शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

राज्य सरकार वेगळे दोन हजार कोटी कुठले देणार?

By admin | Updated: June 11, 2015 00:44 IST

सहकारमंत्र्यांचा पवित्रा : केंद्राने केलेली हीच राज्याची मदत

कोल्हापूर : केंद्र शासनाने साखर उद्योगाला सहा हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज बुधवारी जाहीर केले. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यास मंजुरी दिली आहे. त्यातील राज्याच्या वाट्याला १८५० कोटी रुपये मिळणार आहेत, त्यामुळे राज्य शासनाने वेगळे दोन हजार कोटी रुपये देण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. त्यामुळे साखर कारखानदारांचे धाबे दणाणले आहेतच; शिवाय राज्य सरकारचा हा ‘यू टर्न’ही वादाचा विषय बनण्याची चिन्हे आहेत.राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आल्याने त्यांना मदत करायची म्हणून राज्य शासनाच्यावतीने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दोन हजार कोटी रुपये कर्ज देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ही रक्कम जाहीर करूनही दिली नाही, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सहकारमंत्र्यांच्या येथील निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला. तेव्हाही सहकारमंत्र्यांनी ही रक्कम देण्याबाबत वित्त विभागाने काही त्रुटी काढल्या आहेत. त्यासंबंधीची चर्चा १० जूनला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवून ३० जूनपूर्वी कारखान्यांना रक्कम उपलब्ध करून दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखानदारीचे खरे तर बुधवारी राज्याच्याच पॅकेजकडे लक्ष लागून राहिले होते. परंतु, तोपर्यंत दुपारीच केंद्र शासनाने सहा हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज जाहीर केल्यावर राज्य शासनाने विधिमंडळात दिलेले आश्वासनही मागे घेतले.सायंकाळी सहकारमंत्री पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘राज्य सरकारनेच केंद्र शासनाकडे कारखान्यांना मदत करण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यामुळे बुधवारी जे कर्ज जाहीर झाले, त्यापेक्षा वेगळे दोन हजार कोटी देण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यात व केंद्रात वेगळे सरकार नाही. आमच्याच सरकारने केलेली ही मदत आहे.’गरज ६०० ची...मिळणार २०० रुपयेमहाराष्ट्राला केंद्र शासनाच्या पॅकेजमधून जी रक्कम मिळणार आहे, त्यातून कसेबसे टनास २०० रुपये उपलब्ध होतील. परंतु, ‘एफआरपी’ देण्यासाठी प्रत्यक्षात टनास ६०० रुपयांची तूट आहे. ही रक्कम कशी भरून काढणार आणि पुढील हंगाम कसा घेणार? या चिंतेत साखर कारखानदारी आहे. त्यात राज्य सरकारच्या नव्या पवित्र्यामुळे अडचणीत वाढ झाली.