शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांची दुरुस्ती कधी होणार ?

By admin | Updated: January 13, 2015 01:09 IST

पावसाळा संपला की शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. यावर्षी मात्र तसे झाले नाही. रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्यात आले. प्रशासकीय मान्यता घेण्यात आली.

रस्त्यांवर खड्डेच खड्डे : दुरुस्तीचा फक्त प्रस्ताव तयार नागपूर : पावसाळा संपला की शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. यावर्षी मात्र तसे झाले नाही. रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करण्यात आले. प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. निविदाही काढण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. हिवाळी अधिवेशन आटोपले, नव्या वर्षाला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतरही शहरातील खड्डेयुक्त रस्त्यांच्या डांबरीकरणास सुरुवात झालेली नाही. या कामासाठी तब्बल दोन महिन्यांचा विलंब झाला आहे. झोन स्तरावर नगरसेवकांच्या वॉर्ड फंडातून काही रस्त्यांवर डांबरीकरणाचा एक थर टाकण्यात आला. यात काही रस्ते असे होते की ज्यांचे आताच डांबरीकरण केले नसते तरी वर्षभर संबंधित रस्ते कामी आले असते. मात्र, नगरसेवकांनी विविध हेतूंनी या रस्त्यांचे डांबरीकरण करून घेतले. त्यामुळे जेथे आवश्यकता होते ते रस्ते तसेच राहिले.कुठे गेले जेट पॅचर?स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी खड्डे तत्काळ भरण्यासाठी जेट पॅचर मशीन खरेदी केली होती. त्यावेळी तक्रार मिळताच ४८ तासात खड्डे भरले जातील, असा दावा करण्यात आला होता. मात्र, शहरात असे बरेच खड्डे आहेत की जे महिना होऊनही भरल्या गेलेले नाहीत. त्यामुळे संबंधित जेट पॅचर नेमके कुठे गेले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गुणवत्तेकडे दुर्लक्ष गंगाबाई घाट चौक ते वैष्णोदेवी चौकादरम्यानच्या रस्त्याचे काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते. त्यानंतरही या रस्त्यावर खड्डे पडले. ते काही दिवसांपूर्वी भरण्यात आले. मुंजे चौक ते झांशी राणी चौकाकडे येणाऱ्या रस्त्यांवर जेट पॅचरच्या मदतीने खड्डे भरण्यात आले होते. मात्र, या कामात गुणवत्ता न राखल्यामुळे गिट्टी उखडू लागली आहे. प्राथमिकतेच्या आधारावर मंजुरी- आयुक्त शहरातील रस्त्यांच्या दुर्दशेचा मुद्दा स्थायी समितीच्या बैठकीतही गाजला. यावर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्राथमिकतेच्या आधारावर रस्त्यांची यादी तयार केली जाईल आणि नंतर दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम केले जाईल, असे स्पष्ट केले. रस्त्यांशी संबंधित फाईल पाच दिवसात निकाली काढल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर म्हणाले, रस्त्यांची दुरुस्ती करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.