शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस कुठे अडला ?

By admin | Updated: June 24, 2014 01:08 IST

जून महिना संपत आला तरी सक्रिय होऊनही मान्सून न बरसल्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. १ ते २३ जून दरम्यान सरासरी १४७.३३ मि.मी. पाऊस पडायला हवा होता.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी: निम्मा पाऊसही नाहीनागपूर: जून महिना संपत आला तरी सक्रिय होऊनही मान्सून न बरसल्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. १ ते २३ जून दरम्यान सरासरी १४७.३३ मि.मी. पाऊस पडायला हवा होता. प्रत्यक्षात ६४.११ मि.मी. पाऊस झाला. पावसाची ही तूट ५६.६१ टक्के आहे.यंदा मान्सून उशिरा येणार व पाऊसही कमी पडणार असा अंदाज हवामान खात्याने जून महिन्यापूर्वीच वर्तविला होता. मान्सून उशिरा दाखल झाला खरा पण तो दाखल झाल्यावरही बरसत नसल्याने चिंता निर्माण झाली आहे. एरवी ७ जूनला मान्सून विदर्भात दाखल होतो. गेल्या वर्षी तो वेळेत दाखल झाला होता. आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली होती. यंदा जून महिना संपत आला तरी विदर्भ कोरडाच आहे. खरीप हंगामासाठी शेत जमिनीची तयारी करून बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात यामुळे आता आसव येण्याची वेळ आली आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या मान्सून कुठेच सक्रिय नाही. देशाच्या ईशान्य भागात थोडा पाऊस पडत असला तरी इतर भागात मात्र स्थिती कोरडीच आहे. मध्य भारतात आणि पर्यायाने विदर्भात पाऊस येण्यासाठी बंगालच्या खाडीत अनुकूल परिस्थिती नाही आणि ती नजीकच्या काळात निर्माण होण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे पुढचा काळ शेतकरी आणि सर्वसामान्यांच्यादृष्टीने कठीण राहणार आहे.नागपूर विभागात सर्वसाधारणपणे १ ते २३ जून या दरम्यान १४७.३३ मि.मी. पाऊस पडतो. यावेळी या काळात फक्त ६४.४१ मि.मी. म्हणजे सरासरीच्या ५६.६१ टक्के कमी पाऊस झाला आहे. नागपूर जिल्ह्यात १३९.७९ मि.मी. पैकी ६९.६४ (सरासरीच्या ५० टक्के), वर्धा जिल्ह्यात १३७.७३ मि.मी.च्या तुलनेत ६०.६६ मि.मी. (सरासरीच्या ४४ टक्के), भंडारा जिल्ह्यात १४८.४३ मि.मी.च्या तुलनेत ५४.२९ मि.मी.(सरासरीच्या ३७ टक्के), गोंदिया जिल्ह्यात १४८.४३ मि.मी.च्या तुलनेत ८९.६३ मि.मी.(सरासरीच्या ५६ टक्के), चंद्रपूर जिल्ह्यात १४३ मि.मी.च्या तुलनेत ४७.०१ मि.मी. (सरासरीच्या ३३ टक्के) आणि गडचिरोली जिल्ह्यात १५६ मि.मी.च्या तुलनेत ६३,४३ मि.मी. (सरासरीच्या ४१ टक्के) पाऊस झाला आहे. दरम्यान पावसाळ्यापूर्वी झालेल्या पावसामुळे विभागातील धरणांतील जलसाठा समाधानकारक आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये ४६ टक्के पाणी आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर सध्याच परिणाम होण्याची शक्यता नाही. (प्रतिनिधी)