शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

आमदार फोडायचे की मध्यावधी निवडणूक?

By admin | Updated: March 24, 2017 02:00 IST

राज्यात मध्यावधी निवडणूक घ्यावी की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गळाशी लावून त्यांना पोटनिवडणुकीत निवडून आणत सरकार टिकवायचे,

मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणूक घ्यावी की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गळाशी लावून त्यांना पोटनिवडणुकीत निवडून आणत सरकार टिकवायचे, अशा दोन पर्यायांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा सल्ला घेण्याचा निर्णय भाजपाच्या विस्तारित कोअर कमिटीच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य व काही मंत्री हे पाटील यांच्या शासकीय बंगल्यावर झालेल्या या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर काय करायचे यावर जशी बैठकीत चर्चा झाली तशीच शिवसेनेची साथ सोडून इतर पर्यायांवर आपणच निर्णय घेतला पाहिजे, असा बहुतेकांचा सूर होता.

भाजपा मध्यावधी निवडणुकीला सामोरी गेली तर आपल्याला १८० पेक्षा जास्त जागा मिळतील, असे मत एका ज्येष्ठ मंत्र्याने व्यक्त केले. सरकारबाबत अनिश्चिततेची अवस्था एकदाची संपवा, त्यासाठी एक तर मध्यावधीला सामोरे जाऊयात किंवा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांना भाजपात आणून पुन्हा निवडून आणू, असाही सूर होता. पोटनिवडणुकीत एक-दोन जण निवडून आले नाहीत तर त्यांना विधान परिषदेवर घेण्याचा पर्यायदेखील खुला असेल. सूत्रांनी सांगितले की, काँग्रेसचे ११ आणि राष्ट्रवादीचे १० आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यातील किमान १४ जण असे आहेत की जे भाजपाच्या उमेदवारांचा अटीतटीच्या लढतीत पराभव करून निवडून आलेले होते. त्यामुळे ते भाजपाकडून पोटनिवडणुकीत लढले तर निश्चितपणे जिंकू शकतात. भाजपा आणि मित्रपक्षांचे मिळून सध्या १३४ सदस्य असल्याचा पक्षाचा दावा आहे. याचा अर्थ २८८ सदस्यांच्या विधानसभेत शिवसेनेशिवाय बहुमतासाठी भाजपाला आणखी अकराच आमदार हवे आहेत. अशा वेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फुटीर आमदारांना निवडून आणायचे तर त्याबाबतचा निर्णय भाजपाला घ्यावा लागणार आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यावधी वा पोटनिवडणूक यापैकी कोणत्याही एका बाजूने आजच्या बैठकीत मत नोंदविले नाही. हा विषय तत्काळ निर्णय घेण्यासारखा नाही. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचे मत काय, मध्यावधीला सामोरे गेल्यास काय होऊ शकेल या सगळ्या बाजू तपासून पुढे जावे लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)