्याला १८० पेक्षा जास्त जागा मिळतील, असे मत एका ज्येष्ठ मंत्र्याने व्यक्त केले. सरकारबाबत अनिश्चिततेची अवस्था एकदाची संपवा, त्यासाठी एक तर मध्यावधीला सामोरे जाऊयात किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना भाजपात आणून पुन्हा निवडून आणू, असाही सूर होता. पोटनिवडणुकीत एक-दोन जण निवडून आले नाहीत तर त्यांना विधान परिषदेवर घेण्याचा पर्यायदेखील खुला असेल. सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसचे ११ आणि राष्ट्रवादीचे १० आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यातील किमान १४ जण असे आहेत की जे भाजपाच्या उमेदवारांचा अटीतटीच्या लढतीत पराभव करून निवडून आलेले होते. त्यामुळे ते भाजपाकडून पोटनिवडणुकीत लढले तर निश्चितपणे जिंकू शकतात. भाजपा आणि मित्रपक्षांचे मिळून सध्या १३४ सदस्य असल्याचा पक्षाचा दावा आहे. याचा अर्थ २८८ सदस्यांच्या विधानसभेत शिवसेनेशिवाय बहुमतासाठी भाजपाला आणखी अकराच आमदार हवे आहेत. अशा वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फुटीर आमदारांना निवडून आणायचे तर त्याबाबतचा निर्णय भाजपाला घ्यावा लागणार आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी वा पोटनिवडणूक यापैकी कोणत्याही एका बाजूने आजच्या बैठकीत मत नोंदविले नाही. हा विषय तत्काळ निर्णय घेण्यासारखा नाही. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचे मत काय, मध्यावधीला सामोरे गेल्यास काय होऊ शकेल या सगळ्या बाजू तपासून पुढे जावे लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)