शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

कुठे गेले ‘अच्छे दिन ?’

By admin | Updated: October 12, 2014 03:21 IST

निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देऊन आणि जनतेला दिवास्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपाने सत्ता मिळताच आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली आहे.

सोनिया गांधींचा सवाल : शंभर दिवसांतच मोदी सरकार नापास
गोंदिया/ब्रrापुरी : निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देऊन आणि जनतेला दिवास्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपाने सत्ता मिळताच आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली आहे. 1क्क् दिवसांत एकाही आश्वासनाची पूर्तता करता आलेली नाही. आता कुठे गेले ‘अच्छे दिन’, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गोंदिया येथील जाहीर सभेत केला.
गोंदिया आणि ब्रrापुरी (जि. चंद्रपूर) येथे झालेल्या भरगच्च प्रचार सभेत त्यांनी ‘परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मभूमीला मी नमन करते,’ अशी भाषणाची सुरुवात करताच उपस्थिांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.
सोनिया गांधी यांनी आपल्या 12 मिनिटांच्या भाषणात भाजपा आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, की मोठमोठी आश्वासने देणा:या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीची लक्तरे अवघ्या 1क्क् दिवसांतच वेशीवर टांगली गेली आहेत. ‘अच्छे दिन’ ही घोषणा फुसका बार ठरली आहे. केवळ घोषणांनी आणि पोकळ आश्वासनांनी देश चालत नसून, त्यासाठी त्याग आणि समर्पणाची भावना असावी लागते. ही भावना स्वातंत्र्यपूर्व काळापासून केवळ काँग्रेस पक्षातच असल्याचे त्या म्हणाल्या. 
सत्तेवर आल्यावर 1क्क् दिवसांत महागाई कमी करून दाखवू म्हणणा:या मोदी सरकारने महागाई केली का, काळा पैसा बाहेर काढला की, बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा केली, असे सवाल करीत सत्ता मिळविणो हाच भाजपाचा एकसूत्री कार्यक्रम असल्याचा घणाघात गांधी यांनी केला. या सभेला काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह विविध मतदारसंघांचे उमेदवार उपस्थित होते.
 
अमेरिका भेटीचे फलित काय ?
पंतप्रधान मोदींनी मोठा गवगवा करीत अमेरिका दौरा केला. या दौ:यात त्यांनी काय मिळवले आणि काय कमावले, हे त्यांनाच ठाऊक. मात्र त्यांच्या या दौ:यात त्यांनी विदेशी जीवनरक्षक औषधांच्या किमती कितीतरी पटींनी वाढविल्या; ज्याची किंमत आता सर्वाना चुकवावी लागेल, असा इशारा या वेळी सोनिया गांधी यांनी दिला.
 
संपुआच्या कामांचे 
नरेंद्र मोदींकडून री-ब्रँडिंग
कॉँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी  सरकारने औद्योगिक व विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रत महत्त्वपूर्ण प्रकल्प उभे केले. अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या. या योजनांवर स्वत:चा शिक्का मारून नरेंद्र मोदी सरकार री-ब्रँडिंग करीत असल्याची टीका काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी शनिवारी केली. 
 
नवीन सरकारचा चांगल्या 
योजना बंद करण्याचा घाट 
काँग्रेसने आदिवासींच्या उत्थानासाठी ट्रायबल बिल आणले. नक्षली भागातील मुलांना तांत्रिक शिक्षण देऊन त्यांचे जीवन सुधारण्यासाठी काँग्रेस सरकारने प्रय} केले, पण नवीन सरकारने काँग्रेसच्या काळातील चांगल्या योजना बंद करण्याचा घाट रचला आहे. विकासाची ही गती अशीच कायम ठेवण्यास राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणा, असे आवाहन सोनिया यांनी केले. 
 
नरेंद्र मोदी अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखेच बोलत आणि वागत आहेत, अशी बोचरी टीका माजी केंद्रीय वित्त मंत्री पी. चिदंबरम यांनी केली.