शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

२२ वर्षे पारदर्शकता कुठे होती?

By admin | Updated: February 19, 2017 02:19 IST

आमच्या खेड्यापाड्यातही मुंबई इतके खराब रस्ते नाहीत. २२ वर्ष शिवसेना भाजपाचे ‘आपण दोघे भाऊ मिळून सगळ खाऊ’ असे चालले होते. या २२ वर्षात कुठे गेली होती तुमची पारदर्शकता ?

मुंबई : आमच्या खेड्यापाड्यातही मुंबई इतके खराब रस्ते नाहीत. २२ वर्ष शिवसेना भाजपाचे ‘आपण दोघे भाऊ मिळून सगळ खाऊ’ असे चालले होते. या २२ वर्षात कुठे गेली होती तुमची पारदर्शकता ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात परिवर्तन तर होणारच. परिवर्तन तर होणार आहे पण ते भाजपाच्या बाजूने नाही तर काँग्रेसच्या बाजूने होईल, असा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिवसेना, भाजपावर हल्लाबोल केला.मुंबई महापालिका रणसंग्रामातील काँग्रेसची शेवटची प्रचारसभा अ‍ॅन्टॉप हिल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी चव्हाण यांच्यासह मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित होते. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेस या निवडणुकीला पूर्ण तयार आहे. कॉंग्रेसच्या सभांमध्ये लोकांना बसायलाही जागा पुरत नाही इतकी गर्दी आणि प्रतिसाद मिळत आहे. तिकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेला मात्र लोकच येत नाहीत म्हणून सभा रद्द केली जात आहे. मुख्यमंत्री म्हणतात परिवर्तन होणारच, हो परिवर्तन होणार पण ते भाजपाच्या बाजूने नाही तर काँग्रेसच्या बाजूने होईल. काँग्रेसने लोकांना जोडण्याचे काम केले. शिवसेना भाजपाच्या लोकांनी मात्र मंदीर मशिदीच्या नावाने लोकांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम केले. भाजपावाले म्हणतात, मंदीर वही बनायेंगे तारीख नाही बतायेंगे. आता शिवसेनेवाले म्हणतात राजीनामा देंगे पर तारीख नही बतायेंगे. जे बोलतो ते करून दाखवतो, हा उद्धव ठाकरे यांचा दावा असेल तर त्यांनी आधी राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हानही चव्हाण यांनी दिले. (प्रतिनिधी)