शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

२२ वर्षे पारदर्शकता कुठे होती?

By admin | Updated: February 19, 2017 02:19 IST

आमच्या खेड्यापाड्यातही मुंबई इतके खराब रस्ते नाहीत. २२ वर्ष शिवसेना भाजपाचे ‘आपण दोघे भाऊ मिळून सगळ खाऊ’ असे चालले होते. या २२ वर्षात कुठे गेली होती तुमची पारदर्शकता ?

मुंबई : आमच्या खेड्यापाड्यातही मुंबई इतके खराब रस्ते नाहीत. २२ वर्ष शिवसेना भाजपाचे ‘आपण दोघे भाऊ मिळून सगळ खाऊ’ असे चालले होते. या २२ वर्षात कुठे गेली होती तुमची पारदर्शकता ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात परिवर्तन तर होणारच. परिवर्तन तर होणार आहे पण ते भाजपाच्या बाजूने नाही तर काँग्रेसच्या बाजूने होईल, असा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिवसेना, भाजपावर हल्लाबोल केला.मुंबई महापालिका रणसंग्रामातील काँग्रेसची शेवटची प्रचारसभा अ‍ॅन्टॉप हिल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी चव्हाण यांच्यासह मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित होते. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेस या निवडणुकीला पूर्ण तयार आहे. कॉंग्रेसच्या सभांमध्ये लोकांना बसायलाही जागा पुरत नाही इतकी गर्दी आणि प्रतिसाद मिळत आहे. तिकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेला मात्र लोकच येत नाहीत म्हणून सभा रद्द केली जात आहे. मुख्यमंत्री म्हणतात परिवर्तन होणारच, हो परिवर्तन होणार पण ते भाजपाच्या बाजूने नाही तर काँग्रेसच्या बाजूने होईल. काँग्रेसने लोकांना जोडण्याचे काम केले. शिवसेना भाजपाच्या लोकांनी मात्र मंदीर मशिदीच्या नावाने लोकांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम केले. भाजपावाले म्हणतात, मंदीर वही बनायेंगे तारीख नाही बतायेंगे. आता शिवसेनेवाले म्हणतात राजीनामा देंगे पर तारीख नही बतायेंगे. जे बोलतो ते करून दाखवतो, हा उद्धव ठाकरे यांचा दावा असेल तर त्यांनी आधी राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हानही चव्हाण यांनी दिले. (प्रतिनिधी)