शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

आमदार फोडायचे की मध्यावधी निवडणूक?

By admin | Updated: March 24, 2017 02:00 IST

राज्यात मध्यावधी निवडणूक घ्यावी की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गळाशी लावून त्यांना पोटनिवडणुकीत निवडून आणत सरकार टिकवायचे,

मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणूक घ्यावी की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गळाशी लावून त्यांना पोटनिवडणुकीत निवडून आणत सरकार टिकवायचे, अशा दोन पर्यायांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा सल्ला घेण्याचा निर्णय भाजपाच्या विस्तारित कोअर कमिटीच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य व काही मंत्री हे पाटील यांच्या शासकीय बंगल्यावर झालेल्या या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर काय करायचे यावर जशी बैठकीत चर्चा झाली तशीच शिवसेनेची साथ सोडून इतर पर्यायांवर आपणच निर्णय घेतला पाहिजे, असा बहुतेकांचा सूर होता.

भाजपा मध्यावधी निवडणुकीला सामोरी गेली तर आपल्याला १८० पेक्षा जास्त जागा मिळतील, असे मत एका ज्येष्ठ मंत्र्याने व्यक्त केले. सरकारबाबत अनिश्चिततेची अवस्था एकदाची संपवा, त्यासाठी एक तर मध्यावधीला सामोरे जाऊयात किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना भाजपात आणून पुन्हा निवडून आणू, असाही सूर होता. पोटनिवडणुकीत एक-दोन जण निवडून आले नाहीत तर त्यांना विधान परिषदेवर घेण्याचा पर्यायदेखील खुला असेल. सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसचे ११ आणि राष्ट्रवादीचे १० आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यातील किमान १४ जण असे आहेत की जे भाजपाच्या उमेदवारांचा अटीतटीच्या लढतीत पराभव करून निवडून आलेले होते. त्यामुळे ते भाजपाकडून पोटनिवडणुकीत लढले तर निश्चितपणे जिंकू शकतात. भाजपा आणि मित्रपक्षांचे मिळून सध्या १३४ सदस्य असल्याचा पक्षाचा दावा आहे. याचा अर्थ २८८ सदस्यांच्या विधानसभेत शिवसेनेशिवाय बहुमतासाठी भाजपाला आणखी अकराच आमदार हवे आहेत. अशा वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फुटीर आमदारांना निवडून आणायचे तर त्याबाबतचा निर्णय भाजपाला घ्यावा लागणार आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी वा पोटनिवडणूक यापैकी कोणत्याही एका बाजूने आजच्या बैठकीत मत नोंदविले नाही. हा विषय तत्काळ निर्णय घेण्यासारखा नाही. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचे मत काय, मध्यावधीला सामोरे गेल्यास काय होऊ शकेल या सगळ्या बाजू तपासून पुढे जावे लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)