शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

पंढरीत राहायचे कुठे हाच प्रश्न !

By admin | Updated: July 13, 2015 01:00 IST

वाळवंटात राहुट्या उभारण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी आणि त्याबाबत शासनाची डोळेझाक यातून मार्ग कसा काढायचा याची वारकऱ्यांना चिंता लागली आहे़ शासनाला

बाळासाहेब बोचरे , पुणेवाळवंटात राहुट्या उभारण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी आणि त्याबाबत शासनाची डोळेझाक यातून मार्ग कसा काढायचा याची वारकऱ्यांना चिंता लागली आहे़ शासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करायचे की वारी करायची, हे कोडे सुटता सुटत नाही़ राहुट्याच नसतील तर वारी काळात पंढरीत राहायचे कोठे, हा प्रश्नही त्यांना सतावत आहे़संत सज्जनांचा पालखी सोहळा मुखी हरिनाम घेत आनंदाने पंढरपूरला जावा आणि आनंदमय सोहळा पूर्ण करावा यासाठी वारकरी वारीत सहभागी होतात, परंतु पंढरपुरात गेल्यावर करायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. न्यायालयाच्या निर्बंधांमुळे वारकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, सरकारने खास अध्यादेश काढून चंद्रभागा वाळवंट वारकऱ्यांसाठी वर्षातून १५ दिवस खुले करण्यात यावे, अशी वारकऱ्यांची मागणी आहे़ पण सरकार न्यायालयाकडे बोट दाखवून वारकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे़ यावर आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही़ न्यायालयाच्या निर्णयाशी बहुतांशी वारकरी व त्यांच्या संघटना सहमत आहे़त़, परंतु शासनाने अद्याप पर्याय उपलब्ध न केल्याने तोपर्यंत न्यायालयाकडून शासनाने सवलत मागून घ्यावी, असे त्यांचे मत आहे.वाळवंट हा वारकऱ्यांचा हक्क आहे. आम्ही आमचे कीर्तन, प्रवचने चालू ठेवायची की सरकारशी संघर्ष करत बसायचे, हा खरा प्रश्न वैष्णवांनी उपस्थित केला आहे. सरकारनेच कायदेशीर पळवाट काढावी असे समस्त वारकऱ्यांना वाटत असल्याचे सांगून समस्त वारकरी फडकरी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जळगावकर म्हणाले की, आषाढीला वाळवंटाची गरज नसते, गरज भासते ती कार्तिकी, माघी व चैत्री वारीसाठी. तिला १५ दिवसांची सवलत द्यावी. त्यामुळे हा अपवाद वगळून सरकारने वाळवंटात बंदी घातली तरी आमची काहीच हरकत नाही. यावर सरकार काय निर्र्णय घेते याकडे वारकऱ्यांचे डोळे लागले आहेत.