शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

आमचे पुनर्वसन कधी होणार?

By admin | Updated: January 18, 2017 02:52 IST

मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, वॉर्डसह प्रभागातील राजकीय हालचालींना वेग आला

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, वॉर्डसह प्रभागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापालिकेच्या ‘एल’ वॉर्डातल्या १६६ क्रमांकाच्या प्रभागात मोडत असलेल्या क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील झोपडीधारकांचे पुनर्वसन हा महापालिकेच्या निवडणुकीतील प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे. परिणामी नागरी समस्या आणि पुनर्वसन या विषयांना लोकप्रतिनिधी कसे तोंड देतात, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.मुंबई महापालिकेच्या ‘एल’ वॉर्डमध्ये संदेशनगर आणि क्रांतीनगर हे परिसर मोडतात. हे दोन्ही परिसर विमानतळालगत आहेत. दोन्ही परिसरात वास्तव्यास असलेल्या झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून सुटलेला नाही. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून रहिवाशांनी शेकडो आंदोलने छेडत मोर्चे काढले. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न काही केल्या सुटत नसल्याचे चित्र आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पुनर्वसन प्रक्रियेअंतर्गत क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. संदेशनगर आणि क्रांतीनगरमधील रहिवाशांसह समाजसेवकांनी मात्र झोपड्यांच्या सर्वेक्षण प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला. सर्वेक्षणात घोळ झाल्याचे म्हणणे मांडत स्थानिकांनी पुन्हा झोपड्यांचे सर्वेक्षण हाती घेण्यात यावे, असे म्हणणे मांडले. परंतु प्रशासनाकडून याची काहीच दखल घेण्यात आली नाही. परिणामी संतप्त झालेल्या रहिवाशांनी महापालिका निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्यापूर्वीच मोर्चा काढत न्याय देण्याची मागणी केली होती. मात्र अद्यापही हा प्रश्न निकाली निघालेला नाही.प्रभाग क्रमांक १६६ मध्ये शिवसेना, भाजपा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा आणि एमआयएम अशा सर्वच राजकीय पक्षांनी आपआपली ताकद पणाला लावली आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारी घोषित झाली नसली तरी येथून अनेक उमेदवार विविध राजकीय पक्षांकडून इच्छुक आहेत. परिणामी उमेदवारी घोषित झाल्यानंतर येथील झोपड्यांचे पुनर्वसन हाच प्रचाराचा मुद्दा असणार असून, उठलेल्या रणधुमाळीत कोण बाजी मारणार, हे पाहणे तेवढेच औत्सुक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)>राजकीय पक्ष, सेवाभावी संघटनांचे आंदोलनविमानतळालगत वसलेल्या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळला आहे. उपजिल्हाधिकारी कार्यालयावर लोकप्रतिनिधींसह विविध संघटनांनी मोर्चे काढले आहेत. मात्र तरीही प्रशासनाकडून झोपडीधारकांना आश्वासनांशिवाय काहीच प्राप्त झालेले नाही. शिवसेना आणि काँग्रेस या दोन राजकीय पक्षांनी या मुद्द्याला हात घातला असला तरी झोपडीधारकांना हे दोन्ही उभय पक्ष न्याय देतील का? याचे उत्तर अद्यापही कोणाला सापडले नाही.