शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

महामार्गावरील एक लाख झाडे गेली कुठे ?

By admin | Updated: June 27, 2016 18:56 IST

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील तब्बल एक लाख झाडे गायब झाली आहेत. या रस्त्याचे काम देण्यात आलेल्या आयडीयल रोड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड (आयआरबी) या कंपनीने राज्यशासनाने झालेल्या करारानुसार

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील तब्बल एक लाख झाडे गायब झाली आहेत. या रस्त्याचे काम देण्यात आलेल्या आयडीयल रोड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड (आयआरबी) या कंपनीने राज्यशासनाने झालेल्या करारानुसार रस्त्याची बांधणी करताना दुभाजकांमध्ये तब्बल 1 लाख झाडे लावण्याचा करार करण्यात आला होता. मात्र, या कराराला हरताळ फासत काही मोजक्याच ठिकाणी झाडे लावण्यात आली असल्याने या महामार्गावरील अपघात रोखण्यात अडथळे येत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. 14 वर्षापूर्वी काम सुरू असतानाच; ही झाडे लावली गेली असती तर अनेक अपघात रोखण्यात तसेच वाहने उलटून विरूध्द दिशेने जाणा-या अपघातांची संख्या रोखता आली असती असा दावा वेलणकर यांनी केली आहे. 
या महामार्गावर सुरू असलेली अपघातांची मालिका कायम असून गेल्या काही वर्षात वाहनांच्या तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असल्याने या मार्गावर वाहनांच्या वेगाला नियंत्रण आणणे अशक्य बनले आहे. त्यातच या रस्त्यावरील लेन मध्ये दुभाजक मोठा असला तरी त्याची उंची कमी आहे. अनेक ठिकाणी तो रस्त्याशी समतल आहे. अशा स्थिती रात्रीच्या वेळी अनेक वाहनांच्या प्रखर दिव्यांचा प्रकाश विरूध्द दिशेने येणा-या वाहनांवर मोठया प्रमाणात पडतो. त्यामुळे अपघात वाढले आहेत. या शिवाय अनेकदा एखाद्या वेगाने जाणारे वाहन उलटल्यास अथवा टायर फुटल्यास हे अपघातग्रस्त वाहन थेट कोणत्याही अडथळया विना विरूध्द दिशेच्या लेनवर जाऊन पडते. त्यामुळे अपघात होऊन जिवितहानीतर होतेच पण तासंतास वाहतूकीचा खोळंबाही होतो. अशा स्थितीत महामार्गाच्या दुभाजकावर 14 वर्षापूर्वीच झाडे लावली गेली असती ती मोठी झाली असती. मात्र, कंपनीकडून काही मोजक्याच ठिकाणी झाडे लावल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी वेलणकर यांनी केली आहे.
 
काय आहे झाडांचा फायदा ? 
या महामार्गावर पनवेल ते देहूरोड हे जेवढे अंतर आहे सर्वसाधारण पणे तेवढचे अंतर गुजरात मधील अहमदाबाद ते बडोदा हे अंतर आहे. मात्र, या महामार्गावर दुभाजकांमध्ये मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. ही झाडे मोठी झाली असल्याने अनेकदा अपघातानंतर गाडया झाडांना धडकतात. त्यामुळे त्या विरूध्द दिशेच्या लेन मध्ये येत नाहीत. या शिवाय झांडामुळे रात्रीच्या वेळी गाडयांच्या दिव्याच्या प्रकाशाचा त्रास विरूध्द दिशेच्या वाहनांना होत नाही. त्यामुळे पर्यायाने अपघातांची संख्याही घटण्यास मदत होते. त्यामुळे या महामार्गावरील अपघातांची संख्या मुंबई- पुणे महामार्गावर होणा-या अपघातां पेक्षा कितीतरी अधिक पटींनी कमी असल्याचे वेलणकर यांनी स्पष्ट केले.
 
रस्ते बांधणीच्या झालेल्या करारानुसार, कंपनीने 1 लाख झाडे लावणे अपेक्षीत होते. मात्र, ती लावली गेलेली नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी दुभाजक सताड उघडे आहेत. त्यांना कोणताही अडथळा नाही. त्यामुळे वाहनांचा अपघात झाल्यानंतर अनेक वाहने थेट विरूध्द दिशेला जात आहेत. त्यामुळे किमान आता वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन ही झाडे लावली जातील याकडे एमएसआरडीसीने लक्ष देण्याची गरज आहे.- विवेक वेलणकर (अध्यक्ष सजग नागरीक मंच )