शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आनंदी मंत्रालयाच्या नावे आनंदी आनंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 05:50 IST

नुसतीच घोषणा; ना मंत्री, ना कार्यालय

मुंबई : लोकांच्या तनामनात आनंद पेरण्यासाठी आनंदी मंत्रालयाची स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व मदत, पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. पण तीन वर्षे झाली तरी हे खाते निर्माण होऊ शकलेले नाही. आनंदी मंत्रालयाच्या नावे सध्या तरी आनंदी आनंदच आहे.

‘हॅपिनेस इंडेक्स’वर समाजाची श्रीमंती मोजणारा भुतान हा जगातील एकमेव देश आहे. त्याच धर्तीवर भाजपाने मध्य प्रदेशात आनंदी मंत्रालयाची स्थापना केली. आपल्याकडे असे आनंदी मंत्रालय स्थापण्याचा मनोदय व्यक्त झाला. मदत व पुनर्वसन विभागांद्वारे हे खाते चालेल असे पाटील यांनी जाहीर केले होते. ‘आनंदीश मंत्रालयाचा कारभार पाटील यांच्याकडे’ अशा बातम्याही त्यावेळी आलेल्या होत्या.या मंत्रालयाची संकल्पना ज्या आयएएस अधिकाऱ्यांनी लावून धरली. त्यांना इतर विभागाच्या अधिकाºयांनी सहकार्य केले नाही, हेही सर्वज्ञात आहे. या विभागाचे यश सर्व विभागांच्या सहकार्यावर अवलंबून आहे आणि सर्वांचे काम हे कोणाचेच काम नसते असा अनुभवही या निमित्ताने आला. आनंदी मंत्रालयाद्वारे समाजाच्या चेहºयावर हसू फुलविण्याच्या प्रयत्नांचे घोडे नमनालाच अडले.नुसतीच घोषणा; ना मंत्री, ना कार्यालयमदत व पुनर्वसन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी मध्य प्रदेशात जाऊन अभ्यास केला. काही एनजीओंची मदत घेण्यात आली. त्या आधारे राज्यातील आनंदी मंत्रालयाची संकल्पना तयार केली आणि ती सादरदेखील केली.च्लोक दु:खी का आहेत व त्यांना आनंदी करण्यास काय करता येऊ शकेल याची ब्ल्यू प्रिंट त्यात होती. लोकांचे दु:ख कशात आहे हे जाणून घेण्यास एक सर्वेक्षण करण्याची शिफारस त्यात होती. पण, असे सर्वेक्षण झालेच नाही.

टॅग्स :ministerमंत्री