शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

आनंदी मंत्रालयाच्या नावे आनंदी आनंदच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 05:50 IST

नुसतीच घोषणा; ना मंत्री, ना कार्यालय

मुंबई : लोकांच्या तनामनात आनंद पेरण्यासाठी आनंदी मंत्रालयाची स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व मदत, पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. पण तीन वर्षे झाली तरी हे खाते निर्माण होऊ शकलेले नाही. आनंदी मंत्रालयाच्या नावे सध्या तरी आनंदी आनंदच आहे.

‘हॅपिनेस इंडेक्स’वर समाजाची श्रीमंती मोजणारा भुतान हा जगातील एकमेव देश आहे. त्याच धर्तीवर भाजपाने मध्य प्रदेशात आनंदी मंत्रालयाची स्थापना केली. आपल्याकडे असे आनंदी मंत्रालय स्थापण्याचा मनोदय व्यक्त झाला. मदत व पुनर्वसन विभागांद्वारे हे खाते चालेल असे पाटील यांनी जाहीर केले होते. ‘आनंदीश मंत्रालयाचा कारभार पाटील यांच्याकडे’ अशा बातम्याही त्यावेळी आलेल्या होत्या.या मंत्रालयाची संकल्पना ज्या आयएएस अधिकाऱ्यांनी लावून धरली. त्यांना इतर विभागाच्या अधिकाºयांनी सहकार्य केले नाही, हेही सर्वज्ञात आहे. या विभागाचे यश सर्व विभागांच्या सहकार्यावर अवलंबून आहे आणि सर्वांचे काम हे कोणाचेच काम नसते असा अनुभवही या निमित्ताने आला. आनंदी मंत्रालयाद्वारे समाजाच्या चेहºयावर हसू फुलविण्याच्या प्रयत्नांचे घोडे नमनालाच अडले.नुसतीच घोषणा; ना मंत्री, ना कार्यालयमदत व पुनर्वसन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी मध्य प्रदेशात जाऊन अभ्यास केला. काही एनजीओंची मदत घेण्यात आली. त्या आधारे राज्यातील आनंदी मंत्रालयाची संकल्पना तयार केली आणि ती सादरदेखील केली.च्लोक दु:खी का आहेत व त्यांना आनंदी करण्यास काय करता येऊ शकेल याची ब्ल्यू प्रिंट त्यात होती. लोकांचे दु:ख कशात आहे हे जाणून घेण्यास एक सर्वेक्षण करण्याची शिफारस त्यात होती. पण, असे सर्वेक्षण झालेच नाही.

टॅग्स :ministerमंत्री