शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

पंढरीत राहायचे कुठे हाच प्रश्न !

By admin | Updated: July 13, 2015 01:00 IST

वाळवंटात राहुट्या उभारण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी आणि त्याबाबत शासनाची डोळेझाक यातून मार्ग कसा काढायचा याची वारकऱ्यांना चिंता लागली आहे़ शासनाला

बाळासाहेब बोचरे , पुणेवाळवंटात राहुट्या उभारण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी आणि त्याबाबत शासनाची डोळेझाक यातून मार्ग कसा काढायचा याची वारकऱ्यांना चिंता लागली आहे़ शासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करायचे की वारी करायची, हे कोडे सुटता सुटत नाही़ राहुट्याच नसतील तर वारी काळात पंढरीत राहायचे कोठे, हा प्रश्नही त्यांना सतावत आहे़संत सज्जनांचा पालखी सोहळा मुखी हरिनाम घेत आनंदाने पंढरपूरला जावा आणि आनंदमय सोहळा पूर्ण करावा यासाठी वारकरी वारीत सहभागी होतात, परंतु पंढरपुरात गेल्यावर करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. न्यायालयाच्या निर्बंधांमुळे वारकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, सरकारने खास अध्यादेश काढून चंद्रभागा वाळवंट वारकऱ्यांसाठी वर्षातून १५ दिवस खुले करण्यात यावे, अशी वारकऱ्यांची मागणी आहे़ पण सरकार न्यायालयाकडे बोट दाखवून वारकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे़ यावर आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही़ न्यायालयाच्या निर्णयाशी बहुतांशी वारकरी व त्यांच्या संघटना सहमत आहे़त़, परंतु शासनाने अद्याप पर्याय उपलब्ध न केल्याने तोपर्यंत न्यायालयाकडून शासनाने सवलत मागून घ्यावी, असे त्यांचे मत आहे.वाळवंट हा वारकऱ्यांचा हक्क आहे. आम्ही आमचे कीर्तन, प्रवचने चालू ठेवायची की सरकारशी संघर्ष करत बसायचे, हा खरा प्रश्न वैष्णवांनी उपस्थित केला आहे. सरकारनेच कायदेशीर पळवाट काढावी असे समस्त वारकऱ्यांना वाटत असल्याचे सांगून समस्त वारकरी फडकरी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जळगावकर म्हणाले की, आषाढीला वाळवंटाची गरज नसते, गरज भासते ती कार्तिकी, माघी व चैत्री वारीसाठी. तिला १५ दिवसांची सवलत द्यावी. त्यामुळे हा अपवाद वगळून सरकारने वाळवंटात बंदी घातली तरी आमची काहीच हरकत नाही. यावर सरकार काय निर्र्णय घेते याकडे वारकऱ्यांचे डोळे लागले आहेत.