शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

२२ वर्षे पारदर्शकता कुठे होती?

By admin | Updated: February 19, 2017 02:19 IST

आमच्या खेड्यापाड्यातही मुंबई इतके खराब रस्ते नाहीत. २२ वर्ष शिवसेना भाजपाचे ‘आपण दोघे भाऊ मिळून सगळ खाऊ’ असे चालले होते. या २२ वर्षात कुठे गेली होती तुमची पारदर्शकता ?

मुंबई : आमच्या खेड्यापाड्यातही मुंबई इतके खराब रस्ते नाहीत. २२ वर्ष शिवसेना भाजपाचे ‘आपण दोघे भाऊ मिळून सगळ खाऊ’ असे चालले होते. या २२ वर्षात कुठे गेली होती तुमची पारदर्शकता ? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात परिवर्तन तर होणारच. परिवर्तन तर होणार आहे पण ते भाजपाच्या बाजूने नाही तर काँग्रेसच्या बाजूने होईल, असा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिवसेना, भाजपावर हल्लाबोल केला.मुंबई महापालिका रणसंग्रामातील काँग्रेसची शेवटची प्रचारसभा अ‍ॅन्टॉप हिल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी चव्हाण यांच्यासह मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित होते. यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेस या निवडणुकीला पूर्ण तयार आहे. कॉंग्रेसच्या सभांमध्ये लोकांना बसायलाही जागा पुरत नाही इतकी गर्दी आणि प्रतिसाद मिळत आहे. तिकडे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेला मात्र लोकच येत नाहीत म्हणून सभा रद्द केली जात आहे. मुख्यमंत्री म्हणतात परिवर्तन होणारच, हो परिवर्तन होणार पण ते भाजपाच्या बाजूने नाही तर काँग्रेसच्या बाजूने होईल. काँग्रेसने लोकांना जोडण्याचे काम केले. शिवसेना भाजपाच्या लोकांनी मात्र मंदीर मशिदीच्या नावाने लोकांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम केले. भाजपावाले म्हणतात, मंदीर वही बनायेंगे तारीख नाही बतायेंगे. आता शिवसेनेवाले म्हणतात राजीनामा देंगे पर तारीख नही बतायेंगे. जे बोलतो ते करून दाखवतो, हा उद्धव ठाकरे यांचा दावा असेल तर त्यांनी आधी राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडावे, असे आव्हानही चव्हाण यांनी दिले. (प्रतिनिधी)